शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

कृत्रिम सुगंधाचा होतो मारा, तांदळाची खरेदी जपून करा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:05 IST

औरंगाबाद : सुवासिक कालीमुछ तांदळाचे भाव ६५ ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, शहरात स्वस्तात कालीमुछ ग्राहकांना ...

औरंगाबाद : सुवासिक कालीमुछ तांदळाचे भाव ६५ ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. मात्र, शहरात स्वस्तात कालीमुछ ग्राहकांना मिळत आहे. हे व्यावसायिक स्पर्धेमुळे होतेय, असे तुम्हास वाटले तर तुम्ही चक्क फसलात म्हणून समजा. सुगंधी स्प्रे मारलेला आरएनआर तांदूळ कालीमुछ म्हणून ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. यामुळे तांदूळ खरेदी करताना सावधान राहा.

कितीही भरपेट जेवण झालेले असू देत. पण सुगंधी तांदुळाच्या भाताशिवाय त्याला परिपूर्णता येत नाही. कालीमुछ तांदूळ आपल्या सुगंधाने आकर्षित करतो. यंदा या तांदुळाचे भाव ठोक विक्रीत ६० ते ६५ रुपये किलो झाले आहे. किरकोळ किराणा दुकानदार ७० रुपये दराने हा तांदूळ विकत आहे. काही दुकानदार मात्र ४७ ते ५० रुपये किलोने हा तांदूळ विकत आहेत. स्वस्तातील तांदुळाचा सुगंध गायब होतो, अशा तक्रारी वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्यांकडून वाढू लागल्या आहेत.

बाजारपेठेत शोध घेतला तेव्हा यातील सत्य बाहेर आले. ओरिजनल कालीमुछ तांदूळ चंद्रपूर जिल्ह्यातून येतो. मात्र, स्वस्तातील कालीमुछ हा कर्नाटक, आंध्र प्रदेशातून आणला जात आहे. तो कालीमुछ नसून आरएनआर तांदूळ आहे. सुगंधी स्प्रे मारून तो कालीमुछ म्हणून विकला जात आहे. हा तांदूळ पाण्यात भिजविण्यास टाकला की, त्याचा सुगंध उडून जातो. हे दुकानदारांना माहिती आहे, पण ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन ते काळाबाजार करीत आहेत. ठोक व्यापाऱ्यांनी सांगितले की, आजघडीला बाजारात ३० टक्के ओरिजनल तर ७० टक्के डुप्लिकेट कालीमुछ विकला जात आहे. यावरून ग्राहकांची किती मोठी फसवणूक होते हे लक्षात येऊ शकते.

चौकट

असली - नकली कालीमुछ कसा ओळखावा?

* ओरिजनल कालीमुछ तांदूळ दिसण्यास पांढराशुभ्र असतो.

* डुप्लिकेट कालीमुछ थोडा पिवळसर दिसतो.

----

* ओरिजनल कालीमुछ तांदुळाचा दाणा थोडा लांब असतो.

* डुप्लिकेट कालीमुछ तांदूळ आखूड असतो.

---

* ओरिजनल कालीमुछचा सुगंध सौम्यपण दीर्घकाळ टिकतो.

* डुप्लिकेट कालीमुछला स्प्रे मारल्याने सुगंध खूप येतो. त्यापुढे असली कालीमुछचा सुगंध फिक्का पडतो.

* ओरिजनल कालीमुछ तांदूळ पाण्यात भिजवला तरी त्याचा सुगंध राहतो.

* डुप्लिकेट कालीमुछला स्प्रे मारलेला असल्याने पाण्यात टाकताच सुगंध गायब होतो.