शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे जिल्ह्यात सहमतीचे राजकारण मजबूत

By admin | Updated: January 29, 2017 23:52 IST

लातूर :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी झाली असल्याचे आमदार दिलीपराव देशमुख यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले़

लातूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा एक असून दोघांचेही ध्येय एक आहे़ त्यामुळे मन आणि विचारांनी आम्ही एकत्र आलो आहोत़ विकासाचा अजेंडा अखंड ठेवण्यासाठी जिल्ह्यात सहमतीचे राजकारण आम्ही यापूर्वीही केले आहे आणि पुढेही करत राहू़ धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमची आघाडी झाली असल्याचे आमदार दिलीपराव देशमुख यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले़ स्थानिक स्वराज्य संस्था सक्षमपणे चालल्या पाहिजेत़ त्यामुळे या निवडणुकीत सक्षम उमेदवाराबरोबर चारित्र्यसंपन्न उमेदवार देण्यावर दोन्हीही पक्षांचा भर राहणार आहे़ जिल्ह्यात सहमतीच्या राजकारणाची परंपरा आहे़ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ़ बाबासाहेब पाटील आणि मी जिल्हा परिषद, जिल्हा बँकेत गेल्या ३० वर्षांपासून काम करीत आहोत़ त्यामुळे आघाडी करणे सोपे झाले़ वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चा करून ही आघाडी झाली आहे़ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी यापूर्वी विधानसभा व लोकसभेसाठी झाली होती़ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पहिल्यांदाच आघाडी होत आहे़ तीही राज्यात सर्वप्रथम लातुरात आघाडी झाली आहे़ स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढलो होतो़ आता आघाडी झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर सहज काँग्रेस, राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वासही आ. दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला़ हल्ली निवडणुका विकास व कार्यक्रमांपेक्षा धर्म, संस्कृती आणि जाती-पातीवर होत आहेत़ ही चिंताजनक बाब आहे़ जाती-पातीच्या आणि धर्माच्या नावावर निवडणुका होत असल्याने दरी निर्माण होण्याची शक्यता आहे़ ही चुकीची प्रथा रोखण्याची जबाबदारी निधर्मी पक्षांवर आहे़ सर्वाधिक जबाबदारी काँग्रेस पक्षाची असल्याचेही आ़ दिलीपराव देशमुख म्हणाले़