शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कसबे तडवळ्यातील ‘भगिरथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 00:04 IST

उस्मानाबाद : सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी गावा-गावात शासकीय मदत, लोकसहभागातून कामे केली जात आहेत़ ‘पाणीवाले बाबा’ यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणा काम करीत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी गावा-गावात शासकीय मदत, लोकसहभागातून कामे केली जात आहेत़ ‘पाणीवाले बाबा’ यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणा काम करीत आहे़ मात्र, तालुक्यातील कसबे तडवळे शिवारातील मांग नदीपात्राचे तीन किलोमीटर झालेले खोलीकरण-रूंदीकरणाचे काम या कामाहून वेगळे ठरत आहे़ नदी पुनर्जिवित करण्यासाठी देवदत्त मोरे यांनी ‘भगिरथा’ची भूमिका पार पाडत स्वखर्चातून तब्बल तीन किलोमीटरचे खोलीकरण-रूंदीकरणाचे काम केले आहे़ या कामामुळे या भागातील तब्बल चारशे एकर जमीन ओलिताखाली येणार आहे़ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक महत्व असलेल्या कसबे तडवळे गावातील सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही मागील तीन-चार वर्षात प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत़ दुष्काळी परिस्थितीत चारा-पाण्याच्या टंचाईला तोंड देताना प्रशासनासह सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले होते़ गावावर सतत पडणारा दुष्काळ दूर करण्यासाठी गावचे सुपूत्र उद्योजक देवदत्त मोरे यांनी पुढाकार घेतला आहे़ गावाच्या शेजारून वाहणाऱ्या मांग नदीचे पात्र ९ किलोमीटरचे आहे़ मात्र, नदीपात्रात वाढलेली झाडे-झुडपे आणि गाळ यामुळे पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जात होते़ खोलीकरण-रूंदीकरण कामाचे महत्त्व ओळखून मोरे यांनी या मांग नदीच्या पात्राचे खोलीकरण, रूंदीकरण स्वखर्चातून करण्याचा निर्धार केला़ नदीपात्रातील झाडे, झुडपे, काटेरी झाडे तोडून खोलीकरण-रूंदीकरण करण्याचे आव्हान पुढे उभा होते़ मोरे यांनी कोणतीही शासकीय मदत न घेता मागील दोन महिने स्वखर्चातून हे आव्हान पेलले आहे़ आजवर चार किलोमीटरचे काम झाले असून, १० फूट खोल व ३० फूट रूंद नदीपात्राचे काम करण्यात आले़ चार किलोमीटरचा टप्पा स्वखचार्तून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मोरे यांनी ठरविले आहे. गावाच्या दक्षिणेकडील बाजूने नदीला पुनर्जिवित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कामावर ५० लाख रूपयांपेक्षा अधिक खर्च त्यांनी केला आहे़ या कामामुळे नदीपात्रात जवळपास ४० टीसीएम इतका पाणीसाठा होणार आहे. परिणामी या भागातील शंभराहून अधिक शेतकऱ्यांच्या विहिरी, कुपनलिकांची पाणीपातळी वाढणार आहे़ तर ४०० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे़ उर्वरित कामही पूर्णत्वाकडे नेण्याचा निर्धार मोरे यांनी केला आहे़