शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘बांधिलकी जपणाऱ्यांच्या पाठीशी राहा’

By admin | Updated: November 16, 2016 00:33 IST

बीड :डॉ. क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी केले.

बीड : दूरदृष्टी ठेवून शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड शहराचा विकास करणाऱ्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन विकासाच्या दिशेने ते जात आहेत. डॉ. क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी केले.बीड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ राकाँचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. अमरसिंह पंडित, राकाँचे उपनेते आ. जयदत्त क्षीरसागर, आ. विक्रम काळे, माजी आमदार उषा दराडे, माजी आ. जनार्दन तुपे, रायुकाँचे शेख शफीक, नवीदुज्जमा, नगराध्यक्षा रत्नमाला दुधाळ, माजी नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर, हेमा पिंपळे आदींची उपस्थिती होती. तटकरे बोलताना म्हणाले, बीड जिल्ह्यात सातत्याने दुष्काळ पडला. अशा स्थितीत बीड शहरात टँकर लावावे लागले नाही, याचा मला अभिमान वाटतो. महाराष्ट्रात केवळ बीडमध्येच महिला बचतगटाची चळवळ सक्रिय आहे. महिलांना लघु उद्योगातून चालना देण्याचे काम डॉ. भारतभूषण क्षीरसागर व त्यांच्या टीमने आतापर्यंत केलेले आहे. सत्ताही उपभोगायचे साधन नाही. सत्तेत असताना सर्वसामान्य जनतेची कामे झाली पाहिजेत, ही पवारसाहेबांची शिकवण आहे. बीडमध्ये डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शहराचा विकास करुन दाखविला आहे. येणाऱ्या काळात उर्वरित कामे देखील मार्गी लागतील, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरसिंह पंडित म्हणाले, शहरातील संघर्षशील नेतृत्व म्हणून डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. शहरातील जनता डॉ. क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवते, असे सांगून त्यांनी बीडमध्ये डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.गेवराईकरांनो, सेवेची संधी द्या !राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गेवराईतही राकाँच्या प्रचाराचा नारळ फुटला. यानिमित्ताने शहरातून कार्यकर्त्यांची रॅली काढण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. तटकरे म्हणाले, सत्ता ही कोणा एकाची बांधिलकी नाही. जनतेची सेवा करण्याची ही एक संधी असते. ही संधी गेवराईकरांनी राकाँला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.दुष्काळी परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीने सरकारसमोर शेतकऱ्यांचे प्रश्न नेटाने लावून धरले. जनतेच्या सुखदु:खाची राकाँला जाणीव आहे. त्यामुळे मतदारांनी भावनेच्या आहारी न जाता विकासाची क्षमता असलेल्या राकाँ उमेदवारांनाच निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी आ. अमरसिंह पंडित, आ. विक्रम काळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर पिसाळ, जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, बप्पासाहेब मोटे, श्याम येवले, समाधान मस्के, शांतीलाल पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. अमरसिंह पंडित यांचेही भाषण झाले. (प्रतिनिधी)