शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

स्पर्धेची सुरुवात, अन् शेवटही श्रमदानानेच !

By admin | Updated: May 22, 2017 23:33 IST

धारूर : पाणी फांऊडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धामध्ये अखेरच्या टप्यात जायभायवाडी येथे श्रमदानाच्या कामाला गती आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधारूर : पाणी फांऊडेशनच्या वतीने सुरू असलेल्या वॉटर कप स्पर्धामध्ये अखेरच्या टप्यात जायभायवाडी येथे श्रमदानाच्या कामाला गती आली आहे. मागील पंचेचाळीस दिवसांपासून पुरूषाबरोबर महिला श्रमदान करीत आहेत. स्पर्धेत यश मिळविण्यासाठी ग्रामस्थांनी शेतीची कामे बाजूला ठेवून कुटूंबातील सर्वजण श्रमदान करीत आहेत.तालुक्यात वॉटर कप स्पर्धेमध्ये जायभायवाडी, कोळपिंपरी, आम्ला, व्हरकटवाडी, आवरगाव, कारी आदी गावात कामे सुरू आहेत. ग्रामस्थांकडून सर्वच गावात श्रमदानाचे काम करण्यात येत आहे .पिंपरवाडा गावांतर्गत जायभायवाडी मौजा हे बालाघाटाच्या डोंगरशीत वसलेले गाव आहे. लोकसंख्या पाचशेच्या जवळपास असून उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत होते. पाण्याचे महत्त्व ओळखून ग्रामस्थांनी स्पर्धेत सहभाग घेतला. ८ एप्रिलपासून येथे श्रमदानाची कामे करण्यात येत आहेत. या कामात २०० महिला परिश्रम घेत आहेत. सासू व सून सोबतच सकाळी श्रमदानास निघातात. मुलेही आई वडिलांबरोबर श्रमदान करीत आहेत. दिवस उजाडताच गावकरी घरची कामे उरकून श्रमदानाला निघतात. हनुमान मंदीराजळ महिला - पुरूष एकत्रित येऊन कोणत्या भागात श्रमदान करावयाचे ते निश्चित केले जाते. त्या दिशेने ग्रामस्थ निघतात. २२ मे पर्यंत श्रमदानाचे काम करण्यात येणार आहे. ४५ दिवसांपासून श्रमदानाचे काम सुरू आहे. ग्रामस्थांनी मशागत बाजूला ठेवून श्रमदानात सातत्य ठेवले आहे.अखेरच्या टप्यात रविवारी सकाळी डॉ. अविनाश पौळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, पाणी फांऊडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे, माजी उपनगराध्यक्ष माधव निर्मळ यांनी व त्यांच्या सहकार्यानी श्रमदान केले. खोल चर व माती नाला बांधाच्या कामासाठी यंत्राच्या सहाय्याने कामे सुरू आहेत. डिझेल, पैसा अपुरा पडू नये म्हणून अनेकांनी मदत केली आहे.