शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

रबी पेरणीत बीड अव्वल, तर औरंगाबाद पिछाडीवर

By | Updated: November 29, 2020 04:06 IST

औरंगाबाद : बीड, जालना, औरंगाबाद या तिन्ही जिल्ह्यांत ७० टक्के रबी पीकपेरणी पूर्ण झाली आहे. त्यात बीड जिल्ह्यात ९६ ...

औरंगाबाद : बीड, जालना, औरंगाबाद या तिन्ही जिल्ह्यांत ७० टक्के रबी पीकपेरणी पूर्ण झाली आहे. त्यात बीड जिल्ह्यात ९६ टक्के पेरणी झाली असून, जालना जिल्ह्यात ६३ टक्के, तर औरंगाबाद जिल्ह्यात ४२ टक्के पेरणी झाल्याची नोंद विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात झाली आहे. ६ लाख ६४ हजार ६३ हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी ४ लाख ६६ हजार ८५० हेक्टरवर रबी तृणधान्य, कडधान्ये, गळीत धान्याची ७० टक्के लागवड पूर्ण झाली असून, पेरणीत बीड जिल्हा अव्वल असून, औरंगाबाद पिछाडीवर असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

जालना जिल्ह्यात रबी ज्वारी ५२ हजार १९४, गहू १८ हजार ३५३, मका ५ हजार ३१२, हरभरा ३३ हजार २५२ हेक्टरवर पेरणी झाली. बीड जिल्ह्यात रबी ज्वारी १ लाख ४३ हजार ७१७, गहू १९ हजार ५२८, मका २ हजार २८२, हरभरा १ लाख ४ हजार ७६ हेक्टरवर लागवड पूर्ण झाली, तर औरंगाबाद जिल्ह्यात रबी ज्वारी २३ हजार ३११, गहू ३० हजार २३, मका १३ हजार ९५१, हरभरा १९ हजार ५६८ हेक्टरवर लागवड झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यात रबीचे सरासरी २ लाख ८ हजारपैकी ८७ हजार २६३ हेक्टर, जालना जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ३६८ पैकी १ लाख ९ हजार ७७१ हेक्टर, तर बीड जिल्ह्यात २ लाख ८१ हजार ४८० हेक्टरपैकी २ लाख ६९ हजार ८१६ हेक्टरवर रबी पिकांची पेरणी झाली. बीडमध्ये अनुक्रमे रबी ज्वारी, हरभरा, गव्हाच्या क्षेत्रावर, जालना जिल्ह्यातही बीड सारखेच प्रमाण असून, औरंगाबादमध्ये गहू, हरभऱ्याची पेरणी अधिक असून, मक्याचे क्षेत्र सरासरीच्या दीडपट वाढले आहे.