शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
5
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
6
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
7
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
8
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
9
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
10
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
11
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
12
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
13
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
14
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
15
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
16
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
17
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
18
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
19
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
20
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

अत्याचाराच्या विरोधात मुस्लिम समाजाचा मोठा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:58 IST

देशभरात मुस्लिम समाजावर होणारे अत्याचार आणि म्यॅनमार येथे मुस्लिम समाज बांधवांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ तसेच इतर मागण्यांसाठी १० सप्टेंबर रोजी मुस्लिम समाज बांधवांनी मुस्लिम इंसाफ कौन्सीलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशभरात मुस्लिम समाजावर होणारे अत्याचार आणि म्यॅनमार येथे मुस्लिम समाज बांधवांच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ तसेच इतर मागण्यांसाठी १० सप्टेंबर रोजी मुस्लिम समाज बांधवांनी मुस्लिम इंसाफ कौन्सीलच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढला.शहरातील जिंतूर रोडवरील इदगाह मैदानातून दुपारी २ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. शहरातील सुभाष रोड, शिवाजी चौक, गांधी पार्क, मुल्ला मशिद, नारायण चाळ कॉर्नर, विसावा कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मौलाना अब्दुल कादर मिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत मौलाना सरफराज, सालेह जावेद याफई, मौलाना तज्जमुल, मौलाना जहांगिर नदवी, मौलाना खुद्दूस मिल्ली, मुफ्ती गौस खासमी, मोहम्मद अलताफ मेमन, सय्यद खादर, काजी जलालोद्दीन, मुफ्ती मिर्झा कलीम बेग, हाफीज चाऊस व मौलाना रफियोद्दीन अश्रफी आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मौलाना रफीयोद्दीन आपल्या भाषणात देशातील सरकार मुस्लिम विरोधी असून, मुस्लिम बांधवांवर अत्याचाराच्या घटनांत वाढ होत आहे. आम्ही कायद्याचा सन्मान करीत असल्याने गप्प आहोत. सरकारने आमच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा दिला.याप्रसंगी व्यासपीठावर मौलना जहांगिर नदवी, मौलाना मुजीब दहेलवी, मुफ्ती रिजवान, मौलाना खाजा मोईनोद्दीन, मुफ्ती गौस, हाफेज शफी, मुफ्ती कौसर आफाख, खाजी जमिरोद्दीन, हाफेज मोहजीब, मौलाना सिराज, हाफेज रिजवान, मौलाना जहीर अब्बास, हाफेज मुजीबुर रहेमान हुसैनी, मौलाना अब्दुल रशीद, हाफेज निसार आदी धर्मगुरुंसह उपमहापौर माजू लाला, हाफीज चाऊस, गुलाम महंमद मिठ्ठू, कलीम अन्सारी, तय्यब बुखारी, अली खान, जान मोहंमद जानू, गुलमीर खान, मौहम्मद गौस झैन, शेख उबेद शालीमार, नौमान हुसेनी कौसर, शफीक अन्सारी, शेख अहमद, मेराज कुरेशी, सय्यद फारुक बाबा आदींची उपस्थिती होती.सभेनंतर जिल्हाधिकाºयांमार्फत राष्टÑपतींना विविध मागण्यांचे पाठविण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाखवर नवीन कायदा करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. केंद्र सरकारने मुस्लिम शरियत कायद्यानुसारच नवीन कायदा करावा, यु.ए.पी.ए. कायदा रद्द करावा, गोरक्षकच्या नावावर मुस्लिमांची होणारी हत्या व अत्याचार थांबावावेत, आतंकवाद्याच्या नावाखाली अटकेत असलेल्या निरपराध युवकांना मुक्त करावे, गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना त्वरीत अटक करावी, मुस्लिम समाज बांधवांना ५ टक्के आरक्षण द्यावे, पोखर्णी येथे झालेल्या मुस्लिम युवकाच्या मारेकºयांना त्वरीत अटक करावी व या प्रकरणाचा सीआयडीमार्फत तपास करावा आदी मागण्या करण्यात आल्या. सभेच्या शेवटी देशात व जगात सुख शांती रहावी, यासाठी सामूहिक दुवा मागण्यात आली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.