शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

लाभक्षेत्रातील खरीप हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:02 IST

संजय जाधव पैठण : पावसाने २० दिवसांपासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकास संजीवनी देण्यासाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी ...

संजय जाधव

पैठण : पावसाने २० दिवसांपासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकास संजीवनी देण्यासाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी सोडण्यात यावी, अशी मागणी जायकवाडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. धरणात असलेला उपलब्ध साठा व खरीप संरक्षित पाळीसाठी लागणारे पाणी याचा मेळ बसत असल्याने, शेतकऱ्यांनी त्या अनुषंगाने मागणी केली आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता गोर्डे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन पाठविला आहे.

पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावांतील एक लाख ८३ हजार ३२२ हेक्टरमधील खरीप पिकांना सध्या पाण्याची गरज असून, पाण्याअभावी पिके करपत आहेत. कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन खरिपासाठी संरक्षित पाळी धरणातून देता येते, याबाबत लवकर निर्णय न झाल्यास लाभक्षेत्रातील पिके हातून जाण्याचा धोका आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मुळा भंडारदरा व दारणा धरणातून कालव्याद्वारे आवर्तनाबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा.

---- डावा कालव्यावर १,४१,६४० हे. सिंचन ------

जायकवाडी धरणाच्या २०८ किमी लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात एक लाख ४१ हजार ६४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. यात औरंगाबादेत ७,६२०, जालन्यात ३६,५८० तर परभणीत ९७,४४० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली असून, पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली आहेत.

----- उजव्या कालव्यावर ४१,६८२ हे सिंचन ------

जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी लांबीचा असून, यात औरंगाबादेतील १,४३२, बीडमधील ३७,९६० तर अहमदनगरमधील २,२९० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. या पिकांना आता पाण्याची गरज आहे

--------

पैठणमधील ९,०५२ हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात

तालुक्यात डाव्या कालव्यावर ७,६२० हेक्टर क्षेत्र व उजव्या कालव्यावर १,४३२ हेक्टर क्षेत्रातील २८ गावांत खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिके करपत असून, वेळेवर धरणातून पाणी मिळाले, तरच ही पिके वाचणार आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांतून खरीप संरक्षण पाळी सोडण्यात यावी, तसेच धरणातून तालुक्यातील खेर्डा मध्यम प्रकल्प आणि आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आहे.