शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
3
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
4
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
5
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
6
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
7
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
8
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
9
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
10
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
11
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
12
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
13
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
14
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
15
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
16
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
17
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
18
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
19
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
20
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू

जगभरातील ७०३ स्पर्धकांना मात देत औरंगाबादची गायिका ठरली अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 21:10 IST

स्पर्धेत अव्वल ठरलेल्या वर्षा जोशी यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण परभणी जिल्ह्यातील सेलू येथे झाले आहे.

ठळक मुद्दे ‘राजा आणिक राणी’ ही मराठी गीतगायन स्पर्धा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात आॅनलाइन स्वरूपात पार पडली.. तब्बल चार महिने चालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल २२ फेब्रुवारीस जाहीर करण्यात आला.

औरंगाबाद : जगभरातून तब्बल ७०३ गायक-गायिकांचा सहभाग घेतलेल्या व अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘राजा आणिक राणी’ या मराठी सुगम गीतगायन स्पर्धेत औरंगाबादच्या गायिका वर्षा किरण जोशी यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. तब्बल चार महिने चालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल २२ फेब्रुवारीस जाहीर करण्यात आला. अंतिम फेरीतील दहा उत्कृष्ट गायकांतून वर्षा जोशी या सर्वोत्कृष्ट ठरल्या आणि त्यांनी प्रथम येण्याचा मान मिळवला.

माणिक निर्मित व डाॅ. अजित पाडगांवकर, ज्ञानेश देव, अतुल अरुण दाते यांची प्रस्तुती असलेली ‘राजा आणिक राणी’ ही मराठी गीतगायन स्पर्धा नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात आॅनलाइन स्वरूपात पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीत १० जण निवडले गेले. त्यात वर्षा जोशी यांनी पहिला, तर साताऱ्याच्या प्राजक्ता भिडे यांनी दुसरा क्रमांक मिळवला. तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पनवेलच्या मानसी अंबुर्ले व पुण्याच्या स्वरूपा बर्वे यांना विभागून देण्यात आले.

स्पर्धेत अव्वल ठरलेल्या वर्षा जोशी यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण सेलू येथे गंगाधर कान्हेकर, यशवंत चारठाणकर यांच्याकडे झाले. पुढे परभणी येथे कृष्णराज लव्हेकर यांच्याकडे त्यांनी सुगम संगीताचे शिक्षण घेतले. या स्पर्धेत त्यांनी गीतकार मंगेश पाडगावकरांचे ‘आले मनात माझ्या’ हे गाणे सादर केले होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत चैत्रल वझे, डाॅ. कृपा सावंत, मंदार जाधव, स्वानंद भुसारी, राजसी वैद्य, विशाल भांगे आदींनी मजल मारली. दरम्यान, आपल्या बहारदार सादरीकरणाने या मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेवर कलेची मोहोर उमटविणाऱ्या वर्षा जोशी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmusicसंगीत