शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील निराधारांना ‘मायेची चादर’

By admin | Updated: October 18, 2016 00:15 IST

कळंब कडाक्याच्या थंडीत उबदार कपड्यांची सगळ्यांनाच आवश्यकता भासते.

उन्मेष पाटील कळंबकडाक्याच्या थंडीत उबदार कपड्यांची सगळ्यांनाच आवश्यकता भासते. त्यानुसार हिवाळा सुरु होण्याअगोदरच अनेकजण या कपड्यांची खरेदी करतात. मात्र रस्त्यावर राहून दोन वेळच्या भाकरीचा शोध घेणाऱ्या अनेकांच्या नशीबी हे उबदार कपडे येत नाहीत. त्यामुळे कडाक्याच्या थंडीतच त्यांना लेकरा-बाळांसह रात्र काढावी लागते. अशा गरीब, कष्टकऱ्यांना थंडीपासून स्वताचा बचाव करता यावा म्हणून येथील तरुणांतर्फे ‘मायेची चादर’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून मागील वर्षी तब्बल ७०० गरजूंपर्यंत चादरी, शाल, गोधडी हे साहित्य पोहंचविण्यात आल्या. सध्या घरोघरी दसऱ्याची साफसफाई सुरु आहे. त्यामुळे या उपक्रमासाठी आवश्यकता नसलेले कपडे नागरिकांकडून गोळा करण्याचे काम ही तरुणाई करीत आहे.‘गारवा खूप आहे, अंग चोरून किती घेऊ?’आपल्याच सारख्या हाडामासांना मायेची उब देऊ’असा ठाम निश्चय करून कळंब शहरातील १५ ते २० युवकांनी मागील वर्षी घरोघरी जाऊन जुन्या, वापराअभावी पडून असणाऱ्या चादरी, शाल, गोधडी गोळा केल्या. मित्र परिवार, नातेवाईक त्यांच्या संदर्भातून मिळणारे काही दानशूर अशांना संपर्क करून थेट त्यांच्या घरी जाऊन युवकांनी हे साहित्य गोळा केले. मागील वर्षी थंडीने अत्युच्य पातळी गाठली होती. या थंडीत घरी शेकोटी घेत किंवा रूम हिटरची ऊब न घेता या तरुणांनी शहराशेजारील भटक्या लोकांची पालं गाठली. या ठिकाणी दोन घासासाठी झगडणाऱ्या अनेकांकडे थंडीपासून बचावासाठी अंगावरील वस्त्रांशिवाय काहीही नव्हते. त्यामध्ये लहान मुले, वृध्दांची अवस्था तर अतिशय बिकट होती. हे चित्र पाहून अस्वस्थ झालेल्या या युवकांनी गोळा केलेले साहित्य या उघड्या कुटुंबांना देऊन त्यांना मायेची ऊब दिली. एवढ्यावरच न थांबता या तरुणांनी ग्रामीण भागात सुरू असलेल्या चारा छावणीवरील शेतकऱ्यांनाही हे साहित्य पुरविले.सध्या घराघरात दसऱ्यासाठी साफसफाई सुरू आहे. या सफाईमध्ये भंगारात निघणाऱ्या चादरी, शाली, गोधडे तसेच इतर कपडे टाकून न देता ते आम्हाला द्यावीत असे आवाहनच या युवकांनी विविध माध्यमांद्वारे केले आहे. यंदा जवळपास गरजू पाच हजार लोकांपर्यंत हे साहित्य पोहोचविण्याचा या युवकांनी संकल्प केला आहे. गतवर्षी राबविलेल्या या उपक्रमानंतर अनेकांनी यंदा स्वत:हून स्वेटर, मफलर, शाल, चादरी स्वताहून या तरुणांकडे आणून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याउपरही काही मंडळीनी अशा कुटुंबियांसाठी काम करण्याची तयारी दर्शविली आहे. हा उपक्रम राबवित असताना भटक्या तसेच कष्टकरी समाजाचे प्रश्न त्यांच्या समस्या आम्हाला समजल्या. यापुढील काळात सर्व समाजाच्या सहकार्याने त्यांच्यासाठी इतरही उपक्रम राबविण्याचा विचार आता ही तरुणाई करु लागली आहे.‘मायेची चादर’ हा उपक्रम गतवर्षी शहर व परिसरापुरता मर्यादित होता. यंदा हा उपक्रम राबविण्यासाठी इतर जिल्ह्यातूनही काही संस्था, युवक मंडळे संपर्कात आहेत. धिम्म्या गतीने हा उपक्रम चळवळीचे स्वरूप घेते आहे. या सगळ्यात समाजाच्या शेवटच्या घटकासाठी काहीतरी काम केल्याचे समाधान या युवकांच्या चेहऱ्यावर आहे. या उपक्रमात शहरातील बाळासाहेब कथले, सुमित बलदोटा, नितीन हारकर, पृथ्वीराज देशमुख, यश सुराणा अग्रभागी आहेत. तरुणपिढी सध्या मोबाईलवेडी व टेक्नोसॅव्ही झाली असताना कळंबच्या या युवकांनी समाजसेवेचं व्रत हाती घेतलं आहे. दररोजच्या नोकरी-व्यवसायातून थोडा वेळ काढून ही मंडळी समाजासाठी उपक्रम राबवित आहे ही बाब कौतुकाची असल्याच्या प्रतिक्रिया शहरवासियांतून व्यक्त होत आहेत.