शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

दुरुस्तीला खीळ

By admin | Updated: January 16, 2015 01:07 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद मागील तीन-चार वर्षापासून जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे

बाबूराव चव्हाण , उस्मानाबादमागील तीन-चार वर्षापासून जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मात्र पुरेसा निधीच मिळत नसल्यामुळे बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला खीळ बसत आहे. असे असले तरी दुसरीकडे प्रशासन मात्र ‘सारे अलबेल’ असल्याचे कागदी घोडे नाचवित आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यांसाठी १० हजार गेट बसविण्याची आवश्यकता आहे. सिंचनाखालील क्षेत्र वाढावे, यासाठी मागील काही दशकात जिल्ह्यात सातत्याने प्रयत्न झाले. त्यानुसार जिल्ह्यात थोडेथोडके नव्हे तब्बल ९७३ बंधारे उभारण्यात आले. मात्र, त्यानंतर बंधाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. सध्या जिल्ह्यातील बंधाऱ्यांची स्थिती पाहिली असता अनेक बंधाऱ्यांचे गेट चोरीला गेले आहेत. अनेक बंधारे मोडकळीस आलेले आहेत. या बंधाऱ्यांची दुरूस्ती मात्र होत नाही. जिल्ह्यात सध्या ९७३ बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यासाठी १० हजार ५८७ गेटची गरज आहे. या बंधाऱ्यांवर बसविण्यात आलेल्या एकूण ३९ हजार १३८ गेटपैकी २८ हजार ५४५ गेट पाणी अडविण्यासाठी उपयुक्त आहेत. दुष्काळी जिल्हा म्हणून राज्यात उस्मानाबादचे नाव आघाडीवर आहे. जिल्ह्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या माध्यमातून ८३,५७५ दसलक्ष घनफुट एवढे पाणी अडविणे शक्य आहे. मात्र, ५२ बंधाऱ्यांना गेटच नाहीत, तर १२५ बंधारे मोडकळीस आलेले आहेत. त्यामुळे पावसाचे सारे पाणी वाहून गेले आहे. शासनाने जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती व गेट बसविण्यासाठी पुरेसा निधी दिला तर शेतकऱ्यांना दुष्काळावर मात करणे सहज शक्य होईल.