शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

मराठवाड्याच्या १०० कोटींसाठी पुन्हा ‘बे एकं बे’

By admin | Updated: July 15, 2015 00:41 IST

औरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळ (पूर्वीचे वैधानिक विकास मंडळ) पुन्हा १०० कोटींचा निधी पदरात पडण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.

औरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळ (पूर्वीचे वैधानिक विकास मंडळ) पुन्हा १०० कोटींचा निधी पदरात पडण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. गेल्यावर्षीच्या निधीवाटपात १०० कोटींच्या तरतुदीतून १४ कोटी फेबु्रवारी २०१४ मध्ये दिले. तेही खर्चाअभावी परत गेल्यामुळे विभागाची १०० कोटींची मागणी पुन्हा पहिल्यापासून करावी लागणार आहे. त्या तुलनेत विदर्भाला ६४ कोटी रुपये वैधानिक विकास मंडळाच्या निधी तरतुदीतून मिळाले आहेत. राजकीय अनास्था, मंडळाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे विभागासाठी तरतुदीत केलेला निधी मिळण्यात सापत्न वागणूक मिळाल्याचे दिसते. मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांची आज विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सदस्य मुकुंद कुलकर्णी, डॉ. अशोक बेलखोडे, सेवानिवृत्त अभियंते शंकर नागरे, भैरवनाथ ठोंबरे यांची बैठकीला उपस्थिती होती. बैठकीत नूतन सदस्यांचा परिचय झाला. कौशल्यविकास, कृषी क्लस्टर, आरोग्य, शिक्षण, पाण्याचा कार्यक्षम वापर यावर काम करण्यासाठी सदस्यांनी चर्चा केली. येत्या दोन महिन्यांत या क्षेत्रांबाबत विचार होईल. मंडळातील १० विषय समितीतील सदस्यांना कायम ठेवण्याबाबत निर्णय झाला. तसेच नवीन सदस्यांकडे समितीचे अध्यक्षपद वाटून देण्यात आले.नवीन कुठलाही ठराव आजच्या बैठकीत झाला नाही. जिल्हानिहाय डीपीसीच्या बैठकीसाठी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये कुलकर्णी यांच्याकडे औरंगाबाद, परभणी, नागरे यांच्याकडे बीड, जालना, नांदेड, हिंगोली डीपीसी डॉ. बेलखोडे यांच्याकडे, तर लातूर व उस्मानाबाद ठोंबरे यांच्याकडे देण्यात आले. हे सदस्य त्या जिल्ह्यांतील डीपीसीच्या बैठकीत धोरणात्मक मुद्यांवर चर्चा करतील. पुढच्या बैठकीत पाणीपुढच्या बैठकीत समन्यायी पाणी वाटपाप्रकरणी चर्चा करण्यात येणार आहे. विभाग सध्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. जायकवाडीच्या वरील धरणातून पाणी सोडणे, विभागातील पीकपाण्याची परिस्थिती कशी आहे यावरून समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा छेडला जाईल. मंडळाला सध्या प्रशासकीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे बैठकीत कागदे घोडे नाचविले जातात. २ वर्षांपासून राजकीय नेतृत्व असलेला अध्यक्ष मंडळावर नियुक्त झालेला नाही. त्यामुळे बैठकीतील कोणत्याही उपक्रमांना मूर्तरूप येत नाही. परिणामी, सगळ्या बैठका चहापानाच्या चर्चेसाठी असल्यासारखी परिस्थिती आहे. दोन वर्षांपूर्वीच पूर्णवेळ अध्यक्षासाठी ठराव पारित करून शासनाकडे दिला आहे. अध्यक्ष मिळावा ही सर्व सदस्यांची भावना असल्याचे आज दिसले.