शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

बसथांबे मुबलक; निवाऱ्यांची वानवा

By admin | Updated: July 14, 2014 01:01 IST

कळंब : तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गासह राज्य मार्गावर बसथांब्यांची मोठी संख्या असताना प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे मात्र बोटावर मोजण्याइतपतच उपलब्ध आहेत.

कळंब : तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गासह राज्य मार्गावर बसथांब्यांची मोठी संख्या असताना प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे मात्र बोटावर मोजण्याइतपतच उपलब्ध आहेत. त्यांचीही एकतर दुरवस्था होऊन मोडकळीस आले आहेत किंवा त्यावर अतिक्रमण झाले आहे.तालुक्यातील कळंब-येरमाळा राज्य मार्गावर हासेगाव, आंदोरा, कन्हेरवाडी, मनुष्यबळ पाटी, दहिफळ पाटी, परतापूर, उमरा, पानगाव तर कळंब-ढोकी राज्य मार्गावर डिकसळ, माळकरंजा, गोविंदपूर, भाटशिरपुरा ही गावे तसेच मंगरूळ, जवळा, एकुरगा, बोरवंटी व देवळाली या गावांच्या पाट्या आहेत. लातूर-कळंब-डोंगरेवाडी या राज्य मार्गावरही रांजणी, ताडगाव, आवाड शिरपुरा, कोथळा, खडकी, लोहटा (पूर्व व पश्चिम), करंजकल्ला, भाटसांगवी, खोंदला, आथर्डी, बहुला, आढळा, भोगजी, चौफुला आदी बसथांबे आहेत. याशिवाय तांदूळवाडी, बोर्डा, मोहा, सातेफळ, शेलगाव, वडगाव ही गावे कळंब-येडशी राज्य मार्गावर येतात. प्रमुख जिल्हा मार्गावरही ईटकूर, हावरगाव, वाकडी, गंभीरवाडी, दहिफळ आदी प्रमुख गावे असून ही गावे लगतच्या मोठ्या गावास अथवा तालुका किंवा जिल्हा ठिकाणाला जोडली आहेत. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे पसरलेले असताना आंदोरा-मस्सा (खं), कन्हेरवाडी पाटी, ईटकूर, गोविंदपूर, रांजणी, मोहा आदी बोटावर मोजण्याइतपत गावातच प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. तर शिराढोण व येरमाळा येथे मिनी बसस्थानक आहे. बसथांब्यावर प्रवासी निवारा नसल्याने उन्हाळा व पावसाळ्यात प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: हावरगाव, वाकडी, कोठाळवाडी, मंगरूळ पाटी, देवळाली पाटी, शिंगोली, ताडगाव, आवाड शिरपुरा, मंगरूळ पाटी, जवळा पाटी, शेलगाव (दि), चोराखळी, वडगाव (ज) येथील प्रवाशांना प्रवासी निवारा नसल्याने अधिक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)यापूर्वी आमदार, खासदार हे लोकप्रतिनिधी स्थानिक विकास निधीतून प्रवासी निवाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून देत होते. राज्य परिवहन महामंडळही निधीचे कारण सांगून व त्यांच्या स्थापत्य विभागावर जबाबदारी ढकलून मोकळे होत होते. सद्यस्थितीत या दोघांचेही दुर्लक्ष झाल्याने नवीन निवारे तर सोडाच, परंतु आहे त्या निवाऱ्यांचीही देखभाल होत नसल्याचे दिसत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनीच पुढाकार घेण्याची गरजही जाणकारांतून व्यक्त होत आहे.