शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांविनाच ‘बळीराजा’ अभियान

By admin | Updated: March 27, 2017 23:52 IST

तेर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासह त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे

तेर : शेतकरी आत्महत्या रोखण्यासह त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. या उद्देशाला महसूल विभागातीलच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हरताळ फासल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे उघडकीस आला़ उद्घाटनावेळी २५ ते ३० जणांची उपस्थिती होती. त्यानंतर अवघ्या काही वेळात हे सभागृह रिकामे झाले. त्यामुळे दोन, तीन शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शासनाचा हा प्रबोधनात्मक कार्यक्रम सुरु होता. प्रबोधनापेक्षा निधी खर्च करणे एवढेच आयोजकांचे ध्येय असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त होत होत्या. मागील चार वर्षापासूनच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे़ डोक्यावरील कर्जामुळे शेतकऱ्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्या़ शेतकरी आत्महत्येत उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले़ ही गंभीर परिस्थिती पाहता शासनाने शेतकरी आत्महत्या रोखणे, शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे, त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बळीराजा चेतना अभियान राबविण्यास सुरूवात केली़ या अभियानांतर्गतच उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील रूक्मिणी मंगल कार्यालयात २७ मार्च रोजी सायंकाळी शेतकऱ्यांसाठी लघुचित्रपटव कला पथकाद्वारे नाटीकेचे आयोजन करण्यात आले होते़ या कार्यक्रमासासाठी वरिष्ठ अधिकारी येणार असल्याने गावातील राजकीय पुढारी, कार्यकर्ते तसेच कर्मचारी असे जवळपास ३० ते ३२ जण उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित होते़ उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, प्रभारी तहसीलदार आयुष प्रसाद, नायब तहसीलदार राजेश जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक एकनाथ माले यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर काही वेळातच अधिकाऱ्यांचा लवाजमा तेथून निघून गेला. काही अधिकारी, कर्मचारी मंगल कार्यालयाच्या बाहेर थांबले़ परंतू अधिकारी जाताच गावातील पुढारी, कार्यकर्त्यांनीही मंगल कार्यालयातून काढता पाय घेतला़ त्यानंतर कार्यक्रम पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी केवळ दोन ते तीन व्यक्ती राहिले़ त्यामुळे या कलापथकाने उपस्थित दोघा-तिघांचेच प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून केले. त्यानंतर त्यातीलही दोघे मध्येच उठून गेले आणि शेवटपर्यंत एकच माणूस कार्यक्रमस्थळी होता. ज्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करायची आहे, ज्यांंना आत्महत्येपासून परावृत्त करायचे आहे त्या शेतकऱ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती रहावी यासाठी कसलेही प्रयत्न झाले नाहीत. शेतकऱ्यांपर्यंत कार्यक्रमाची माहिती योग्य पध्दतीने न पोहोचविल्याने तसेच कार्यक्रमाबाबत ग्रामस्थ अनभिज्ञ असल्याने या उपक्रमाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.