शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे जिल्ह्यात सहमतीचे राजकारण मजबूत

By admin | Updated: January 29, 2017 23:52 IST

लातूर :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी झाली असल्याचे आमदार दिलीपराव देशमुख यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले़

लातूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा एक असून दोघांचेही ध्येय एक आहे़ त्यामुळे मन आणि विचारांनी आम्ही एकत्र आलो आहोत़ विकासाचा अजेंडा अखंड ठेवण्यासाठी जिल्ह्यात सहमतीचे राजकारण आम्ही यापूर्वीही केले आहे आणि पुढेही करत राहू़ धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमची आघाडी झाली असल्याचे आमदार दिलीपराव देशमुख यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले़ स्थानिक स्वराज्य संस्था सक्षमपणे चालल्या पाहिजेत़ त्यामुळे या निवडणुकीत सक्षम उमेदवाराबरोबर चारित्र्यसंपन्न उमेदवार देण्यावर दोन्हीही पक्षांचा भर राहणार आहे़ जिल्ह्यात सहमतीच्या राजकारणाची परंपरा आहे़ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ़ बाबासाहेब पाटील आणि मी जिल्हा परिषद, जिल्हा बँकेत गेल्या ३० वर्षांपासून काम करीत आहोत़ त्यामुळे आघाडी करणे सोपे झाले़ वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चा करून ही आघाडी झाली आहे़ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी यापूर्वी विधानसभा व लोकसभेसाठी झाली होती़ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पहिल्यांदाच आघाडी होत आहे़ तीही राज्यात सर्वप्रथम लातुरात आघाडी झाली आहे़ स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढलो होतो़ आता आघाडी झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर सहज काँग्रेस, राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वासही आ. दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला़ हल्ली निवडणुका विकास व कार्यक्रमांपेक्षा धर्म, संस्कृती आणि जाती-पातीवर होत आहेत़ ही चिंताजनक बाब आहे़ जाती-पातीच्या आणि धर्माच्या नावावर निवडणुका होत असल्याने दरी निर्माण होण्याची शक्यता आहे़ ही चुकीची प्रथा रोखण्याची जबाबदारी निधर्मी पक्षांवर आहे़ सर्वाधिक जबाबदारी काँग्रेस पक्षाची असल्याचेही आ़ दिलीपराव देशमुख म्हणाले़