शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

पाण्यासाठी बेंबळीकरांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा

By admin | Updated: October 22, 2016 00:32 IST

उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे बेंबळी गावाला पाणीपुरवठा करणारा रूईभर प्रकल्प तुडूंब भरला आहे़ प्रकल्प भरून महिन्याचा कालावधी लोटला तरी

उस्मानाबाद : परतीच्या पावसामुळे बेंबळी गावाला पाणीपुरवठा करणारा रूईभर प्रकल्प तुडूंब भरला आहे़ प्रकल्प भरून महिन्याचा कालावधी लोटला तरी ग्रामपंचायत प्रशासन सुरळीत पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला़उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी गावात मागील वर्षानुवर्षापासून पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर आहे़ रूईभर येथील पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाल्यानंतर पाणीप्रश्न काही अंशी मार्गी लागला होता़ मात्र, मागील तीन-चार वर्षापासून पावसाने ओढ दिल्याने रूईभर येथील साठवण तलाव कोरडाठाक पडला होता़ परिणामी गावाला सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला़ परतीच्या पावसामुळे कोरडाठाक पडलेला रूईभर प्रकल्प तुडूंब भरला़ मात्र, पाणीपुरवठा योजनेचे साहित्य चोरीस गेल्याने मागील महिनाभरापासून गावातील पाणीपुरवठा बंदच होता़ तलाव भरलेला असतानाही गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती़ तर अनेकांना विकत पाणी घेवून तहान भागवावी लागत होती़ ही बाब पाहता काही ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी पाणीपुरवठा तत्काळ सुरू करा अन्यथा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता़ दिलेल्या मुदतीत गावातील पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने शुक्रवारी गावातील हनुमान चौकातून ग्रामपंचायतीवर घागरमोर्चा काढण्यात आला़ मोर्चेकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धरून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करण्यासह इतर मागण्या लावून धरल्या़ ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर मोर्चेकरी परतले़ या मोर्चात माजी उपसरपंच बाळासाहेब माने, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील, संतोष आगलावे, नवाब पठाण, पांडुरंग पाटील, चेअरमन सोमनाथ गवळी, पांडुरंग पवार, नवनाथ कांबळे, कमलाकर दाणे, तुकाराम राऊत, शहाजान मुजावर, सतिश सोनटक्के, सलीम शेख यांच्यासह ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)