शहरं
Join us  
Trending Stories
1
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
2
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
3
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
4
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
5
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
6
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
7
"नवोदित कलाकारांनीही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
8
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
9
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!
10
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
11
नूडल्सने बदललं नशीब? रतन टाटांचा चाहता असलेला 'हा' माणूस कसा झाला इतका श्रीमंत?
12
म्युच्युअल फंड क्षेत्रातही अंबानींची ग्रँड एन्ट्री; ३ दिवसांत १७,८०० कोटी रुपयांची गुंतवणूक
13
IND vs ENG: पराभवानंतर इंग्लंडची मोठी खेळी; लॉर्ड्स कसोटीसाठी स्टार वेगवान गोलंदाजाला आणलं संघात
14
वडील, भावाचा अकाली मृत्यू, तर बहिणीला कॅन्सर, पण जिद्द सोडली नाही, आकाशदीपच्या संघर्षाची भावूक कहाणी
15
तीन वकील अन् 'ती' एकच मागणी! सोनमविरोधात राजा रघुवंशीचं कुटुंब केस लढणार
16
चिंताजनक! तासाला १०० मृत्यू, कोरोनानंतर 'ही' समस्या घेतेय सायलेंट महामारीचं रुप, WHO चा अलर्ट
17
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
18
Guru Purnima 2025: आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच पस्तिशी ओलांडल्यावर गुरुकृपा होते, कारण...
19
"आता संपूर्ण देशाला माहितेय...", युजवेंद्र चहलने कन्फर्म केलं RJ महावशसोबतचं रिलेशनशिप?
20
वर्क-लाइफ बॅलन्ससाठी इन्फोसिसने घेतला मोठा निर्णय! जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट...

बीडच्या पोरांची पुन्हा कमाल !

By admin | Updated: June 3, 2014 00:44 IST

बीड : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्ये औरंगाबाद विभागात अव्वलस्थान पटकावत बीडने यशाची परंपरा कायम राखली.

बीड : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्ये औरंगाबाद विभागात अव्वलस्थान पटकावत बीडने यशाची परंपरा कायम राखली. यावर्षी बीड जिल्ह्याचा निकाल ९२.३६ टक्के इतका लागला़ ही टक्केवारी विभागात सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्या आहेत़ फेब्रुवारी २०१४ मध्ये बारावीच्या परीक्षा पार पडल्या.या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बीड जिल्ह्यातील एकूण २९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २७ हजार ३९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.३६ टक्के इतका आहे. विभागाच्या एकूण टक्केवारीपेक्षा बीडची टक्केवारी सर्वाधिक आहे. मुलीच ठरल्या भारी जिल्ह्यातील एकूण २९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १७ हजार ११० मुले व ९ हजार ९२९ मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. मुलींची टक्केवारी ९४.०४ इतकी आहे. मुलांची टक्केवारी मात्र ९१.४० इतकीच आहे. विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल जिल्ह्याने घवघवीत यश संपादन करुन यशाची परंपरा कायम राखली. कला शाखेचा ८९.०९, वाणिज्य शाखेचा ९४.१९ तर विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल ९६.१३ टक्के इतका जाहीर झाला आहे. त्यामुळे विज्ञानमध्ये बीड जिल्ह्यातील मुले हुशार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ २२३८ विद्यार्थी अनुत्तीर्ण बीड जिल्ह्यातील एकूण २२३८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले़ जिल्ह्यात १६०९ मुली तर ६२९ मुलींचा त्यात समावेश आहे़ अनुत्तीर्ण होणार्‍यांत मुलांचीच संख्या जास्त आहे़ मुलींनी यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली. निकाल पाहण्यासाठी ठिकठिकाणच्या नेटकॅफेंवर गर्दी झाली होती. सकाळपासूनच अनेक परीक्षार्र्थींचे निकालाकडे लक्ष होते. उत्तीर्णांमध्ये आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसत होते. (प्रतिनिधी) गुणवत्ता यादीत लेकींचाच बोलबाला विभागाचा निकाल औरंगाबाद९१.२४ बीड९२.३६ परभणी८९.१२ जालना८९.८७ हिंगोली९०.७१ एकूण९०.९८ तालुका निहाय टक्केवारीपाटोदा९३.०२ बीड९४.२०आष्टी९२.८१ गेवराई९३.०२माजलगाव८९.६६ अंबाजोगाई८९.७९केज९३.७४ वडवणी९४.१८परळी८७.८४ धारूर८६.७६शिरूर८६.७६