शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
3
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
4
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
5
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
6
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
7
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
8
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
9
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
10
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
11
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
12
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
13
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
14
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
15
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
16
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
17
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
18
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
19
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
20
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?

जिल्ह्यातील जलसाठ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:58 IST

बीड जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे मे अखेरनंतर प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी आहे तो पाणीसाठी तब्बल १५ टक्क्यांनी घटला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे मे अखेरनंतर प्रकल्पांतील पाणीसाठ्यात वाढ होण्याऐवजी आहे तो पाणीसाठी तब्बल १५ टक्क्यांनी घटला आहे. मे अखेर १४४ जलाशयातील उपयुक्त पाणीसाठा २९.७१ टक्के इतका होता. हा पाणीसाठा सद्यस्थितीत १५.७५ टक्क्यांवर आला आहे. पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील जलसाठे अद्यापही तहानलेलेच आहेत.जिल्ह्यात माजलगाव व मांजरा असे दोन मोठे, १६ मध्यम तर १२६ लघु असे एकूण १४४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता ही ११३५.२३२ दलघमी इतकी असून एकूण उपयुक्त पाणी साठवण क्षमता ८८८.७३६ दलघमी इतकी आहे.या प्रकल्पांमध्ये एकूण उपयुक्त पाणीसाठवण क्षमतेच्या तुलनेत आजघडीला अर्धा पावसाळा संपत आला असताना फक्त १३९.९६२ दलघमी म्हणजेच १५.७५ टक्के इतका पाणीसाठा शेष राहिला आहे. मे अखेर माजलगाव धरणात ३५.८०० दलघमी इतका म्हणजेच २१.०९ टक्के इतका उपयुक्त साठा शिल्लक होता तर मांजरा धरणात ५२.८० दलघमी म्हणजेच २९.७१ टक्के इतका साठा उपलब्ध होता.आजघडीला माजलगाव धरणात केवळ १३.१४ टक्के तर मांजरा धरणात २२.८६ टक्के पाणीसाठा राहिला आहे. अर्धा पावसाळा संपत असताना जिल्ह्यातील १४४ पैकी ७ प्रकल्प कोरडेठाक असून तब्बल ६८ प्रकल्पांमधील पाणी जोत्याखाली गेले आहे.सध्या १३ प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी उपलब्ध आहे. याशिवाय १५ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टक्क्यांदरम्यान, ४ प्रकल्पांमध्ये ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान तर फक्त एका प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणी उपलब्ध असल्याची नोंद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणच्या अहवालात घेण्यात आलीआहे.