शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात

By admin | Updated: July 10, 2016 01:08 IST

औरंगाबाद : जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद : जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. शून्यावर आलेला विभागातील सरासरी उपयुक्त जलसाठा आठवडाभरातच दोन टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. सद्य:स्थितीत विभागातील सर्व धरणांमध्ये १३५ दलघमी उपयुक्त जलसाठा झाला आहे.मराठवाड्यातील बहुतेक लहान मोठे प्रकल्प यंदा एप्रिल महिन्यातच कोरडे पडले होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर विभागातील सर्व प्रकल्पांमधील सरासरी उपयुक्त साठा शून्य टक्क्यावर आला होता. मात्र, गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी आले आहे. लघु, मध्यम आणि मोठ्या अशा सर्वच प्रकल्पांतील जलसाठा किंचित वाढला आहे. मराठवाड्यात सध्या ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी एक टक्का जलसाठा आहे. विभागात मध्यम प्रकल्पांतील साठ्यात चांगल्या प्रमाणात भर पडली आहे. मराठवाड्यात एकूण ७५ मध्यम प्रकल्प आहेत. आता या प्रकल्पांमध्ये ३२ दलघमी म्हणजे सरासरी ३.४६ टक्के इतका जलसाठा झाला आहे. तर विभागातील ७३२ लघु प्रकल्पांमध्येही सरासरी ३.२१ टक्के जलसाठा आहे. विष्णूपुरी, निम्न दुधना आणि पेनगंगा प्रकल्पांचा अपवाद विभागातील आठही मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या शून्य टक्के उपयुक्त साठा आहे. दहा दिवसांपूर्वी विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा ३ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. तो आता १८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. निम्न दुधना प्रकल्पात सध्या ७.३८ टक्के आणि पेनगंगा प्रकल्पात दोन टक्के उपयुक्त जलसाठा आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण अद्यापही मृतसाठ्यातच आहे. जायकवाडीतील जिवंत साठा मार्च महिन्यातच संपलेला आहे. तेव्हापासून या धरणाच्या मृतसाठ्यातून पाणी वापर सुरू आहे. चालू आठवड्यात या धरणात १० दलघमीची आवक झाली आहे. असे असले तरी मृतसाठ्याची पातळी भरून धरण जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २५२ दलघमी इतक्या पाणीसाठ्याची गरज आहे. त्यानंतरच या धरणाच्या जिवंत साठ्यात पाणी साठण्यास सुरुवात होणार आहे.