शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

‘बांधिलकी जपणाऱ्यांच्या पाठीशी राहा’

By admin | Updated: November 16, 2016 00:33 IST

बीड :डॉ. क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी केले.

बीड : दूरदृष्टी ठेवून शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड शहराचा विकास करणाऱ्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन विकासाच्या दिशेने ते जात आहेत. डॉ. क्षीरसागर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी केले.बीड नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ राकाँचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. यावेळी ते बोलत होते. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. अमरसिंह पंडित, राकाँचे उपनेते आ. जयदत्त क्षीरसागर, आ. विक्रम काळे, माजी आमदार उषा दराडे, माजी आ. जनार्दन तुपे, रायुकाँचे शेख शफीक, नवीदुज्जमा, नगराध्यक्षा रत्नमाला दुधाळ, माजी नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर, हेमा पिंपळे आदींची उपस्थिती होती. तटकरे बोलताना म्हणाले, बीड जिल्ह्यात सातत्याने दुष्काळ पडला. अशा स्थितीत बीड शहरात टँकर लावावे लागले नाही, याचा मला अभिमान वाटतो. महाराष्ट्रात केवळ बीडमध्येच महिला बचतगटाची चळवळ सक्रिय आहे. महिलांना लघु उद्योगातून चालना देण्याचे काम डॉ. भारतभूषण क्षीरसागर व त्यांच्या टीमने आतापर्यंत केलेले आहे. सत्ताही उपभोगायचे साधन नाही. सत्तेत असताना सर्वसामान्य जनतेची कामे झाली पाहिजेत, ही पवारसाहेबांची शिकवण आहे. बीडमध्ये डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी शहराचा विकास करुन दाखविला आहे. येणाऱ्या काळात उर्वरित कामे देखील मार्गी लागतील, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरसिंह पंडित म्हणाले, शहरातील संघर्षशील नेतृत्व म्हणून डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जाते. शहरातील जनता डॉ. क्षीरसागर यांच्यावर विश्वास ठेवते, असे सांगून त्यांनी बीडमध्ये डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.गेवराईकरांनो, सेवेची संधी द्या !राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गेवराईतही राकाँच्या प्रचाराचा नारळ फुटला. यानिमित्ताने शहरातून कार्यकर्त्यांची रॅली काढण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. तटकरे म्हणाले, सत्ता ही कोणा एकाची बांधिलकी नाही. जनतेची सेवा करण्याची ही एक संधी असते. ही संधी गेवराईकरांनी राकाँला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.दुष्काळी परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीने सरकारसमोर शेतकऱ्यांचे प्रश्न नेटाने लावून धरले. जनतेच्या सुखदु:खाची राकाँला जाणीव आहे. त्यामुळे मतदारांनी भावनेच्या आहारी न जाता विकासाची क्षमता असलेल्या राकाँ उमेदवारांनाच निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी आ. अमरसिंह पंडित, आ. विक्रम काळे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर पिसाळ, जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, बप्पासाहेब मोटे, श्याम येवले, समाधान मस्के, शांतीलाल पिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आ. अमरसिंह पंडित यांचेही भाषण झाले. (प्रतिनिधी)