शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे ३८ जण सैन्यात

By admin | Updated: May 27, 2016 23:27 IST

औरंगाबाद : बनावट रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर करून ३८ जवान गतवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाल्याचे उघड झाले आहे.

औरंगाबाद : बनावट रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला सादर करून ३८ जवान गतवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी या जवानांविरोधात छावणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुल यादव, रोहन नाले, अक्षय गोसावी, विकास भोपाले, उमेश ढंगाळे (सर्व रा. कोल्हापूर) आदी ३८ जवानांचा यात समावेश आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे भरती होणाऱ्यांविरोधात मोठ्या संख्येने गुन्हा दाखल होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. गतवर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात सैन्यदलातर्फे औरंगाबादेत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात हजारो तरुण सहभागी झाले होते. निकष पूर्ण करणाऱ्यांना सैन्यदलात भरती करण्यात आले. त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची छावणीतील सैन्य भरती अधिकाऱ्यांनी पडताळणी केली. त्यावेळी सुमारे ३८ जवानांचे शैक्षणिक कागदपत्रे पश्चिम महाराष्ट्रातील तर त्यांनी सादर केलेले रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला औरंगाबाद तहसील कार्यालय, वैजापूर, धुळे, चाळीसगाव आणि साक्री तहसील कार्यालय इ. ठिकाणांहून काढण्यात आल्याचे निदर्शनास आले. या जवानांच्या कागदपत्रांच्या सत्यतेविषयी सैन्य भरती अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी फेब्रुवारी महिन्यात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल केला. पोलीस आयुक्तांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपविले. पोलीस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन महिने गुप्त चौकशी केली. या चौकशीत सैन्य भरती अधिकाऱ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळले. या प्रकरणी कर्नल मोहनपाल सिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला.बनावट सही, शिक्का वापरून तयार केले बनावट प्रमाणपत्रमूळचे सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या ११ जवानांनी वैजापूर तहसील कार्यालयाचे तर ११ जवानांनी औरंगाबाद तहसील कार्यालयातून रहिवासी प्रमाणपत्र आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला काढलाच नसल्याचे समोर आले. त्यांनी बनावट शिक्का तयार करून त्यावर सक्षम अधिकाऱ्याची बनावट सही मारून बनविलेले नकली प्रमाणपत्र सैन्य दलास सादर केले. तर २ जणांनी जळगाव तहसीलचे तर तीन जणांनी धुळे, साक्री तहसील कार्यालयाचे प्रमाणपत्र सादर केले. शिवाय एका जणाने चाळीसगाव तहसीलचे बनावट प्रमाणपत्र तयार केले.रेल्वेंच्या बोगीत वाढऔरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने तात्पुरत्या स्वरुपात विविध रेल्वेगाड्यांच्या आरक्षित बोगी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नांदेड-पुणे-नांदेड एक्स्प्रेसला ५ ते २९ जून, सिकंदराबाद-शिर्डी-सिंकदराबाद रेल्वेला ३ ते २५ जून तर नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेसला १ जून ते १ जुलैदरम्यान प्रत्येकी एक बोगी वाढविण्यात येणार आहे.