शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

अंबड-जालना-वडीगोद्री चौपदरीकरण मार्गाचे भूमिपूजन

By admin | Updated: September 8, 2014 00:53 IST

अंबड : अंबड-वडीगोद्री-जालना चौपदरीकरण मार्गाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते अंबड येथे झाले. अंबड शहरासाठी नवीन बायपास रस्ता, जिल्ह्यात राजूर गणपती

अंबड : अंबड-वडीगोद्री-जालना चौपदरीकरण मार्गाचे भूमिपूजन रविवारी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते अंबड येथे झाले. अंबड शहरासाठी नवीन बायपास रस्ता, जिल्ह्यात राजूर गणपती व मत्स्योदरी देवी मंदिरासाठी लिफ्टची सुविधा तसेच अंबड शहरासाठी जालना-जायकवाडी योजनेतून जोडणी अशा विविध कामांची घोषणा पालकमंत्री टोपे यांनी यावेळी केली. व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, आ. संतोष सांबरे, नगराध्यक्षा मंगल कटारे, जि.प. गटनेते सतीश टोपे, उपनगराध्यक्ष संदीप आंधळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री टोपे म्हणाले की, ३३८ कोटी रुपये खर्चाच्या वडीगोद्री-जालना मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम येत्या एक वर्षात पूर्ण करण्यात येईल. या मार्गाच्या चौपदरीकरणामुळे अंबड व घनसावंगी या दोन्ही तालुक्यांच्या विकासास मोठी चालना मिळणार आहे. व्यापार, शेती व शैक्षणिक क्षेत्राच्या विकासास या मार्गाच्या चौपदरीकरणाने गती येणार आहे. याबरोबरच अंबड शहरातील व्यापाऱ्यांनी मागणी केल्याप्रमाणे जड वाहतुकीसाठी शहराबाहेरुन बायपास काढण्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल. अंबड शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी जालन्याचे आ. कैलास गोरटयांल व नगर परिषदेशी चर्चा सुरु करुन पाणी दराबाबत योग्य समाधान काढण्यात येईल. आगामी दोन ते तीन दिवसातच शहरास जायकवाडी-जालना योजनेतून जोडणी करण्यात येणार आहे. जिल्हयातील राजुर येथील गणपती व मत्स्योदरी देवी मंदिरात वृद्ध, आजारी भक्तांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी लिफ्ट सुरु करण्यात येणार आहे. मत्स्योदरी देवी मंदीरातील लिफ्टसाठी जिल्हा नियोजनातुन ६० लाख रुपये मंजुर करण्यात आले लिफ्टसाठीची सर्व प्रक्रिया पुर्ण करण्यात आली असून लवकरच लिफ्टच्या कामास सुरुवात होणार आहे. जंगी तलाव सुशोभीकरणासाठी ६ कोटी रुपयांच्या योजनेस पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असुन लवकरच सरोवर विकास प्रकल्प योजनेअंतर्गत जंगी तलावाचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जालना-वडीगोद्री मार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने या मार्गावरील अंबड शहरातील दुकानांचे बांधकाम पाडण्याबाबत शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्याकडे चिंता व्यक्त केली. याविषयी आपण कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा केली असता चौपदरीकरणासाठी शहरात मुबलक जागा उपलब्ध असल्याने कोणतेही दुकान पाडण्याची आवश्यकता नसल्याचे आपल्याला कार्यकारी अभियंता यांनी स्पष्ट केले आहे.