शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी

By admin | Updated: April 25, 2016 00:34 IST

जालना : सत्ता येते आणि जाते, सत्ता आली म्हणून माजू नये, तर सत्ता नसेल तर लाजू नये, या सूत्राप्रमाणे भाजपाने आतापर्यंत काम केलेले आहे.

जालना : सत्ता येते आणि जाते, सत्ता आली म्हणून माजू नये, तर सत्ता नसेल तर लाजू नये, या सूत्राप्रमाणे भाजपाने आतापर्यंत काम केलेले आहे. सत्तेत नसतानाही लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम पक्षाने केले आहे. आमचे प्रेम लाल दिव्यावर नसून, लोकांच्या समस्या सोडविण्यावर आहे. सरकार दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन अर्थमंंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी येथे केले.राहुल लोणीकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आ.अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, आ. तानाजी मुटकुळे, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब, सुरजितसिंग ठाकूर, गजानन महाराज शास्त्री, सिध्दलिंग स्वामी, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, शेषराव बाहेकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी शिव प्रतिमेचे पूजन करुन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. मुनगंटीवार म्हणाले की, सध्या मराठवाड्यात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सर्वत्या उपाययोजना केल्या जात आहेत. असे असले तरी पक्ष म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा पक्षाच्यावतीने आयोजित केला जात आहे. या सोहळ्यातून दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे हे दुष्काळ निवारणासाठी काम करत आहेत. पण स्थिती बिकट आहे. अशावेळी जनतेच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. ते पक्षाच्यावतीने केले जात असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. महसूलमंत्री खडसे म्हणाले की, सामूहिक विवाह सोहळ्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी शासनाच्यावतीने ५० हजार रुपयांची मदत केली जात आहे. अशा प्रकारच्या सोहळ्यातून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे काम होत आहे. मराठवाड्यातील निम्न दूधना प्रकल्पातून लातूरसाठी पाणी देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. यासाठी आजच आपण परतूर शहरातील जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.पालकमंत्री लोणीकर म्हणाले, दुष्काळ व गारपिटीने शेतकरी हतबल झाला आहे. त्यातून आत्महत्या वाढत आहेत. त्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेतली पाहिजे, या विचारातूनच हा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यात सहभाग घेणाऱ्या जोडप्यांना शासनाच्यावतीने शौचालय बांधून देण्यात येणार आहे. तसेच त्यांना संसारपयोगी साहित्यही दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.दुष्काळी स्थितीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले आहेत. सरकार ते सोडविण्यासाठी कटिबध्द आहे. मुलींच्या लग्नासाठी आर्थिक तरतूद होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर बबनराव लोणीकर आणि राहुल लोणीकर यांनी आयोजित केलेला सोहळा महत्वाचा ठरतो.- हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्षहा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी दोन महिन्यांपासून १ हजार कार्यकर्ते रात्रंदिवस झटत होते. वऱ्हाडी व जोडप्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने त्यांची गैरसोय टळली. विवाह सोहळ्याबरोबरच काही दिवसांपूर्वी महाआरोग्य शिबीरही घेतले. याचा साडेतीन हजार रुग्णांना लाभ झाला.-बबनराव लोणीकर, पालकमंत्री