शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

जिल्ह्यातील जलसाठ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:58 IST

बीड जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे मे अखेरनंतर प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी आहे तो पाणीसाठी तब्बल १५ टक्क्यांनी घटला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे मे अखेरनंतर प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी आहे तो पाणीसाठी तब्बल १५ टक्क्यांनी घटला आहे. मे अखेर १४४ जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा २९.७१ टक्के इतका होता. हा पाणीसाठा सद्यस्थितीत १५.७५ टक्क्यांवर आला आहे. पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील जलसाठे अद्यापही तहानलेलेच आहेत.जिल्ह्यात माजलगाव व मांजरा असे दोन मोठे, १६ मध्यम तर १२६ लघु असे एकूण १४४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता ही ११३५.२३२ दलघमी इतकी असून एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता ८८८.७३६ दलघमी इतकी आहे.या प्रकल्पांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठवण क्षमतेच्या तुलनेत आजघडीला अर्धा पावसाळा संपत आला असताना फक्त १३९.९६२ दलघमी म्हणजेच १५.७५ टक्के इतका पाणीसाठा शेष राहिला आहे. मे अखेर माजलगाव धरणात ३५.८०० दलघमी इतका म्हणजेच २१.०९ टक्के इतका उपयुक्त साठा शिल्लक होता तर मांजरा धरणात ५२.८० दलघमी म्हणजेच २९.७१ टक्के इतका साठा उपलब्ध होता.आजघडीला माजलगाव धरणात केवळ १३.१४ टक्के तर मांजरा धरणात २२.८६ टक्के पाणीसाठा राहिला आहे. अर्धा पावसाळा संपत असताना जिल्ह्यातील १४४ पैकी ७ प्रकल्प कोरडेठाक असून तब्बल ६८ प्रकल्पांमधील पाणी जोत्याखाली गेले आहे.सध्या १३ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी उपलब्ध आहे. याशिवाय १५ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्क्यांदरम्यान, ४ प्रकल्पांमध्ये ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान तर फक्त एका प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी उपलब्ध असल्याची नोंद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अहवालात घेण्यात आलीआहे.