शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
Jyoti Malhotra :'या' एका गोष्टीमुळे ज्योती मल्होत्रावर तपास यंत्रणेला संशय आला; चौकशीत होणार खुलासा
3
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
4
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
5
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
6
तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं
7
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
8
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
9
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
10
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
11
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
12
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
13
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
14
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
15
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
16
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
18
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
19
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
20
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा

दुरुस्तीला खीळ

By admin | Updated: January 16, 2015 01:07 IST

बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद मागील तीन-चार वर्षापासून जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे

बाबूराव चव्हाण , उस्मानाबादमागील तीन-चार वर्षापासून जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. मात्र पुरेसा निधीच मिळत नसल्यामुळे बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला खीळ बसत आहे. असे असले तरी दुसरीकडे प्रशासन मात्र ‘सारे अलबेल’ असल्याचे कागदी घोडे नाचवित आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यांसाठी १० हजार गेट बसविण्याची आवश्यकता आहे. सिंचनाखालील क्षेत्र वाढावे, यासाठी मागील काही दशकात जिल्ह्यात सातत्याने प्रयत्न झाले. त्यानुसार जिल्ह्यात थोडेथोडके नव्हे तब्बल ९७३ बंधारे उभारण्यात आले. मात्र, त्यानंतर बंधाऱ्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. सध्या जिल्ह्यातील बंधाऱ्यांची स्थिती पाहिली असता अनेक बंधाऱ्यांचे गेट चोरीला गेले आहेत. अनेक बंधारे मोडकळीस आलेले आहेत. या बंधाऱ्यांची दुरूस्ती मात्र होत नाही. जिल्ह्यात सध्या ९७३ बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यासाठी १० हजार ५८७ गेटची गरज आहे. या बंधाऱ्यांवर बसविण्यात आलेल्या एकूण ३९ हजार १३८ गेटपैकी २८ हजार ५४५ गेट पाणी अडविण्यासाठी उपयुक्त आहेत. दुष्काळी जिल्हा म्हणून राज्यात उस्मानाबादचे नाव आघाडीवर आहे. जिल्ह्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या माध्यमातून ८३,५७५ दसलक्ष घनफुट एवढे पाणी अडविणे शक्य आहे. मात्र, ५२ बंधाऱ्यांना गेटच नाहीत, तर १२५ बंधारे मोडकळीस आलेले आहेत. त्यामुळे पावसाचे सारे पाणी वाहून गेले आहे. शासनाने जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरूस्ती व गेट बसविण्यासाठी पुरेसा निधी दिला तर शेतकऱ्यांना दुष्काळावर मात करणे सहज शक्य होईल.