शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी पीककर्ज वेळेवर द्यावे

By admin | Updated: April 30, 2015 00:39 IST

बीड : गत तीन वर्षापासून जिल्ह्यातलाच नव्हेतर राज्यातला शेतकरी दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका

बीड : गत तीन वर्षापासून जिल्ह्यातलाच नव्हेतर राज्यातला शेतकरी दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना सापत्न वागणूक देत असल्याच्या तक्रारी आहेत. बँकानी पिक कर्जाच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री व ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीयकृत बँकाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिल्या.आगामी काळात खरीप पिकासंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. याप्रसंगी पालकमंत्री मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी आ. भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, अ‍ॅड. लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, जि. प. सीईओ नामदेव ननावरे, जिल्हा कृषी अधिक्षक रमेश भताने, कृषी उप संचालक बी. एम. गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी २०१५-१६ या वर्षातील खरीप हंगामपुर्व आढावा घेण्यात आला. संभाव्य अडचणीवर मात करण्यासाठी शासन व प्रशासनाने सज्ज रहाण्याच्या सूचनाही अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आल्या. मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. यंदा पाऊस पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे वेळेवर देण्यात येतील असा विश्वासही देणे आवश्यक असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.आठ दिवसात अहवाल द्या...यापूर्वीचा राष्ट्रीयकृत बँकांचा शेतकऱ्यांच्या बाबतीतला अनुभव वाईट आलेला आहे. काही बँका तर दिलेले उदिष्ठ बँका पूर्ण करत नाहीत. अशा शब्दात भाजपाच्या आमदारांनी व पालक मंत्र्यांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी मंत्री मुंडे यांनी आठ दिवसाच्या आत बँकांनी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कर्जाचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्हाधिकारी यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, अशा सूचना आढावा बैठकीत दिल्या.विमा कंपनीचा अहवाल नाहीजिल्ह्यात तीन वर्षापासून दुष्काळी स्थिती आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिक विमा भरला होता. मात्र मदत मिळाली नव्हती. यंदा देखील पिक विम्यापोटी ३१ कोटी २० लक्ष रूपये कंपनीकडे जमा झालेले आहेत. असे असताना देखील संबंधीत विमा कंपनीने अद्याप पर्यंत पिक विम्याच्या वाटपा बाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविलेला नाही. यावर पालकमंत्र्यांनी १५ मे पर्यंत प्रत्यक्ष पिक विमा वाटपाच्या सुचना दिल्या आहेत.यंदा पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही तर शेतकऱ्यांचा वीमा कंपन्यावरील विश्वास उडेल, अशी चर्चाही यावेळी आढावा बैठकीत झाली. यावर १५ मे पर्यंत पीक विम्याच्या वाटपासंबंधीचे काम पूर्ण केले जाईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील बहुतांश गावांना वेळेवर वीज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्या बरोबरच जनावरांचे देखील पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. याकडे महावितरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणांवरून आमदारांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, दुरूस्तीच्या कामाचे टेंडर देण्याचे काम सुरू असल्याचे महावितरणचे अधिक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.