शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

आदिशक्तीच्या उत्सवाला आजपासून सुरूवात

By admin | Updated: September 25, 2014 00:58 IST

औरंगाबाद : गणेशोत्सवानंतर शहरवासी ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या नवरात्रोत्सवाला उद्या २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे.

औरंगाबाद : गणेशोत्सवानंतर शहरवासी ज्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत होते, त्या नवरात्रोत्सवाला उद्या २५ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. येथे शहरात नऊ दिवस आदिशक्तीचा जागर करण्यात येणार आहे. विविध भागांतील देवीच्या मंदिरांची रंगरंगोटी करण्यात आली असून, विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. शहराचे ग्रामदैवत कर्णपुरा येथील देवीच्या मंदिरात पहाटे ३ वाजेपासून महापूजेला विधिवत सुरुवात होणार आहे. सकाळी ६ वाजता घटस्थापना करण्यात येईल. ७.२५ वा. मंदिरात देवीची आरती करण्यात येणार आहे. यानंतर कर्णपुरा यात्रेला सुरुवात होईल. शहरातील प्रती माहूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको एन-९ येथील रेणुकामाता मंदिरातही सकाळी पूजा, घटस्थापना व आरती करण्यात येणार आहे. दररोज दुपारी मंदिरात विविध भजनी मंडळ भजन जोगवा म्हणणार आहेत. बीड बायपास रोडवरील संग्रामनगरचे हरिहर सद्गुरू शक्तिपीठ येथे शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे. येथे दररोज पहाटे ५ वाजता प्रात:स्मरण, ६ वाजता शास्त्रीय संगीत सेवा, ९ वाजता आरती, ९.३० वाजता स्तुती, स्तोत्र पठण व प्रदक्षिणा, दुपारी १२ वाजता आरती व महाप्रसाद वाटप. १ ते ३ वाजेदरम्यान श्रीशक्ती सामर्थ्य ग्रंथ पारायण, ४ ते ५.३० वाजेदरम्यान भक्तिसंगीत सेवा, सायंकाळी ६ वाजता राजोपचार पूजा, ७ वाजता आरती व रात्री ९.३० ते ११ वाजेपर्यंत पंचपदी (भजन) होणार आहे. रंगारगल्ली येथील हिंगुलंबिका देवीची मिरवणूक दुपारी २ वाजता निघणार आहे. सिटीचौक, मछली खडक, गुलमंडीमार्गे मिरवणूक मंदिरात येणार आहे. वीरशैव लिंगायत महिला मंडळातर्फे दुपारी ४ वाजता देवीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. पानदरिबा ते संगमेश्वर मठ, फकीरवाडी यादरम्यानही मिरवणूक काढण्यात येणार आहे. अयोध्यानगर दुर्गामाता सार्वजनिक नवरात्र उत्सव समितीतर्फे देवीची स्थापना करण्यात येणार आहे आणि नऊ दिवस देवीची उपासना आणि विविध स्पर्धा, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.