शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

४२ केंद्रांवर कापूस खरेदीला सुरूवात

By admin | Updated: November 17, 2015 00:32 IST

बीड : कापूस खरेदी हंगामाला सुरूवात झाली असून, जिल्ह्यात ४२ केंद्रांवर कापूस खरेदीला गेल्या १५ दिवसांपासून सुरूवात झाली आहे.

बीड : कापूस खरेदी हंगामाला सुरूवात झाली असून, जिल्ह्यात ४२ केंद्रांवर कापूस खरेदीला गेल्या १५ दिवसांपासून सुरूवात झाली आहे. आतापर्यंत १ लाख ६९ हजार ८२३ क्विंटल कापसाची खरेदी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.कापूस हंगाम २०१५-१६ ला सुरूवात केली असून, आतापर्यंत केवळ बाजार समितीनेच कापूस खरेदीला सुरूवात केली आहे. सीसीआय कॉटन फेडरेशन व खासगी केंद्रांना अद्याप सुरूवात झाली नाही. मात्र, आगामी काळात ही केंद्रे लवकर सुरू होतील यात शंका नाही. बीड तालुक्यात ८, गेवराई - १०, माजलगाव - ६, धारूर - ४, परळी - ४, केज - २, वडवणी - २, कडा - ६ येथे कापूस खरेदी सुरू असून, ३१ आॅक्टोबर पर्यंत १ लाख ६९ हजार ८२३ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक भाव मिळत नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे. दुष्काळ पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या कापूस अधिक भावाने खरेदी जाईल अशी आशा होती. मात्र, ती आता फोल ठरत आहे. किमान ४२०० ते कमाल ४४०० रूपये असा भाव प्रतिक्ंिवटलला दिला जात आहे. हमी दर भाव ३८०० ते ४१०० रूपयांदरम्यान आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील माजलगाव व गेवराई या भागात कापसाचे विक्रमी उत्पादन होते. गेवराई येथील कापूस परराज्यात विक्रीसाठी जातो.४मात्र, यावर्षी दुष्काळ मुक्कामी असल्यामुळे उत्पादन कमी झाला असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्ती करीत आहेत.४कापूस खरेदीचा हंगाम संपल्यानंतर गेल्या वर्षीची आणि या वर्षीच्या कापसाच्या खरेदीच्या तुलनेवरून किती फरक आला आहे याची आकडेवारी स्पष्ट होईल.४शासनाने हमी भाव वाढवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. बाजार समितीच्या परवानाधारक केंद्रांवर कापूस खरेदीला येणाऱ्यांची संख्याही कमी आहे.४या ठिकाणावर अधिक भाव नाही मिळाला तर शेतकरी परराज्यात कापूस विक्री करतात हा जुना अनुभव आहे. परंतू सध्या कापूस बाहेर विक्रीसाठी नेण्यासारखी परिस्थिती नाही.४जिल्ह्यातच चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्यांना माल घेऊन इतरत्र जाण्याची गरज राहणार नाही.