शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

बीडमध्ये पाणी झाले लाखमोलाचे !

By admin | Updated: June 2, 2014 00:49 IST

सोमनाथ खताळ , बीड बीड न.प.कडून आठवड्याला पाणी दिले जात असल्याने शहराला टंचाईचा सामना करावा लागतो. यातच शासकीय, निमशासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचे जार आणले जातात.

सोमनाथ खताळ , बीड बीड न.प.कडून आठवड्याला पाणी दिले जात असल्याने शहराला टंचाईचा सामना करावा लागतो. यातच शासकीय, निमशासकीय कार्यालयात पिण्याच्या पाण्याचे जार आणले जातात. मात्र आणलेल्या जारमधील पाण्याची शुद्धता आहे का? हा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. दरम्यान, बीडमध्ये पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागत असून, रोजची उलाढाल ४५ लाखांच्या घरात असल्याची माहिती समोर आली आहे. शहरात सध्या विविध भागात १० ते १५ खाजगी पाणी शुद्धीकरणाचे कारखाने आहेत. यातील अनेकांना पाणी विकण्याचा परवाना सुद्धा नाही. परवाना नसतानाही हे व्यावसायिक आपला पाणी विक्रीचा व्यवसाय खुलेआम चालवित आहेत. परंतु खरे म्हणजे या कारखान्यांमधून जे शुद्ध पाणी विक्रीसाठी आपल्याला विकत दिले जाते, ते खरेच शुद्ध आहे का? त्या पाण्यावर योग्य प्रक्रिया केली आहे का? याची कोणीही खातरजमा न करताच बिनधास्तपणे पाणी विकत घेऊन पितात. परवाना काढणे गरजेचे कोणतेही खाद्य पदार्थ अथवा वस्तू विकायची असेल तर त्यासाठी संबंधित विभागाकडून परवाना काढणे आवश्यक असते. मात्र बीडमधील एक दोन वगळले तर कोणाकडेच पाणी विक्रीचा परवाना नाही, अशी धक्कादायक माहिती आहे. पाण्यातून पैसा कमविण्यासाठी अनेकांनी विना परवाना कंपन्या उघडल्या आहेत. गैरप्रकारास जबाबदार कोण? हे पाणी विक्रेते पाण्यावर योग्य ती प्रक्रिया न करताच पाणी विक्री करतात. यातील काही कारखानदार पाणी शुद्ध करण्यासाठी विविध प्रकारचे औषध वापरतात. मात्र हे औषध पाण्यात टाकले की, पाणी कडसर लागते, असा अनुभवही काही लोकांनी सांगितले. तर काही जण या पाण्याला केवळ फिल्टर करून थंड करतात व ते विकतात. मात्र या पाण्यापासून एखादा आजार झाला अथवा एखाद्याच्या जीवितास धोका पोहोचला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत अन्न, औषध प्रशासन अधिकारी डी.जी. वीर म्हणाले, पाणी विक्रेत्यांना परवाना देण्याचा अधिकार आम्हाला नाही, आम्ही केवळ बाटली बंद पाणी विक्रेत्यांनाच परवाने देतो. स्पर्धक वाढल्यामुळे भाव कमी एका पाणी विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, आम्ही पाणी शुद्धतेवर भर देतो. पाणी शुद्ध झाले की नाही हे पाहण्यासाठी ते लॅबला पाठविले जाते त्यानंतरच ते ग्राहकाला दिले जाते. पूर्वी एका जार चा भाव ४० ते ५० रूपये होता आता स्पर्धक वाढल्यामुळे यामध्ये घट झाली असून हे भाव आता ४० ते २० रूपयापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. विनापरवाना पाणी विक्रेत्यांमुळे हे भाव कमी करावे लागले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालये, व्यापार्‍यांनी लावला रतीब शहरात याबाबत सर्वेक्षण केले असता, जास्तीत जास्त पाणी विकत घेणार्‍यांची संख्याही कार्यालये आणि छोट्या- व्यापार्‍यांचीच आहे. ४० टक्के कार्यालये आणि ४० टक्के व्यापारी असे पाणी विकत घेत असल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारीवरून समोर आले आहे. तर इतर २० टक्के हे लग्न सोहळा, इतर कार्यक्रम व घरी पिण्यासाठी विकत घेत आहेत. पाण्यासाठी ‘अ‍ॅडव्हान्स बुकींग’ आपल्याकडे एखादा घरगुती कार्यक्रम, लग्न सोहळा आदी कार्यक्रम असतील तर या पाण्याची दोन दिवसा अगोदरच बुकींग करून ठेवावी लागते. ऐन वेळेला हे पाणी मिळत नाही. अनेकदा ग्राहकांची अडचण ओळखून जास्तीचा भाव सांगितला जातो. थंडावा संपला की बदलते चव ज्या दिवशी पाणी थंड आहे, त्यादिवशी हे पाणी पिण्यासाठी चांगले लागते. मात्र या पाण्यातील थंडावा निघून गेला की, हे पाणी कडसर लागते व त्याचा वासही येत असल्याच्या प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या.