शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

कसबे तडवळ्यातील ‘भगिरथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 00:04 IST

उस्मानाबाद : सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी गावा-गावात शासकीय मदत, लोकसहभागातून कामे केली जात आहेत़ ‘पाणीवाले बाबा’ यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणा काम करीत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कउस्मानाबाद : सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी गावा-गावात शासकीय मदत, लोकसहभागातून कामे केली जात आहेत़ ‘पाणीवाले बाबा’ यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणा काम करीत आहे़ मात्र, तालुक्यातील कसबे तडवळे शिवारातील मांग नदीपात्राचे तीन किलोमीटर झालेले खोलीकरण-रूंदीकरणाचे काम या कामाहून वेगळे ठरत आहे़ नदी पुनर्जिवित करण्यासाठी देवदत्त मोरे यांनी ‘भगिरथा’ची भूमिका पार पाडत स्वखर्चातून तब्बल तीन किलोमीटरचे खोलीकरण-रूंदीकरणाचे काम केले आहे़ या कामामुळे या भागातील तब्बल चारशे एकर जमीन ओलिताखाली येणार आहे़ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक महत्व असलेल्या कसबे तडवळे गावातील सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही मागील तीन-चार वर्षात प्रचंड दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत़ दुष्काळी परिस्थितीत चारा-पाण्याच्या टंचाईला तोंड देताना प्रशासनासह सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले होते़ गावावर सतत पडणारा दुष्काळ दूर करण्यासाठी गावचे सुपूत्र उद्योजक देवदत्त मोरे यांनी पुढाकार घेतला आहे़ गावाच्या शेजारून वाहणाऱ्या मांग नदीचे पात्र ९ किलोमीटरचे आहे़ मात्र, नदीपात्रात वाढलेली झाडे-झुडपे आणि गाळ यामुळे पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जात होते़ खोलीकरण-रूंदीकरण कामाचे महत्त्व ओळखून मोरे यांनी या मांग नदीच्या पात्राचे खोलीकरण, रूंदीकरण स्वखर्चातून करण्याचा निर्धार केला़ नदीपात्रातील झाडे, झुडपे, काटेरी झाडे तोडून खोलीकरण-रूंदीकरण करण्याचे आव्हान पुढे उभा होते़ मोरे यांनी कोणतीही शासकीय मदत न घेता मागील दोन महिने स्वखर्चातून हे आव्हान पेलले आहे़ आजवर चार किलोमीटरचे काम झाले असून, १० फूट खोल व ३० फूट रूंद नदीपात्राचे काम करण्यात आले़ चार किलोमीटरचा टप्पा स्वखचार्तून पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मोरे यांनी ठरविले आहे. गावाच्या दक्षिणेकडील बाजूने नदीला पुनर्जिवित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या या कामावर ५० लाख रूपयांपेक्षा अधिक खर्च त्यांनी केला आहे़ या कामामुळे नदीपात्रात जवळपास ४० टीसीएम इतका पाणीसाठा होणार आहे. परिणामी या भागातील शंभराहून अधिक शेतकऱ्यांच्या विहिरी, कुपनलिकांची पाणीपातळी वाढणार आहे़ तर ४०० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे़ उर्वरित कामही पूर्णत्वाकडे नेण्याचा निर्धार मोरे यांनी केला आहे़