शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे जिल्ह्यात सहमतीचे राजकारण मजबूत

By admin | Updated: January 29, 2017 23:52 IST

लातूर :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी झाली असल्याचे आमदार दिलीपराव देशमुख यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले़

लातूर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा एक असून दोघांचेही ध्येय एक आहे़ त्यामुळे मन आणि विचारांनी आम्ही एकत्र आलो आहोत़ विकासाचा अजेंडा अखंड ठेवण्यासाठी जिल्ह्यात सहमतीचे राजकारण आम्ही यापूर्वीही केले आहे आणि पुढेही करत राहू़ धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमची आघाडी झाली असल्याचे आमदार दिलीपराव देशमुख यांनी रविवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले़ स्थानिक स्वराज्य संस्था सक्षमपणे चालल्या पाहिजेत़ त्यामुळे या निवडणुकीत सक्षम उमेदवाराबरोबर चारित्र्यसंपन्न उमेदवार देण्यावर दोन्हीही पक्षांचा भर राहणार आहे़ जिल्ह्यात सहमतीच्या राजकारणाची परंपरा आहे़ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आ़ बाबासाहेब पाटील आणि मी जिल्हा परिषद, जिल्हा बँकेत गेल्या ३० वर्षांपासून काम करीत आहोत़ त्यामुळे आघाडी करणे सोपे झाले़ वरिष्ठ नेत्यांसमवेत चर्चा करून ही आघाडी झाली आहे़ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी यापूर्वी विधानसभा व लोकसभेसाठी झाली होती़ स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पहिल्यांदाच आघाडी होत आहे़ तीही राज्यात सर्वप्रथम लातुरात आघाडी झाली आहे़ स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढलो होतो़ आता आघाडी झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर सहज काँग्रेस, राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वासही आ. दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला़ हल्ली निवडणुका विकास व कार्यक्रमांपेक्षा धर्म, संस्कृती आणि जाती-पातीवर होत आहेत़ ही चिंताजनक बाब आहे़ जाती-पातीच्या आणि धर्माच्या नावावर निवडणुका होत असल्याने दरी निर्माण होण्याची शक्यता आहे़ ही चुकीची प्रथा रोखण्याची जबाबदारी निधर्मी पक्षांवर आहे़ सर्वाधिक जबाबदारी काँग्रेस पक्षाची असल्याचेही आ़ दिलीपराव देशमुख म्हणाले़