शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
3
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
4
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
5
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
6
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
7
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
9
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
10
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
11
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
12
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
13
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
14
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
15
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
16
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
17
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
18
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
19
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली

लाभक्षेत्रातील खरीप हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:02 IST

संजय जाधव पैठण : पावसाने २० दिवसांपासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकास संजीवनी देण्यासाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी ...

संजय जाधव

पैठण : पावसाने २० दिवसांपासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकास संजीवनी देण्यासाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी सोडण्यात यावी, अशी मागणी जायकवाडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. धरणात असलेला उपलब्ध साठा व खरीप संरक्षित पाळीसाठी लागणारे पाणी याचा मेळ बसत असल्याने, शेतकऱ्यांनी त्या अनुषंगाने मागणी केली आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता गोर्डे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन पाठविला आहे.

पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावांतील एक लाख ८३ हजार ३२२ हेक्टरमधील खरीप पिकांना सध्या पाण्याची गरज असून, पाण्याअभावी पिके करपत आहेत. कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन खरिपासाठी संरक्षित पाळी धरणातून देता येते, याबाबत लवकर निर्णय न झाल्यास लाभक्षेत्रातील पिके हातून जाण्याचा धोका आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मुळा भंडारदरा व दारणा धरणातून कालव्याद्वारे आवर्तनाबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा.

---- डावा कालव्यावर १,४१,६४० हे. सिंचन ------

जायकवाडी धरणाच्या २०८ किमी लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात एक लाख ४१ हजार ६४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. यात औरंगाबादेत ७,६२०, जालन्यात ३६,५८० तर परभणीत ९७,४४० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली असून, पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली आहेत.

----- उजव्या कालव्यावर ४१,६८२ हे सिंचन ------

जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी लांबीचा असून, यात औरंगाबादेतील १,४३२, बीडमधील ३७,९६० तर अहमदनगरमधील २,२९० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. या पिकांना आता पाण्याची गरज आहे

--------

पैठणमधील ९,०५२ हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात

तालुक्यात डाव्या कालव्यावर ७,६२० हेक्टर क्षेत्र व उजव्या कालव्यावर १,४३२ हेक्टर क्षेत्रातील २८ गावांत खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिके करपत असून, वेळेवर धरणातून पाणी मिळाले, तरच ही पिके वाचणार आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांतून खरीप संरक्षण पाळी सोडण्यात यावी, तसेच धरणातून तालुक्यातील खेर्डा मध्यम प्रकल्प आणि आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आहे.