शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराच्या विरोधात मुस्लिम समाजाचा मोठा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:58 IST

देशभरात मुस्लिम समाजावर होणारे अत्याचार आणि म्यॅनमार येथे मुस्लिम समाज बांधवांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ तसेच इतर मागण्यांसाठी १० सप्टेंबर रोजी मुस्लिम समाज बांधवांनी मुस्लिम इंसाफ कौन्सीलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशभरात मुस्लिम समाजावर होणारे अत्याचार आणि म्यॅनमार येथे मुस्लिम समाज बांधवांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ तसेच इतर मागण्यांसाठी १० सप्टेंबर रोजी मुस्लिम समाज बांधवांनी मुस्लिम इंसाफ कौन्सीलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढला.शहरातील जिंतूर रोडवरील इदगाह मैदानातून दुपारी २ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. शहरातील सुभाष रोड, शिवाजी चौक, गांधी पार्क, मुल्ला मशिद, नारायण चाळ कॉर्नर, विसावा कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मौलाना अब्दुल कादर मिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत मौलाना सरफराज, सालेह जावेद याफई, मौलाना तज्जमुल, मौलाना जहांगिर नदवी, मौलाना खुद्दूस मिल्ली, मुफ्ती गौस खासमी, मोहम्मद अलताफ मेमन, सय्यद खादर, काजी जलालोद्दीन, मुफ्ती मिर्झा कलीम बेग, हाफीज चाऊस व मौलाना रफियोद्दीन अश्रफी आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मौलाना रफीयोद्दीन आपल्या भाषणात देशातील सरकार मुस्लिम विरोधी असून, मुस्लिम बांधवांवर अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. आम्ही कायद्याचा सन्मान करीत असल्याने गप्प आहोत. सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा दिला.याप्रसंगी व्यासपीठावर मौलना जहांगिर नदवी, मौलाना मुजीब दहेलवी, मुफ्ती रिजवान, मौलाना खाजा मोईनोद्दीन, मुफ्ती गौस, हाफेज शफी, मुफ्ती कौसर आफाख, खाजी जमिरोद्दीन, हाफेज मोहजीब, मौलाना सिराज, हाफेज रिजवान, मौलाना जहीर अब्बास, हाफेज मुजीबुर रहेमान हुसैनी, मौलाना अब्दुल रशीद, हाफेज निसार आदी धर्मगुरुंसह उपमहापौर माजू लाला, हाफीज चाऊस, गुलाम महंमद मिठ्ठू, कलीम अन्सारी, तय्यब बुखारी, अली खान, जान मोहंमद जानू, गुलमीर खान, मौहम्मद गौस झैन, शेख उबेद शालीमार, नौमान हुसेनी कौसर, शफीक अन्सारी, शेख अहमद, मेराज कुरेशी, सय्यद फारुक बाबा आदींची उपस्थिती होती.सभेनंतर जिल्हाधिकाºयांमार्फत राष्टÑपतींना विविध मागण्यांचे पाठविण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाखवर नवीन कायदा करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. केंद्र सरकारने मुस्लिम शरियत कायद्यानुसारच नवीन कायदा करावा, यु.ए.पी.ए. कायदा रद्द करावा, गोरक्षकच्या नावावर मुस्लिमांची होणारी हत्या व अत्याचार थांबावावेत, आतंकवाद्याच्या नावाखाली अटकेत असलेल्या निरपराध युवकांना मुक्त करावे, गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना त्वरीत अटक करावी, मुस्लिम समाज बांधवांना ५ टक्के आरक्षण द्यावे, पोखर्णी येथे झालेल्या मुस्लिम युवकाच्या मारेकºयांना त्वरीत अटक करावी व या प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास करावा आदी मागण्या करण्यात आल्या. सभेच्या शेवटी देशात व जगात सुख शांती रहावी, यासाठी सामूहिक दुवा मागण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.