शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

लाभक्षेत्रातील खरीप हंगाम धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:02 IST

संजय जाधव पैठण : पावसाने २० दिवसांपासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकास संजीवनी देण्यासाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी ...

संजय जाधव

पैठण : पावसाने २० दिवसांपासून दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकास संजीवनी देण्यासाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी सोडण्यात यावी, अशी मागणी जायकवाडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. धरणात असलेला उपलब्ध साठा व खरीप संरक्षित पाळीसाठी लागणारे पाणी याचा मेळ बसत असल्याने, शेतकऱ्यांनी त्या अनुषंगाने मागणी केली आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता गोर्डे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना निवेदन पाठविला आहे.

पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावांतील एक लाख ८३ हजार ३२२ हेक्टरमधील खरीप पिकांना सध्या पाण्याची गरज असून, पाण्याअभावी पिके करपत आहेत. कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन खरिपासाठी संरक्षित पाळी धरणातून देता येते, याबाबत लवकर निर्णय न झाल्यास लाभक्षेत्रातील पिके हातून जाण्याचा धोका आहे. पश्चिम महाराष्ट्रातील मुळा भंडारदरा व दारणा धरणातून कालव्याद्वारे आवर्तनाबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांचा विचार व्हायला हवा.

---- डावा कालव्यावर १,४१,६४० हे. सिंचन ------

जायकवाडी धरणाच्या २०८ किमी लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात एक लाख ४१ हजार ६४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. यात औरंगाबादेत ७,६२०, जालन्यात ३६,५८० तर परभणीत ९७,४४० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. या क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली असून, पावसाने दडी मारल्याने पिके धोक्यात आली आहेत.

----- उजव्या कालव्यावर ४१,६८२ हे सिंचन ------

जायकवाडीचा उजवा कालवा १३२ कि.मी लांबीचा असून, यात औरंगाबादेतील १,४३२, बीडमधील ३७,९६० तर अहमदनगरमधील २,२९० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झालेली आहे. या पिकांना आता पाण्याची गरज आहे

--------

पैठणमधील ९,०५२ हेक्टर क्षेत्रातील पिके धोक्यात

तालुक्यात डाव्या कालव्यावर ७,६२० हेक्टर क्षेत्र व उजव्या कालव्यावर १,४३२ हेक्टर क्षेत्रातील २८ गावांत खरिपाची पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिके करपत असून, वेळेवर धरणातून पाणी मिळाले, तरच ही पिके वाचणार आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणाच्या दोन्ही कालव्यांतून खरीप संरक्षण पाळी सोडण्यात यावी, तसेच धरणातून तालुक्यातील खेर्डा मध्यम प्रकल्प आणि आपेगाव हिरडपुरी बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आहे.