शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

राज ठाकरेंना मोठा दिलासा; 'त्या' आरोपातून उच्च न्यायालयाने केली निर्दोष सुटका

By प्रभुदास पाटोळे | Updated: March 29, 2025 15:50 IST

घटनेच्यावेळी राज ठाकरे घटनास्थळी नव्हते व त्यांनी चिथावणी दिल्याचा पुरावाही नाही.

प्रभुदास पाटोळे/ छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २००८ च्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठा पुराव्याअभावी त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. घटनेच्यावेळी राज ठाकरे घटनास्थळी हजर नव्हते, त्यांनी बसवर दगडफेक केल्याचा  व आंदोलनकर्त्यांना चिथावणी दिल्याचा कुठलाही पुरावा दोषारोपपत्रात नाही, असे न्यायालयाने म्हटले.

कुठलाही पुरावा नसल्यामुळे राज ठाकरेंविरुद्ध फौजदारी खटला चालविणे म्हणजे कायदेशीर प्रक्रीयेचा गैरवापर ठरेल, असे निरीक्षण नोंदवीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी राज ठाकरे यांच्याविरुद्ध ‘सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत’ दाखल गुन्हा आणि दोषारोपपत्र रद्द करुन त्यांची निर्दोष सुटका केली.

काय आहे प्रकरण?

२००८ साली राज ठाकरे यांच्या अटकेनंतर उसळलेल्या दंगलीत परळी- गंगाखेड मार्गावर एस टी बस थांबवून दगडफेक केल्याबाबत राज ठाकरेंसह मनसे कार्यकर्त्यांविरोधात सार्वजनिक मालमत्तेस नुकसान पोचवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी राज ठाकरेंनी परळीच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या सुनावणीअंती खंडपीठाने दि.२१ मार्च रोजी वरीलप्रमाणे आदेश दिला आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेHigh Courtउच्च न्यायालय