शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बोगस शासन निर्णयाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:23 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील यांनी १७ जानेवारी रोजी प्रभारी प्राचार्याचा पदभार देण्याविषयी परिपत्रक काढले होते. हे परिपत्रक १३ आॅक्टोबर २०११ व १८ मार्च २०१२ रोजीच्या शासन निर्णयानुसार काढल्याचे म्हटले आहे. मात्र १८ मार्च २०१२ रोजी रविवार असून, त्या दिवशी कोणताही शासन निर्णय प्रकाशित झालेला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील यांनी १७ जानेवारी रोजी प्रभारी प्राचार्याचा पदभार देण्याविषयी परिपत्रक काढले होते. हे परिपत्रक १३ आॅक्टोबर २०११ व १८ मार्च २०१२ रोजीच्या शासन निर्णयानुसार काढल्याचे म्हटले आहे. मात्र १८ मार्च २०१२ रोजी रविवार असून, त्या दिवशी कोणताही शासन निर्णय प्रकाशित झालेला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याविषयी बामुक्टो संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. उमाकांत राठोड व डॉ. उल्हास उढाण यांनी कुलगुरूंना निवेदन देऊन दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.विद्यापीठात तत्कालीन बीसीयूडी संचालकांनी १७ जानेवारी २०१७ रोजी प्रभारी प्राचार्याच्या नियुक्तीसंदर्भात एक परिपत्रक काढले होते. या परिपत्रकानुसार महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राचार्य नियुक्ती करण्यामध्ये संबंधित महाविद्यालयाच्या व्यवस्थापनातील वादामुळे अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्राध्यापकाकडे प्राचार्याचा प्रभारी पदभार देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.यासाठी १३ आॅक्टोबर २०११ आणि १८ मार्च २०१२ रोजीच्या शासन निर्णयाचा आधार घेण्यात आला आहे. यातील १८ मार्चला कोणताही शासन निर्णय प्रकाशित झालेला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. १३ आॅक्टोबर रोजी काढलेल्या शासन निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात एका प्राध्यापकाने आव्हान दिले होते.या याचिकेतील निकालानुसार १५ मार्च २०१२ रोजी पूर्ण वेळ प्राचार्य नसलेल्या महाविद्यालयातील पात्रताधारक प्राध्यापकांमधून कोणत्याही व्यक्तीची नेमणूक प्रभारी प्राचार्य म्हणून करण्याची संस्थाचालकाला मुभा देण्यात आलेली आहे.मात्र तत्कालीन बीसीयूडी संचालक डॉ. पाटील यांनी कुलगुरू, संस्थाचालकांची दिशाभूल करून जाणीवपूर्वक काही व्यक्तीचे हित साध्य करण्यासाठी चक्क अस्तित्वात नसलेल्या शासन निर्णयाचा आधार घेऊन परिपत्रक काढल्याचा आरोप कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात केला आहे. १७ जानेवारी रोजी काढलेल्या परिपत्रकाला कुलगुरूंची परवानगीही घेण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे.यामुळे दिशाभूल करून प्रशासनाची फसवणूक करणा-या तत्कालीन बीसीयूडी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही निवेदनाद्वारेकेली.