शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

सावधान! वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात

By योगेश पायघन | Updated: November 25, 2022 16:27 IST

पर्यटकांच्या वाढत्या तक्रारीमुळे दर्जा आला धोक्यात

औरंगाबाद : वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा मिळालेला दर्जा धोक्यात आला आहे. यापुर्वी जागतिक वारसास्थळांच्या यादीतून ३ वारसास्थळे काढण्यात आली आहेत. तर भारतातील नैसर्गिक वारसास्थळ असलेले मानस सरोवर आणि सांस्कृतिक वारसास्थळ असलेले हंपी सध्या डेंजर झोनमध्ये आहे. अपंगांची आर्थीक लुट, पाकीटमारी, चोऱ्या, थेट लेण्यात विक्रेत्यांचा प्रवेश याबाबत पर्यटकांच्या तक्रारी वाढत असल्याने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा धोक्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे क्रमप्राप्त असल्याचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे औरंगाबाद मंडळाचे अधिक्षक डाॅ. मिलनकुमार चावले म्हणाले. 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमीत्त एमजीएममध्ये आर्यभट्ट सभागृहात शुक्रवारी आयोजित पुरातत्व स्मारके आणि स्थळेव्याप्ती, आव्हाने आणि पर्यटन या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. एमजीएम विद्यापीठ, अमेसिंग औरंगाबाद, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन तर्फे आयोजित या कार्यक्रमास विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे, डॉ. एच. एम. देसरडा, नीलेश राऊत, सुहास तेंडूलकर, सुबोध जाधव आदींची उपस्थिती होती. 

यावेळी डाॅ. मिलनकुमार चावले म्हणाले, जागतिक वारसास्थळाचा मिळालेला दर्जा हा कायमस्वरूपी नसतो. तो टिकवावा लागतो. वेरूळ लेणीत स्थानिक विक्रेते आतमध्ये प्रवेश करून विक्री करत आहेत. तो पुरातत्व कायद्यानुसार गुन्हा असुन त्यावर आम्ही त्यावर कारवाई करूण्यास असमर्थ ठरतो. याविषय पोलीस अधिक्षकांशी वैय्यक्तीक चर्चा केली असता त्यांनी गुन्हा घडल्याशिवाय काही करता येणार नसल्याचे स्पष्ठ केले. जिल्हा प्रशासनाने त्यावर कारवाई केली पाहिजे परंतू तसे घडत नाही. 

अजिंठा लेणीत चित्र नैसर्गिक रंगानी बनवलेली आहेत. पाच ते दहा हजार पर्यटक तिथे दिवसाकाठी भेटी देतात. त्यांच्या श्वाच्छोश्वासाने आर्दता तयार होऊन सिल्व्हर फिश (किटक) त्यात उत्पत्ती होऊन ऐतिहासिक चित्रांना हानी पोहचत आहे. पर्यटकांच्या गर्दीवरील नियंत्रणासाठी राज्य शासनाला आम्ही तेथील इंटरप्रिटेशन सेंटर मागत असून त्यातील चार लेण्यांच्या रिप्लीकातून पर्यटकांना लेण्या चांगल्या पद्धतीने समजवून घेता येतील. त्यामुळे रंगकाम असलेल्या लेण्यातील गर्दी कमी करता येईल. तसेच पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून एकच तिकीट करण्यासंबंधी विचारणा झाली. मात्र, एएसआयच्या तिकीटाची प्रक्रिया किचकट असल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले. अध्यक्षीय समारोप एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम यांनी केला.  प्रास्ताविक आदित्य वाघमारे यांनी केले. तर आभार ॲड. स्वप्नील जोशी यांनी मानले. 

पर्यटनस्थळे बघा, तिथे पिक्निक नकोपर्यटनस्थळे, वारसास्थळे संग्रहालय म्हणून बघा, तिथे पिक्निक नको, अस्वच्छता करू नका. पुढच्या पिढीच्या हाती ही वारसास्थळे सुरक्षित सोपवा. स्मारकांच्या ठिकाणी तोडफोड करणे, नावे लिहिने, स्कॅचेस मारणे अशी मानसिकता सोडण्याचे आवाहनही यावेळी मान्यवरांनी उपस्थित तरूणाईला केले.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद