शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
4
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
5
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
6
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
7
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
8
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
9
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
10
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
11
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
12
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
13
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
14
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
15
Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
16
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
17
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
18
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
19
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
20
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा

देशातील सर्वांत मोठे पर्यटनस्थळ व्हावे

By admin | Updated: August 30, 2014 00:17 IST

नजीर शेख, औरंगाबाद जगप्रसिद्ध अजिंठा लेणी तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी अप्रतिम शिल्पकलेच्या माध्यमातून बद्धिस्ट कल्चर साकार झाले आहे.

नजीर शेख,  औरंगाबादजगप्रसिद्ध अजिंठा लेणी तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी अप्रतिम शिल्पकलेच्या माध्यमातून बद्धिस्ट कल्चर साकार झाले आहे. वेरूळ हा हिंदू शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. औरंगाबाद, खुलताबाद ही ऐतिहासिक शहरे आहेत, तर बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे सुंदर असे नैसर्गिक ठिकाण आहे. पर्यटनवाढीसाठी या सर्व ठिकाणांचा एकत्र विचार केल्यास हा परिसर भारतातील सर्वांत मोठे पर्यटनस्थळ बनेल, असे मत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक पांडुरंग कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘माझ्या शहरात काय हवे?’ यासंदर्भात बोलत असताना कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांसंबंधी विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, अजिंठ्याचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्ये आहे. लोणार सरोवरासंबंधीही जगभरामध्ये पर्यटक आणि संशोधकांमध्ये आकर्षण आहे. याचा फायदा आपणाला उचलता आला पाहिजे. पर्यटन विकास महामंडळाकडून तसे प्रयत्न चालू आहेत. बुद्धिस्ट कल्चरबाबत जगभरातील जपान, श्रीलंका, थायलँड या देशांमध्ये मोठे आकर्षण आहे. असा वारसा त्यांना जगभरात कुठेच आढळत नाही. त्यामुळे या देशातील विद्यार्थी, पर्यटक आणि संशोधक येथे येण्यास उत्सुक असतात. मात्र, औरंगाबादहून थेट विमानसेवा उपलब्ध नसल्याने येथे येण्यात काही प्रमाणात मर्यादा येतात. औरंगाबाहून अशा देशांमधील राजधानीच्या ठिकाणी थेट विमानसेवा उपलब्ध झाल्यास येथे पर्यटकांची संख्या वाढेल. लोणार सरोवरालगत पर्यटनाच्या दृष्टीने काही सोयी निर्माण करणे गरजेचे आहे. औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक दरवाजे दुरुस्त केल्यास व तिथे त्या दरवाजाच्या निर्मितीसंबंधीची माहिती चांगल्या पद्धतीने लावली गेल्यास हे दरवाजे पाहण्यासाठी शहरात पर्यटकांचा एक दिवसाचा मुक्काम वाढेल. वेरूळ लेणी परिसरातही अद्याप खूप काही गोष्टी करणे आवश्यक आहे. दळणवळणाच्या सोयीबाबत आपण फारसे आग्रही राहत नाही. बदामी आणि जयपूरसारख्या ठिकाणाहून या ठिकाणी रेल्वेसेवा लवकर सुरू व्हावी. पॅलेस आॅन व्हील यासारख्या गोष्टींची येथे आवश्यकता आहे. याबाबत सर्वंकष विचार होणे आवश्यक आहे. आमच्या दृष्टीने पर्यटनवाढीसाठी या परिसरात ‘न्याहारी- निवास योजना’ राबविणे गरजेचे आहे. कोकणामध्ये या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.मात्र, आपल्याकडे अद्याप म्हणावा असा प्रतिसाद नाही. पर्यटकांना स्वस्त दरात निवास आणि न्याहारीची सोय होते, तर जनतेलाही याचा आर्थिकदृष्ट्या फायदा होतो. न्याहारी- निवास योेजनेमुळे वाढीव पर्यटकांना येथे सामावून घेण्यास मदत होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे स्वच्छतेचा अभाव असल्याने विदेशी पर्यटकांची संख्या म्हणावी अशी वाढलेली नाही. मागील दहा वर्षांत केवळ दहा टक्के विदेशी पर्यटक वाढले आहेत. ही संख्या आणखी काही टक्क्यांनी वाढायला हवी. हिल स्टेशन म्हणूनही विचार हवाआज आपण सर्व जण अजिंठा- वेरूळ, बीबीका मकबरा तसेच इतर ऐतिहासिक स्थळांसंबंधीचा आणि त्याच्या विकासाचा विचार करतो. मात्र, त्याचबरोबर म्हैसमाळ, दौलताबाद, अब्दीमंडी या ठिकाणचा परिसर अतिशय सुंदर आहे. औद्योगिक क्षेत्रापासून दूर असलेला हा परिसर स्वच्छ हवा. हा परिसर सुंदर लोकेशनचा आहे. या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणे गरजेचे आहे. मलेशिया, दुबई या ठिकाणी सिमेंटच्या जंगलांची पर्यटनस्थळे आहेत. आपल्याकडे तर संपन्न वारसा आणि नैसर्गिक लोकेशन्स असल्यामुळे या परिसराचा भारतातील सर्वांत मोठे पर्यटनस्थळ म्हणून विकास होऊ शकतो, असे वाटते.