शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लाभक्षेत्रातील खरीप हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:02 IST

संजय जाधव पैठण : पावसाने २० दिवसांपासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकास संजीवनी देण्यासाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी ...

संजय जाधव

पैठण : पावसाने २० दिवसांपासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकास संजीवनी देण्यासाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी सोडण्यात यावी, अशी मागणी जायकवाडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. धरणात असलेला उपलब्ध साठा व खरीप संरक्षित पाळीसाठी लागणारे पाणी याचा मेळ बसत असल्याने, शेतकऱ्यांनी त्या अनुषंगाने मागणी केली आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता गोर्डे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन पाठविला आहे.

पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावांतील एक लाख ८३ हजार ३२२ हेक्टरमधील खरीप पिकांना सध्या पाण्याची गरज असून, पाण्याअभावी पिके करपत आहेत. कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन खरिपासाठी संरक्षित पाळी धरणातून देता येते, याबाबत लवकर निर्णय न झाल्यास लाभक्षेत्रातील पिके हातून जाण्याचा धोका आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मुळा भंडारदरा व दारणा धरणातून कालव्याद्वारे आवर्तनाबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा.

---- डावा कालव्यावर १,४१,६४० हे. सिंचन ------

जायकवाडी धरणाच्या २०८ किमी लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात एक लाख ४१ हजार ६४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. यात औरंगाबादेत ७,६२०, जालन्यात ३६,५८० तर परभणीत ९७,४४० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली असून, पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली आहेत.

----- उजव्या कालव्यावर ४१,६८२ हे सिंचन ------

जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी लांबीचा असून, यात औरंगाबादेतील १,४३२, बीडमधील ३७,९६० तर अहमदनगरमधील २,२९० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. या पिकांना आता पाण्याची गरज आहे

--------

पैठणमधील ९,०५२ हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात

तालुक्यात डाव्या कालव्यावर ७,६२० हेक्टर क्षेत्र व उजव्या कालव्यावर १,४३२ हेक्टर क्षेत्रातील २८ गावांत खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिके करपत असून, वेळेवर धरणातून पाणी मिळाले, तरच ही पिके वाचणार आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांतून खरीप संरक्षण पाळी सोडण्यात यावी, तसेच धरणातून तालुक्यातील खेर्डा मध्यम प्रकल्प आणि आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आहे.