शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

बकाल बसस्थानक

By admin | Updated: November 10, 2014 23:56 IST

संजय कुलकर्णी/गजेंद्र देशमुख , जालना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा सर्वदूर मोठा बोलबाला होत असताना त्यास छेद देणारे विदारक चित्र या जिल्ह्यात प्रकर्षाने जाणवत आहे

संजय कुलकर्णी/गजेंद्र देशमुख , जालनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा सर्वदूर मोठा बोलबाला होत असताना त्यास छेद देणारे विदारक चित्र या जिल्ह्यात प्रकर्षाने जाणवत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे येथील जिल्हा स्थानचे बकाल बसस्थानक़मराठवाडा आणि विदर्भाची सीमा असल्याने दररोज हजारोंच्या घरात प्रवाशांची वर्दळ असलेला बसस्थानक परिसर. लांबपल्ल्याच्या प्रवाशांना अनेकदा बसच्या प्रतीक्षेत येथे रात्री-अपरात्री थांबावे लागते. परंतु त्या तुलनेत बसस्थानक सर्वात बकाल असल्याचे विदारक चित्र येथे पाहावयास मिळते. स्थानकातील परिसर नेहमी अस्वच्छ आणि दुर्गंधीमय असतो. त्याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. स्थानकात गेले की, नाकाला रूमाल लावून बसावे लागते. मोकाट जनावरे या आवारातच भटकंती करत असतात. पाण्याचे पाऊच, कचरा टाकण्यासाठी डस्बीन नावाचा प्रकार येथे पाहावयास मिळत नाही. त्यामुळे अनेकजण पाऊच आवारातच टाकतात. प्रवेशद्वारापासून स्थानकात कुठेही जा, दुर्गंधीचा वास सर्वत्र असतो. त्याचा परिणाम प्रवाशांच्या आरोग्यावर होत आहे. स्थानकाच्या आवारातील रस्ते उखडले असून आदळाआपट करूनच बस स्थानकाबाहेर निघते. गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत रस्त्यांची अशी अवस्था आहे. परंतु एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बसस्थानकातील स्वच्छतेविषयक विविध अडचणींसंदर्भात आगारप्रमुख व्ही.एम. वाकोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्थानकातील सर्व अडचणी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. स्थानकात अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम लवकरच होणार आहे. परिसर स्वच्छतेचे कंत्राट ज्या एजन्सीकडे होते, त्यांचा कालावधी संपलेला आहे. स्वच्छतागृहांतील सफाईची आपण दररोज पाहणी करतो. तेथे फारशी असुविधा नाही, असा दावा करीत वाकोडे यांनी त्यासंदर्भातही आपण लक्ष देऊन उपाययोजना करू, असे सांगितले.