शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; समोर आला थरकाप उडवणारा VIDEO
3
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
4
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
5
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
6
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
7
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
8
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
9
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
10
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
11
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
12
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
13
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
14
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
15
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
16
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
17
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
18
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
19
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
20
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका

बसथांबे मुबलक; निवाऱ्यांची वानवा

By admin | Updated: July 14, 2014 01:01 IST

कळंब : तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गासह राज्य मार्गावर बसथांब्यांची मोठी संख्या असताना प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे मात्र बोटावर मोजण्याइतपतच उपलब्ध आहेत.

कळंब : तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गासह राज्य मार्गावर बसथांब्यांची मोठी संख्या असताना प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवासी निवारे मात्र बोटावर मोजण्याइतपतच उपलब्ध आहेत. त्यांचीही एकतर दुरवस्था होऊन मोडकळीस आले आहेत किंवा त्यावर अतिक्रमण झाले आहे.तालुक्यातील कळंब-येरमाळा राज्य मार्गावर हासेगाव, आंदोरा, कन्हेरवाडी, मनुष्यबळ पाटी, दहिफळ पाटी, परतापूर, उमरा, पानगाव तर कळंब-ढोकी राज्य मार्गावर डिकसळ, माळकरंजा, गोविंदपूर, भाटशिरपुरा ही गावे तसेच मंगरूळ, जवळा, एकुरगा, बोरवंटी व देवळाली या गावांच्या पाट्या आहेत. लातूर-कळंब-डोंगरेवाडी या राज्य मार्गावरही रांजणी, ताडगाव, आवाड शिरपुरा, कोथळा, खडकी, लोहटा (पूर्व व पश्चिम), करंजकल्ला, भाटसांगवी, खोंदला, आथर्डी, बहुला, आढळा, भोगजी, चौफुला आदी बसथांबे आहेत. याशिवाय तांदूळवाडी, बोर्डा, मोहा, सातेफळ, शेलगाव, वडगाव ही गावे कळंब-येडशी राज्य मार्गावर येतात. प्रमुख जिल्हा मार्गावरही ईटकूर, हावरगाव, वाकडी, गंभीरवाडी, दहिफळ आदी प्रमुख गावे असून ही गावे लगतच्या मोठ्या गावास अथवा तालुका किंवा जिल्हा ठिकाणाला जोडली आहेत. तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे पसरलेले असताना आंदोरा-मस्सा (खं), कन्हेरवाडी पाटी, ईटकूर, गोविंदपूर, रांजणी, मोहा आदी बोटावर मोजण्याइतपत गावातच प्रवासी निवाऱ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. तर शिराढोण व येरमाळा येथे मिनी बसस्थानक आहे. बसथांब्यावर प्रवासी निवारा नसल्याने उन्हाळा व पावसाळ्यात प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: हावरगाव, वाकडी, कोठाळवाडी, मंगरूळ पाटी, देवळाली पाटी, शिंगोली, ताडगाव, आवाड शिरपुरा, मंगरूळ पाटी, जवळा पाटी, शेलगाव (दि), चोराखळी, वडगाव (ज) येथील प्रवाशांना प्रवासी निवारा नसल्याने अधिक त्रास सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)यापूर्वी आमदार, खासदार हे लोकप्रतिनिधी स्थानिक विकास निधीतून प्रवासी निवाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून देत होते. राज्य परिवहन महामंडळही निधीचे कारण सांगून व त्यांच्या स्थापत्य विभागावर जबाबदारी ढकलून मोकळे होत होते. सद्यस्थितीत या दोघांचेही दुर्लक्ष झाल्याने नवीन निवारे तर सोडाच, परंतु आहे त्या निवाऱ्यांचीही देखभाल होत नसल्याचे दिसत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनीच पुढाकार घेण्याची गरजही जाणकारांतून व्यक्त होत आहे.