शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

पाण्यासाठी बेंबळीकरांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा

By admin | Updated: October 22, 2016 00:32 IST

उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे बेंबळी गावाला पाणीपुरवठा करणारा रूईभर प्रकल्प तुडूंब भरला आहे़ प्रकल्प भरून महिन्याचा कालावधी लोटला तरी

उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे बेंबळी गावाला पाणीपुरवठा करणारा रूईभर प्रकल्प तुडूंब भरला आहे़ प्रकल्प भरून महिन्याचा कालावधी लोटला तरी ग्रामपंचायत प्रशासन सुरळीत पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला़उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गावात मागील वर्षानुवर्षापासून पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर आहे़ रूईभर येथील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाणीप्रश्न काही अंशी मार्गी लागला होता़ मात्र, मागील तीन-चार वर्षापासून पावसाने ओढ दिल्याने रूईभर येथील साठवण तलाव कोरडाठाक पडला होता़ परिणामी गावाला सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला़ परतीच्या पावसामुळे कोरडाठाक पडलेला रूईभर प्रकल्प तुडूंब भरला़ मात्र, पाणीपुरवठा योजनेचे साहित्य चोरीस गेल्याने मागील महिनाभरापासून गावातील पाणीपुरवठा बंदच होता़ तलाव भरलेला असतानाही गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती़ तर अनेकांना विकत पाणी घेवून तहान भागवावी लागत होती़ ही बाब पाहता काही ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी पाणीपुरवठा तत्काळ सुरू करा अन्यथा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता़ दिलेल्या मुदतीत गावातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने शुक्रवारी गावातील हनुमान चौकातून ग्रामपंचायतीवर घागरमोर्चा काढण्यात आला़ मोर्चेकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्यासह इतर मागण्या लावून धरल्या़ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी परतले़ या मोर्चात माजी उपसरपंच बाळासाहेब माने, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील, संतोष आगलावे, नवाब पठाण, पांडुरंग पाटील, चेअरमन सोमनाथ गवळी, पांडुरंग पवार, नवनाथ कांबळे, कमलाकर दाणे, तुकाराम राऊत, शहाजान मुजावर, सतिश सोनटक्के, सलीम शेख यांच्यासह ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)