शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

बंजारा समाजाने वाईट चालीरिती सोडाव्यात

By admin | Updated: August 10, 2014 01:30 IST

कळमनुरी : बंजारा समाजातील वाईट चालिरीती बंद केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी शनिवारी केले.

कळमनुरी : येथील लमाणदेव मंदीर सर्व सोयींनी युक्त करून बंजारा समाजातील वाईट चालिरीती बंद केल्या पाहिजेत, असे प्रतिपादन लमाणदेव सांस्कृतिक सभागृह व नगर परिषदेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची सुरूवात करताना अन्न व औषधी प्रशासन मंत्री मनोहर नाईक यांनी शनिवारी केले.या कार्यक्रमास खा. राजीव सातव, माजी मंत्री रजनीताई सातव, जकी कुरेशी, दिलीप देसाई, आदिवासी युवक कल्याण संघाचे राज्याध्यक्ष डॉ.संतोष टारफे, नगराध्यक्षा यास्मीनबी, उपनगराध्यक्ष म. नाजीम, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते, हफीज फारुकी, अ‍ॅड. अझहरोद्दीन कादरी, अजीत मगर, शे. फारुक शेख कलीम, हुमायून नाईक, मुख्याधिकारी के.एम. विरकुंवर, शेख बाबा, निहाल कुरेशी, शेख मोईन, रामधन राठोड, हमीदुल्ला पठाण, खाजा बागवान आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले की, शहर व ग्रामीण भागाचा पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. मंदीर परिसरातील अतिक्रमण काढण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तीनशे वर्षापासून कोणीही सात महाराजांच्या मंदिरांचा विकास केलेला नाही. खा.सातव कर्तबगार असल्याने या भागाचा विकास करू शकतात. बंजारा समाजाने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे नाईक म्हणाले.यावेळी सातव म्हणाले की, या योजनेमुळे शहरवासियांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल. शहरातील नुरीबाबा, महादेव मंदिर, तुळजा भवानी, लमानदेव या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ७५ कोटींचा आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवित आहे. विरोधी पक्षाचे सरकार असले तरी विकास केला जाईल. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नांदेड- अकोला रस्ता चौपदरीकरण, जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. यावेळी रजनीताई सातव, जकी कुरेशी, उत्तमराव राठोड, भागोराव राठोड, जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांची समायोचित भाषणे झाली. प्रास्ताविक नंदकिशोर तोष्णीवाल तर सुत्रसंचालन प्रा. आनंद पारडकर यांनी केले. आभार अरुण वाढवे यांनी मानले. (वार्ताहर)