शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
7
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
8
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
9
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
10
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
11
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
12
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
13
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
14
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
15
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
16
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
17
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
18
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
19
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
20
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी

बीडीओंकडून टँकर फेऱ्यांची गोळाबेरीज !

By admin | Updated: April 8, 2015 00:51 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील १३ गावांत मंजूर फेऱ्यांपेक्षा टँकरच्या कमी फेऱ्या झाल्याची बाब ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर उघडकीस आली आहे़ यासंदर्भात जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले

लातूर : लातूर जिल्ह्यातील १३ गावांत मंजूर फेऱ्यांपेक्षा टँकरच्या कमी फेऱ्या झाल्याची बाब ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर उघडकीस आली आहे़ यासंदर्भात जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले असून, जिल्ह्यातील दहाही बीडीओंकडून टँकर फेऱ्यांची गोळाबेरीज सुरु आहे़ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अहवाल देण्यासाठी बीडीओंकडून ग्रामसेवकांची झाडाझडती होत आहे़ १३ पैकी काही गावांच्या सरपंचांनी कमी फेऱ्या होत असल्याचे गऱ्हाणे मांडले आहे़ तर ग्रामसेवकांनी मात्र मंजुरीप्रमाणेच फेऱ्या होत असल्याचे सांगितले आहे़ त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांकडे जाब विचारणे सुरु केले आहे़ दरम्यान, आतापर्यंत फक्त तीन बीडीओंनीच टँकर फेऱ्यांचा अहवाल सीईओंकडे सादर केला आहे. सात बीडीओंनी सीईओंच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आहे.लातूर जिल्ह्यात ४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असून ४६ पैकी खाजगी २७ तर शासकीय १९ टँकर आहेत़ या टँकरद्वारे दररोज १५४ फेऱ्या मंजूर आहेत़ परंतु रविवारी ‘लोकमत’चमुने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये लातूर जिल्ह्यातील शाम नगर, रामेगाव तांडा, बाभळगाव, महाराणाप्रताप नगर, गंगापूर, दर्जी बोरगाव, महाळंग्रावाडी, विळेगाव, घारोळा, हाडोळी, हणमंत जवळगा, आष्टा, नारायण नगर या १३ गावांत कुठे एक तर कुठे दोन फेऱ्या कमी झाल्याची बाब उघडकीस आली़ एकूण १८ फेऱ्या कमी झाल्या़ टँकर फेऱ्यांचा गोलमाल ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर उघडकीस आला़ त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जीपीएस सिस्टीम बसविण्याचा निर्णय घेतला असून, १८ फेऱ्या कमी का झाल्या, याचा शोध घेण्यासही प्रारंभ केला आहे़ डिजेल अभावी, दुरुस्ती अभावी टँकर बंद होते का किंवा जाणीवपूर्वक फेरी केली नाही, याचाही शोध प्रशासनाकडून सुरु आहे़ फेरी न करताच दप्तरात या फेऱ्यांची नोंद केली का, या अनुषंगाने बीडीओंना तपास करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत़ या सूचनेनुसार जिल्ह्यातील दहाही गटविकास अधिकारी संबंधीत गावच्या ग्रामसेवकाला जाब विचारत आहेत़ किती फेऱ्या मंजूर आहेत़ रविवारी किती झाल्या होत्या़ आता मंजुरीप्रमाणे होत आहेत का, रविवारी कमी होण्याचे कारण काय होते़ याची दप्तरी नोंद आहे का, या सर्व बाबींचा खुलासा ग्रामसेवकांकडून घेण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले़ शिवाय, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनीही प्रस्तुत माहिती बीडीओंकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागितली असल्याचे सांगितले़ (अधिक वृत्त हॅलो/ २ वर)