शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

कोरोनामुळे सत्र न्यायालय एकाच सत्रात करणार न्यायदान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : राज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत खबरदारीच्या उपायांसह तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होण्यासाठी राज्यातील ...

औरंगाबाद : राज्यात कोरोनाच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत खबरदारीच्या उपायांसह तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा व सत्र न्यायालये आणि त्यांच्या कार्यक्षेत्रातील अन्य कनिष्ठ न्यायालये सोमवारपासून अडीच तासांच्या एकाच सत्रात न्यायदान करतील, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी जारी केला आहे.

त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक (रजिस्ट्रार जनरल) एस. जी. दिघे यांनी १६ एप्रिल रोजी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटल्यानुसार वरील सर्व न्यायालये १९ एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत अडीच तासांच्या एकाच सत्रात रिमांड, जामीन अर्ज आणि तातडीच्या फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांवर सुनावणी घेतील. प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी आवश्यक तेवढे न्यायिक अधिकारी (न्यायाधीश) आणि ५० टक्के न्यायालयीन कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने कर्तव्यावर बोलवावे. त्यांनी स्थानिक परिस्थितीनुसार न्यायालयीन कामाची वेळ निश्चित करावी. सर्व न्यायिक अधिकाऱ्यांनी मुख्यालयातच हजर राहावे. प्रधान जिल्हा न्यायाधीशांच्या परवानगीशिवाय मुख्यालयाबाहेर जाऊ नये.

सर्व पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला असेल, अशा प्रकरणामध्ये निकाल/आदेश द्यावेत. वरील सर्व न्यायालये दर शनिवारी बंद राहतील. केवळ रिमांड आणि तातडीच्या प्रकरणातच शनिवारी आदेश द्यावेत. वकील, पक्षकार, साक्षीदार किंवा आरोपी सुनावणीला गैरहजर राहिल्याच्या कारणावरून या काळात कुठलाही दंडात्मक आदेश करू नये. न्यायालय परिसरातील उपहारगृह आणि वकिलांचा कक्ष (बार रूम) बंद ठेवावेत. केंद्र आणि राज्य शासनाने जारी केलेल्या सुरक्षेच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे परिपत्रकात म्हटले आहे.