शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

शेतकऱ्यांविनाच ‘बळीराजा’ अभियान

By admin | Updated: March 27, 2017 23:52 IST

तेर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासह त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे

तेर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासह त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. या उद्देशाला महसूल विभागातीलच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हरताळ फासल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे उघडकीस आला़ उद्घाटनावेळी २५ ते ३० जणांची उपस्थिती होती. त्यानंतर अवघ्या काही वेळात हे सभागृह रिकामे झाले. त्यामुळे दोन, तीन शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शासनाचा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरु होता. प्रबोधनापेक्षा निधी खर्च करणे एवढेच आयोजकांचे ध्येय असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त होत होत्या. मागील चार वर्षापासूनच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे़ डोक्यावरील कर्जामुळे शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्या़ शेतकरी आत्महत्येत उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले़ ही गंभीर परिस्थिती पाहता शासनाने शेतकरी आत्महत्या रोखणे, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे, त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यास सुरूवात केली़ या अभियानांतर्गतच उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील रूक्मिणी मंगल कार्यालयात २७ मार्च रोजी सायंकाळी शेतकऱ्यांसाठी लघुचित्रपटव कला पथकाद्वारे नाटीकेचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमासासाठी वरिष्ठ अधिकारी येणार असल्याने गावातील राजकीय पुढारी, कार्यकर्ते तसेच कर्मचारी असे जवळपास ३० ते ३२ जण उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते़ उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, प्रभारी तहसीलदार आयुष प्रसाद, नायब तहसीलदार राजेश जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक एकनाथ माले यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर काही वेळातच अधिकाऱ्यांचा लवाजमा तेथून निघून गेला. काही अधिकारी, कर्मचारी मंगल कार्यालयाच्या बाहेर थांबले़ परंतू अधिकारी जाताच गावातील पुढारी, कार्यकर्त्यांनीही मंगल कार्यालयातून काढता पाय घेतला़ त्यानंतर कार्यक्रम पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी केवळ दोन ते तीन व्यक्ती राहिले़ त्यामुळे या कलापथकाने उपस्थित दोघा-तिघांचेच प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून केले. त्यानंतर त्यातीलही दोघे मध्येच उठून गेले आणि शेवटपर्यंत एकच माणूस कार्यक्रमस्थळी होता. ज्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करायची आहे, ज्यांंना आत्महत्येपासून परावृत्त करायचे आहे त्या शेतकऱ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती रहावी यासाठी कसलेही प्रयत्न झाले नाहीत. शेतकऱ्यांपर्यंत कार्यक्रमाची माहिती योग्य पध्दतीने न पोहोचविल्याने तसेच कार्यक्रमाबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ असल्याने या उपक्रमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.