शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

प्रशासनातील भीष्मपितामह भुजंगराव कुलकर्णी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:02 IST

--- औरंगाबाद : महाराष्ट्रातील वयाने आणि अनुभवाने सर्वात ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे बुधवारी (दि. २४) ...

---

औरंगाबाद : महाराष्ट्रातील वयाने आणि अनुभवाने सर्वात ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी यांचे बुधवारी (दि. २४) दुपारी सव्वादोनच्या सुमारास निधन झाले. ५ फेब्रुवारीला त्यांनी १०४ व्या वर्षात पदार्पण केले होते.

राज्याच्या पहिल्या जनगणनेचे प्रमुख, पुणे मनपाचे आयुक्त, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, मुंबईचे महसूल आयुक्त, तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेतील महत्त्वाचे शिलेदार आणि पुढे २ वेळा कुलगुरू म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली.

स्वातंत्र्यपूर्व हैदराबाद संस्थानात १९३९ मध्ये प्रशासकीय नोकरीतून आपल्या कारकीर्दीला सुरुवात करणारे भुजंगराव १९७४ च्या अखेरीस राज्याच्या सिंचन विभागाचे भारतीय प्रशासकीय सेवेतील शेवटचे सचिव म्हणून निवृत्त झाले. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवन गौरव पुरस्कार, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्थेचा गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राज्य नियोजन मंडळावर व दांडेकर समिती सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य व अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. दांडेकर समिती, न्हावाशेवा बंदर, अकृषी-विद्यापीठांची लेखा समिती, मराठवाडा ग्रामीण बॅंक, कापूस एकाधिकार योजना पुनर्विलोकन समिती, राज्य नियोजन मंडळ, टेक्‍स्टाईल मिल, राज्य सिंचन आयोग, अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. सरस्वती भुवन, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, सेंट्रॉन कंपनी, आयसीम कॉलेजसारख्या अनेक संस्थांद्वारे ते सतत कार्यरत राहिले.

त्यांच्या पश्चात मुलगा पद्माकर कुलकर्णी (अमेरिका), तर मंगला बट्टे (अमेरिका), डाॅ. उषा नांदेडकर या मुली आहेत. घाटीच्या नेत्ररोग विभागप्रमुख डाॅ. वर्षा नांदेडकर, शुभदा पाटील, नीरजा कुलकर्णी यांचे ते आजोबा होत. सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.

---

अल्पपरिचय

---

- ५ फेब्रुवारी १९१८ गाढे पिंपळगाव (ता. परळी, जि. बीड) येथे शेतकरी कुटुंबात जन्म.

-१९३२ : औरंगाबाद येथून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण

-१९३४ : वयाच्या १७ व्या वर्षी त्यांचे लग्न

-१९३६ : हैदराबाद येथून ते प्रथम क्रमांकाने बी.एस्सी. उत्तीर्ण

-१९३८ : भौतिकशास्त्रामध्ये एम.एस्सी. प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

-१९३९ : निजाम राजवटीत मेदक तालुक्यात ‘तहसीलदार’ या पदावर मुलकी प्रशासकीय सेवेत रुजू

-१९४० : ‘डिस्ट्रिक्ट लँड रेकॉर्ड ऑफिसर’ म्हणून औरंगाबाद येथे रुजू

- १९४७ ‘असिस्टंट कमिशनर’ या श्रेणी-१ च्या मुलकी सेवेत दाखल

-१९५० : आयएएस

-१९५३ : नांदेडला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले

-१९५४ : भूमी आयोग स्थापन झाला. त्या विभागाचे सचिव म्हणून नेमणूक

-१९५६ : राज्य पुनर्रचनेमुळे मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांबरोबर मुंबई राज्यात औरंगाबादला जिल्हाधिकारी

-१९५९ : राज्याच्या जनगणनेसाठी ‘प्रमुख’ म्हणून काम पाहिले

-१९६५ : पुणे महानगरपालिकेचे आयुक्त

-१९६९ : मुंबईत नगरविकास, आरोग्य व गृहनिर्माण या तीन खात्याचे सचिव म्हणून काम

-१९६९ : राज्याच्या सिंचन विभागाचा सचिव म्हणून जबाबदारी

-१९७४ : अखेरीस भारतीय प्रशासकीय सेवेतील शेवटचे सचिव म्हणून निवृत्त.