शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

सावधान! वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा दर्जा धोक्यात

By योगेश पायघन | Updated: November 25, 2022 16:27 IST

पर्यटकांच्या वाढत्या तक्रारीमुळे दर्जा आला धोक्यात

औरंगाबाद : वेरूळ-अजिंठा लेणीचा जागतिक वारसास्थळाचा मिळालेला दर्जा धोक्यात आला आहे. यापुर्वी जागतिक वारसास्थळांच्या यादीतून ३ वारसास्थळे काढण्यात आली आहेत. तर भारतातील नैसर्गिक वारसास्थळ असलेले मानस सरोवर आणि सांस्कृतिक वारसास्थळ असलेले हंपी सध्या डेंजर झोनमध्ये आहे. अपंगांची आर्थीक लुट, पाकीटमारी, चोऱ्या, थेट लेण्यात विक्रेत्यांचा प्रवेश याबाबत पर्यटकांच्या तक्रारी वाढत असल्याने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा धोक्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे क्रमप्राप्त असल्याचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे औरंगाबाद मंडळाचे अधिक्षक डाॅ. मिलनकुमार चावले म्हणाले. 

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमीत्त एमजीएममध्ये आर्यभट्ट सभागृहात शुक्रवारी आयोजित पुरातत्व स्मारके आणि स्थळेव्याप्ती, आव्हाने आणि पर्यटन या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. एमजीएम विद्यापीठ, अमेसिंग औरंगाबाद, औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाऊंडेशन तर्फे आयोजित या कार्यक्रमास विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे, डॉ. एच. एम. देसरडा, नीलेश राऊत, सुहास तेंडूलकर, सुबोध जाधव आदींची उपस्थिती होती. 

यावेळी डाॅ. मिलनकुमार चावले म्हणाले, जागतिक वारसास्थळाचा मिळालेला दर्जा हा कायमस्वरूपी नसतो. तो टिकवावा लागतो. वेरूळ लेणीत स्थानिक विक्रेते आतमध्ये प्रवेश करून विक्री करत आहेत. तो पुरातत्व कायद्यानुसार गुन्हा असुन त्यावर आम्ही त्यावर कारवाई करूण्यास असमर्थ ठरतो. याविषय पोलीस अधिक्षकांशी वैय्यक्तीक चर्चा केली असता त्यांनी गुन्हा घडल्याशिवाय काही करता येणार नसल्याचे स्पष्ठ केले. जिल्हा प्रशासनाने त्यावर कारवाई केली पाहिजे परंतू तसे घडत नाही. 

अजिंठा लेणीत चित्र नैसर्गिक रंगानी बनवलेली आहेत. पाच ते दहा हजार पर्यटक तिथे दिवसाकाठी भेटी देतात. त्यांच्या श्वाच्छोश्वासाने आर्दता तयार होऊन सिल्व्हर फिश (किटक) त्यात उत्पत्ती होऊन ऐतिहासिक चित्रांना हानी पोहचत आहे. पर्यटकांच्या गर्दीवरील नियंत्रणासाठी राज्य शासनाला आम्ही तेथील इंटरप्रिटेशन सेंटर मागत असून त्यातील चार लेण्यांच्या रिप्लीकातून पर्यटकांना लेण्या चांगल्या पद्धतीने समजवून घेता येतील. त्यामुळे रंगकाम असलेल्या लेण्यातील गर्दी कमी करता येईल. तसेच पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून एकच तिकीट करण्यासंबंधी विचारणा झाली. मात्र, एएसआयच्या तिकीटाची प्रक्रिया किचकट असल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले. अध्यक्षीय समारोप एमजीएमचे कुलपती अंकुशराव कदम यांनी केला.  प्रास्ताविक आदित्य वाघमारे यांनी केले. तर आभार ॲड. स्वप्नील जोशी यांनी मानले. 

पर्यटनस्थळे बघा, तिथे पिक्निक नकोपर्यटनस्थळे, वारसास्थळे संग्रहालय म्हणून बघा, तिथे पिक्निक नको, अस्वच्छता करू नका. पुढच्या पिढीच्या हाती ही वारसास्थळे सुरक्षित सोपवा. स्मारकांच्या ठिकाणी तोडफोड करणे, नावे लिहिने, स्कॅचेस मारणे अशी मानसिकता सोडण्याचे आवाहनही यावेळी मान्यवरांनी उपस्थित तरूणाईला केले.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद