शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

बदनापूर आठवडी बाजाराचा वाद पुन्हा पेटला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2016 00:49 IST

बदनापूर : येथील आठवडी बाजार मार्केट कमिटी परिसरातून गावात स्थलांतर करावा व हा बाजार जैसे थे ठेवावा, असे दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी बदनापुरात तणाव निर्माण झाला

बदनापूर : येथील आठवडी बाजार मार्केट कमिटी परिसरातून गावात स्थलांतर करावा व हा बाजार जैसे थे ठेवावा, असे दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाल्यामुळे शुक्रवारी बदनापुरात तणाव निर्माण झाला होता. बदनापूर येथील आठवडी बाजार हा पूर्वी गावात व महामार्गावर भरवला जात होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून न्यायालयाच्या आदेशाने हा बाजार येथील मार्केट कमिटी परिसरात भरविण्यास सुरूवात केली. परंतु येथील नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व काही नगरसेवकांनी दोन दिवसांपुर्वी हा बाजार पुन्हा गावात भरविण्याबाबत ठराव २३ डिसेंबर २०१५ रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेतल्याचे पत्र बदनापूर पोलिसांना देवून संरक्षणाचंी मागणी केली. त्यानंतर बचाव समितीचे अध्यक्ष पंकज जऱ्हाड यांनी हा बाजार गावात नेवू नये, जर हा बाजार पुन्हा स्थलांतरित केला तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. तसेच छावाचे तालुका अध्यक्ष संजय जऱ्हाड यांनी हा बाजार मार्केट कमिटीच्या ठिकाणीच भरवावा नसता, छावाच्या वतीने तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला होता. त्यामुळे पुन्हा आठवडी बाजार भरविण्याबाबत संघर्ष सुरू झाला असल्याचे चित्र बदनापुरात दिसले. परिस्थितीचा विचार करून पोलिसांकडून शुक्रवारी बंदोबस्त ठेवण्यात आला. दरम्यान, या वादामुळे भाजीपाला विक्रेत्यांची फरफट झाली. (वार्ताहर)