शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

बारा ग्रामपंचायतीचे ‘रेकॉर्ड’ सापडेना !

By admin | Updated: August 25, 2016 01:01 IST

उस्मानाबाद : जिल्हाभरातील तब्बल ४० ग्रामपंचायतींचे २००७-१५ या कालावधीतील लेखापरीक्षणच (आॅडीट) झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे

उस्मानाबाद : जिल्हाभरातील तब्बल ४० ग्रामपंचायतींचे २००७-१५ या कालावधीतील लेखापरीक्षणच (आॅडीट) झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्याला कारणही तितकेच गंभीर आहे. आजवर या ग्रामपंचायतींच्या रेकॉर्डचाच थांगपत्ता लागत नव्हता. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी कारवाईअस्त्र उगारताच २९ ग्रामपंचायतींनी ‘रेकॉर्ड’ उपलब्ध झाल्याबाबत जिल्हा परिषदेला कळविले आहे. असे असले तरी उर्वरित बारा ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड मात्र अद्याप सापडलेले नाही. या ग्रामपंचायतींना दोन दिवसांची ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजना तसेच स्व:उत्पन्नातून ग्रामपंचायती विविध विकास कामे राबवितात. त्यामुळे सदरील निधीचा खर्च योग्य पद्धतीने होतो आहे की, नाही हे पाहण्यासाठी लेखापरीक्षण केले जाते. परंतु, जिल्ह्यात अशा काही ग्रामपंचायती आहेत, की ज्यांचे २००७ पासून ते २०१५ पर्यंत आॅडीटच झालेले नाही. सदरील ग्रामपंचायतींची संख्या ४१ एवढी आहे. दरम्यान, सदरील गंभीर प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी रायते यांनी संबंधित ग्रामंपचायतींच्या ग्रामसेवकांची सुनावण्या घेतल्या. जवळपास महिनाभर चाललेल्या या प्रक्रियेनंतर २९ ग्रामपंचायतींच्या ग्रामसेकांनी रेकॉर्ड उपलब्ध झाल्याबाबत जिल्हा परिषदेला कळविले आहे. यापैकी केवळ एका ग्रामपांयतीने आॅडीट पूर्ण केले आहे. उर्वरित ग्रामपंचायतींनी अद्याप आॅडीट केलेले नाही. बारा ग्रामपंचायती तर अशा आहेत, की ज्यांचे रेकॉर्ड संबंधित ग्रामसेवकांना सापडत नाही. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील तीन, कळंब तालुक्यातील एक, भूम तालुक्यातील दोन, परंडा तालुक्यातील एक, लोहारा तालुक्यातील तीन, वाशी तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वारंवार सूचना देवूनही रेकॉर्ड उपलब्ध होत नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी बुधवारी संबंधित ग्रामसेवकांची बैठक बोलावून दोन दिवसांची ‘डेडलाईन’ दिली. या दोन दिवसांत रेकॉर्ड उपलब्ध न झाल्यास संबंधित ग्रामसेवकांविरूद् कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. सीईओ रायते यांच्या भूमिकेमुळे आता संबंधित ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.वारंवार आदेशित करूनही बारा ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड उपलब्ध होत नसल्याने जिल्हा परिषदेकडून कारवाईची भूमिका घेतली आहे. जे ग्रामसेवक दोन दिवसांत रेकॉर्ड उपलब्ध करणार नाहीत, त्यांची चौकशी लावण्यात येणार आहे. चौकशीअंती दोषी ग्रामसेवकांविरूद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित केली जाईल. एखाद्या ग्रामसेवकाकडे वसूलपात्र रक्कम निघाली आणि त्यांनी भरणा केला नाहीत तर त्यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाई केली जाईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.चौदाव्या वित्त आयोगाला लागणार कात्री४ज्या ग्रामपंचायती निधी खर्चाचे आॅडीट करून घेणार नाहीत, अशा ग्रामसेवकांविरूद्ध प्रशासकीय कारवाई बडगा उगारण्यात येणार आहे. परंतु, दुसरीकडे शासनाकडून चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत मिळणाऱ्या निधीलाही मुकावे लागणार आहे. तसे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकारी रायते यांनी काढले आहेत.