शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बजाजनगरवासिय दूषित पाण्याने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:26 IST

बजाजनगरात नागरिकांना काही दिवसांपासून पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे साथीचे आजार जडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

वाळूज महानगर : बजाजनगरात नागरिकांना काही दिवसांपासून पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केला जात आहे. यामुळे साथीचे आजार जडत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याच बरोबर टवाळखोरांच्या उपद्रवामुळे महिलांना रस्त्याने चालणेही अवघड झाले आहे.

बजाजनगर निवासी क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. गळतीचे साचलेले घाण पाणी पुन्हा जलवाहिनीच्या पाण्यात मिसळत आहे. त्यामुळे बजाजनगरातील घृष्णेश्वर हौ. सोसायटी, देवगिरी हौ, सोसायटी, स्रेह संवर्धन हौ, सोसायटी, गाडगेबाबा हौ, सोसायटी, तुळजाभवानी हौ. सोसायटी आदी भागांतील रहिवाशांना पिवळसर रंगाचे दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे मलेरिया, कावीळ, पोटदुखी, जुलाब आदी साथीच्या आजाराची लागण होत असून, लहान मुले सारखे आजारी पडत आहेत. वारंवार तक्रारी करुनही प्रशासन शुद्ध पाणीपुरवठा करत नाही. दूषित पाण्यामुळे पिण्यासाठी विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

या भागात एमआयडीसीने पथदिवे बसविले आहेत. पण अद्यापही सुरु केलेले नाहीत. काही ठिकाणी लावलेले दिवे चुकीच्या पद्धतीने बसविल्याने त्याचा नागरिकांना उपयोग होत नाही. त्यामुळे या सोसायटीतील रहिवाशांना कायम अंधरातून ये-जा करावी लागत आहे. स्थानिक पोलिसांचा धाक नसल्याने टवाळखोरांचा उप्रदव वाढला आहे. या टवाळखोरामुळे महिला व तरुणींना रस्त्याने वावरणे अवघड झाले आहे. एमआयडीसी सक्तीने सेवा कराची वसुली करुनही सेवा देत नाही. लोकप्रतिनिधीही समस्या सोडवित नाही. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, असे येथील मीनाक्षी काजळे, दुर्गा निंबोळकर, मंदा गाडेकर, अरुणा भवर, दीपीका जावळकर, पुष्पा पुजारी, सविता तुपे, लीला पाथ्रीकर, लता काळे, सुरेखा पुजारी आदींनी सांगितले.

दूषित पाण्या संदर्भात अजूनही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास शहानिशा करुन शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल.- एस.के. गव्हाणे, सहाय्यक अभियंता ,एमआयडीसी.

टॅग्स :Walujवाळूज