शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 29, 2016 00:59 IST

तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ या गरजू लाभार्थ्यांना निराधार योजनेचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही.

नायब तहसीलदारांना निवेदन : मानधन देण्याची मागणीआर्वी : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ या गरजू लाभार्थ्यांना निराधार योजनेचे अनुदान अद्यापही मिळालेले नाही. दिवाळी सणाला सुरुवात झाली असताना त्यांना मानधनापासून वंचित राहाव लागत असल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दिवाळी सणा साजरा करण्याच्या अनुषंगाने मानधन उपलब्ध करुन द्यावे, अशा मागणीचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले आहे. आर्वी तालुक्यातील संजय गांधीनिराधार योजना तसेच श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणारे मानधन हे दिवाळी सणाच्या तोंडावर मिळणे अपेक्षित होते. परंतु दिवाळीच्या सणाला सुरुवात झाल्यानंतरही मानधनाचा पत्ता नाही. संजय गांधी निराधार योजनेचे मानधन घेण्यासाठी संबंधित लाभार्थी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना निधी बँकेत जमा केल्याचे सांगितले जाते. वृद्ध नागरिक बँकेत निराधार योजनेचे मानधन घेण्यासाठी जातोत. तेव्हा बँकेत निधीच नसल्याचे सांगितले जाते. यामुळे त्यांची घोर निराशा होते. मानधनाअभावी त्यांना आल्यापावली परत जावे लागल्याचे चित्र सध्या बँकेत बघायला मिळत आहे. निराधारांचे मानधन त्वरित देण्याची मागणी नायब तहसीलदार मस्के यांना निवेदनातून निखील कडू, अरूण गेडाम, अशोक कठाणे, मंगेश ठाकरे, रोषन राऊत, निलेश गायकवाड, दिनेश डेहनकर, सतीश बरडे यांनी केली आहे.(तालुका प्रतिनिधी)अनेक अडचणींचा सामनाउतार वयात बहुतांश ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या निराधार योजनांचाच आधारे आहे.त्यांचे सण याच योजनांच्या माध्यमातून मिळणाऱ्या मानधनाच्या भरवशावर साजरे होतात. दिवाळीसारखा सण असल्यामुळे हा सण साजरा करण्यासाठी निराधारांना मानधनाची गरज होती. मात्र दिवाळी सणाचा सर्वत्र झगमगाट असताना निराधार ज्येष्ठ नागरिकांना हा सण अंधारातच घालवाला लागत असल्याचे चित्र आहे.