शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

कारवाईला घाबरतेय पालिका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:17 IST

रमाई घरकुल योजना व स्वच्छ भारत मिशन योजनेत अनुदान लाटलेल्या बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्यास बीड पालिका घाबरत असल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : रमाई घरकुल योजना व स्वच्छ भारत मिशन योजनेत अनुदान लाटलेल्या बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करण्यास बीड पालिका घाबरत असल्याचे समोर आले आहे. एकीकडे सर्व सामान्यांना गुन्हे दाखल करण्याचे अश्वासन देणा-या पालिकेकडून बोगस लाभार्थ्यांना अप्रत्यक्षरित्या पाठबळ दिले जात आहे. पालिकेचा हा कारभार केवळ सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा असल्याचे बोलले जात आहे.बीड नगर पालिकेत २०१२ पासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकासाठी रमाई घरकुल योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. बीड शहरात पाच वर्षांत ५१७ घरकुल मंजूर झाले. पैकी १९ लाभार्थ्यांनी बोगस पीटीआर, जातीचा दाखला आदी कागदपत्रे बनावट दाखवून या योजनेसाठी आपण पात्र असल्याचे दाखवले. चौकशीअंती १९ बोगस लाभार्थ्यांनी घरकुल न बांधताच पालिकेची फसवणूक करून ७५ हजार रूपयांचा पहिला हप्ता देखील उचलला होता. त्यानंतर या १९ जणांवर गुन्हे दाखल करण्याचे पत्र पेठबीड पोलीस ठाण्यात बांधकाम अभियंत्यांनी दिले. परंतु प्रत्यक्षात गुन्हा दाखल झालाच नाही. याचा पाठपुराव्यास अभियंत्यांनी आखडता हात घेतला. महिना उलटूनही गुन्हे दाखल न झाल्यामुळे बांधकाम अभियंत्यांची बोगस लाभार्थ्यांशी हातमिळवणी असल्याचे बोलले जात आहे. आपण ठाण्यात अर्ज दिला आहे, असे सांगून सीईओंची दिशाभूल करणा-या अभियंत्यांचीच चौकशी करण्याची मागणी होत आहे.पोलीस ठाण्यात अर्ज दिल्यानंतर घरकुल योजनेत बांधकाम अभियंता तर स्वच्छ भारत मिशन अभियानात स्वच्छता निरीक्षकांकडून पाठपुरावाच करण्यात आलेला नाही.वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई केली जाणार असे, दोन महिन्यापूर्वी निरीक्षकांनी सांगितले होते. अद्यापही याच्यावर कसलीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे अधिका-यांच्या कार्यक्षमतेवर एका प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.