शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

बँकांनी पीककर्ज वेळेवर द्यावे

By admin | Updated: April 30, 2015 00:39 IST

बीड : गत तीन वर्षापासून जिल्ह्यातलाच नव्हेतर राज्यातला शेतकरी दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका

बीड : गत तीन वर्षापासून जिल्ह्यातलाच नव्हेतर राज्यातला शेतकरी दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना सापत्न वागणूक देत असल्याच्या तक्रारी आहेत. बँकानी पिक कर्जाच्या संदर्भात सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री व ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीयकृत बँकाच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दिल्या.आगामी काळात खरीप पिकासंदर्भात आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. याप्रसंगी पालकमंत्री मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी आ. भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, अ‍ॅड. लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, जि. प. सीईओ नामदेव ननावरे, जिल्हा कृषी अधिक्षक रमेश भताने, कृषी उप संचालक बी. एम. गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी २०१५-१६ या वर्षातील खरीप हंगामपुर्व आढावा घेण्यात आला. संभाव्य अडचणीवर मात करण्यासाठी शासन व प्रशासनाने सज्ज रहाण्याच्या सूचनाही अधिकारी कर्मचारी यांना देण्यात आल्या. मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. यंदा पाऊस पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांना खत, बी-बियाणे वेळेवर देण्यात येतील असा विश्वासही देणे आवश्यक असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.आठ दिवसात अहवाल द्या...यापूर्वीचा राष्ट्रीयकृत बँकांचा शेतकऱ्यांच्या बाबतीतला अनुभव वाईट आलेला आहे. काही बँका तर दिलेले उदिष्ठ बँका पूर्ण करत नाहीत. अशा शब्दात भाजपाच्या आमदारांनी व पालक मंत्र्यांनी बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी मंत्री मुंडे यांनी आठ दिवसाच्या आत बँकांनी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या कर्जाचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्हाधिकारी यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी, अशा सूचना आढावा बैठकीत दिल्या.विमा कंपनीचा अहवाल नाहीजिल्ह्यात तीन वर्षापासून दुष्काळी स्थिती आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पिक विमा भरला होता. मात्र मदत मिळाली नव्हती. यंदा देखील पिक विम्यापोटी ३१ कोटी २० लक्ष रूपये कंपनीकडे जमा झालेले आहेत. असे असताना देखील संबंधीत विमा कंपनीने अद्याप पर्यंत पिक विम्याच्या वाटपा बाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविलेला नाही. यावर पालकमंत्र्यांनी १५ मे पर्यंत प्रत्यक्ष पिक विमा वाटपाच्या सुचना दिल्या आहेत.यंदा पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही तर शेतकऱ्यांचा वीमा कंपन्यावरील विश्वास उडेल, अशी चर्चाही यावेळी आढावा बैठकीत झाली. यावर १५ मे पर्यंत पीक विम्याच्या वाटपासंबंधीचे काम पूर्ण केले जाईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. (प्रतिनिधी)आष्टी तालुक्यातील बहुतांश गावांना वेळेवर वीज मिळत नसल्यामुळे शेतकऱ्या बरोबरच जनावरांचे देखील पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. याकडे महावितरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याच्या कारणांवरून आमदारांनी महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, दुरूस्तीच्या कामाचे टेंडर देण्याचे काम सुरू असल्याचे महावितरणचे अधिक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.