शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

अंबड-जालना-वडीगोद्री चौपदरीकरण मार्गाचे भूमिपूजन

By admin | Updated: September 8, 2014 00:53 IST

अंबड : अंबड-वडीगोद्री-जालना चौपदरीकरण मार्गाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते अंबड येथे झाले. अंबड शहरासाठी नवीन बायपास रस्ता, जिल्ह्यात राजूर गणपती

अंबड : अंबड-वडीगोद्री-जालना चौपदरीकरण मार्गाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते अंबड येथे झाले. अंबड शहरासाठी नवीन बायपास रस्ता, जिल्ह्यात राजूर गणपती व मत्स्योदरी देवी मंदिरासाठी लिफ्टची सुविधा तसेच अंबड शहरासाठी जालना-जायकवाडी योजनेतून जोडणी अशा विविध कामांची घोषणा पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केली. व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, आ. संतोष सांबरे, नगराध्यक्षा मंगल कटारे, जि.प. गटनेते सतीश टोपे, उपनगराध्यक्ष संदीप आंधळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री टोपे म्हणाले की, ३३८ कोटी रुपये खर्चाच्या वडीगोद्री-जालना मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या एक वर्षात पूर्ण करण्यात येईल. या मार्गाच्या चौपदरीकरणामुळे अंबड व घनसावंगी या दोन्ही तालुक्यांच्या विकासास मोठी चालना मिळणार आहे. व्यापार, शेती व शैक्षणिक क्षेत्राच्या विकासास या मार्गाच्या चौपदरीकरणाने गती येणार आहे. याबरोबरच अंबड शहरातील व्यापाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे जड वाहतुकीसाठी शहराबाहेरुन बायपास काढण्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल. अंबड शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी जालन्याचे आ. कैलास गोरटयांल व नगर परिषदेशी चर्चा सुरु करुन पाणी दराबाबत योग्य समाधान काढण्यात येईल. आगामी दोन ते तीन दिवसातच शहरास जायकवाडी-जालना योजनेतून जोडणी करण्यात येणार आहे. जिल्हयातील राजुर येथील गणपती व मत्स्योदरी देवी मंदिरात वृद्ध, आजारी भक्तांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी लिफ्ट सुरु करण्यात येणार आहे. मत्स्योदरी देवी मंदीरातील लिफ्टसाठी जिल्हा नियोजनातुन ६० लाख रुपये मंजुर करण्यात आले लिफ्टसाठीची सर्व प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असून लवकरच लिफ्टच्या कामास सुरुवात होणार आहे. जंगी तलाव सुशोभीकरणासाठी ६ कोटी रुपयांच्या योजनेस पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असुन लवकरच सरोवर विकास प्रकल्प योजनेअंतर्गत जंगी तलावाचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जालना-वडीगोद्री मार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने या मार्गावरील अंबड शहरातील दुकानांचे बांधकाम पाडण्याबाबत शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्याकडे चिंता व्यक्त केली. याविषयी आपण कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केली असता चौपदरीकरणासाठी शहरात मुबलक जागा उपलब्ध असल्याने कोणतेही दुकान पाडण्याची आवश्यकता नसल्याचे आपल्याला कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले आहे.