शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याच्या १०० कोटींसाठी पुन्हा ‘बे एकं बे’

By admin | Updated: July 15, 2015 00:41 IST

औरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळ (पूर्वीचे वैधानिक विकास मंडळ) पुन्हा १०० कोटींचा निधी पदरात पडण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.

औरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळ (पूर्वीचे वैधानिक विकास मंडळ) पुन्हा १०० कोटींचा निधी पदरात पडण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. गेल्यावर्षीच्या निधीवाटपात १०० कोटींच्या तरतुदीतून १४ कोटी फेबु्रवारी २०१४ मध्ये दिले. तेही खर्चाअभावी परत गेल्यामुळे विभागाची १०० कोटींची मागणी पुन्हा पहिल्यापासून करावी लागणार आहे. त्या तुलनेत विदर्भाला ६४ कोटी रुपये वैधानिक विकास मंडळाच्या निधी तरतुदीतून मिळाले आहेत. राजकीय अनास्था, मंडळाला पूर्णवेळ अध्यक्ष नसल्यामुळे विभागासाठी तरतुदीत केलेला निधी मिळण्यात सापत्न वागणूक मिळाल्याचे दिसते. मंडळाच्या नवनिर्वाचित सदस्यांची आज विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, जिल्हाधिकारी वीरेंद्रसिंग यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सदस्य मुकुंद कुलकर्णी, डॉ. अशोक बेलखोडे, सेवानिवृत्त अभियंते शंकर नागरे, भैरवनाथ ठोंबरे यांची बैठकीला उपस्थिती होती. बैठकीत नूतन सदस्यांचा परिचय झाला. कौशल्यविकास, कृषी क्लस्टर, आरोग्य, शिक्षण, पाण्याचा कार्यक्षम वापर यावर काम करण्यासाठी सदस्यांनी चर्चा केली. येत्या दोन महिन्यांत या क्षेत्रांबाबत विचार होईल. मंडळातील १० विषय समितीतील सदस्यांना कायम ठेवण्याबाबत निर्णय झाला. तसेच नवीन सदस्यांकडे समितीचे अध्यक्षपद वाटून देण्यात आले.नवीन कुठलाही ठराव आजच्या बैठकीत झाला नाही. जिल्हानिहाय डीपीसीच्या बैठकीसाठी सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये कुलकर्णी यांच्याकडे औरंगाबाद, परभणी, नागरे यांच्याकडे बीड, जालना, नांदेड, हिंगोली डीपीसी डॉ. बेलखोडे यांच्याकडे, तर लातूर व उस्मानाबाद ठोंबरे यांच्याकडे देण्यात आले. हे सदस्य त्या जिल्ह्यांतील डीपीसीच्या बैठकीत धोरणात्मक मुद्यांवर चर्चा करतील. पुढच्या बैठकीत पाणीपुढच्या बैठकीत समन्यायी पाणी वाटपाप्रकरणी चर्चा करण्यात येणार आहे. विभाग सध्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. जायकवाडीच्या वरील धरणातून पाणी सोडणे, विभागातील पीकपाण्याची परिस्थिती कशी आहे यावरून समन्यायी पाणी वाटपाचा मुद्दा छेडला जाईल. मंडळाला सध्या प्रशासकीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे बैठकीत कागदे घोडे नाचविले जातात. २ वर्षांपासून राजकीय नेतृत्व असलेला अध्यक्ष मंडळावर नियुक्त झालेला नाही. त्यामुळे बैठकीतील कोणत्याही उपक्रमांना मूर्तरूप येत नाही. परिणामी, सगळ्या बैठका चहापानाच्या चर्चेसाठी असल्यासारखी परिस्थिती आहे. दोन वर्षांपूर्वीच पूर्णवेळ अध्यक्षासाठी ठराव पारित करून शासनाकडे दिला आहे. अध्यक्ष मिळावा ही सर्व सदस्यांची भावना असल्याचे आज दिसले.