शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी

By admin | Updated: April 25, 2016 00:34 IST

जालना : सत्ता येते आणि जाते, सत्ता आली म्हणून माजू नये, तर सत्ता नसेल तर लाजू नये, या सूत्राप्रमाणे भाजपाने आतापर्यंत काम केलेले आहे.

जालना : सत्ता येते आणि जाते, सत्ता आली म्हणून माजू नये, तर सत्ता नसेल तर लाजू नये, या सूत्राप्रमाणे भाजपाने आतापर्यंत काम केलेले आहे. सत्तेत नसतानाही लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम पक्षाने केले आहे. आमचे प्रेम लाल दिव्यावर नसून, लोकांच्या समस्या सोडविण्यावर आहे. सरकार दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन अर्थमंंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी येथे केले.राहुल लोणीकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, महसूल मंत्री एकनाथ खडसे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, आ.अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, आ. नारायण कुचे, आ. तानाजी मुटकुळे, आ. अतुल सावे, आ. प्रशांत बंब, सुरजितसिंग ठाकूर, गजानन महाराज शास्त्री, सिध्दलिंग स्वामी, वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, शेषराव बाहेकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी शिव प्रतिमेचे पूजन करुन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. मुनगंटीवार म्हणाले की, सध्या मराठवाड्यात दुष्काळी स्थिती असल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सर्वत्या उपाययोजना केल्या जात आहेत. असे असले तरी पक्ष म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा पक्षाच्यावतीने आयोजित केला जात आहे. या सोहळ्यातून दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे हे दुष्काळ निवारणासाठी काम करत आहेत. पण स्थिती बिकट आहे. अशावेळी जनतेच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. ते पक्षाच्यावतीने केले जात असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. महसूलमंत्री खडसे म्हणाले की, सामूहिक विवाह सोहळ्यात आंतरजातीय विवाह करणाऱ्यांसाठी शासनाच्यावतीने ५० हजार रुपयांची मदत केली जात आहे. अशा प्रकारच्या सोहळ्यातून दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्याचे काम होत आहे. मराठवाड्यातील निम्न दूधना प्रकल्पातून लातूरसाठी पाणी देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. यासाठी आजच आपण परतूर शहरातील जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.पालकमंत्री लोणीकर म्हणाले, दुष्काळ व गारपिटीने शेतकरी हतबल झाला आहे. त्यातून आत्महत्या वाढत आहेत. त्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेतली पाहिजे, या विचारातूनच हा सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यात सहभाग घेणाऱ्या जोडप्यांना शासनाच्यावतीने शौचालय बांधून देण्यात येणार आहे. तसेच त्यांना संसारपयोगी साहित्यही दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.दुष्काळी स्थितीमुळे शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बिकट झाले आहेत. सरकार ते सोडविण्यासाठी कटिबध्द आहे. मुलींच्या लग्नासाठी आर्थिक तरतूद होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या पार्श्वभूमीवर बबनराव लोणीकर आणि राहुल लोणीकर यांनी आयोजित केलेला सोहळा महत्वाचा ठरतो.- हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्षहा विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी दोन महिन्यांपासून १ हजार कार्यकर्ते रात्रंदिवस झटत होते. वऱ्हाडी व जोडप्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याने त्यांची गैरसोय टळली. विवाह सोहळ्याबरोबरच काही दिवसांपूर्वी महाआरोग्य शिबीरही घेतले. याचा साडेतीन हजार रुग्णांना लाभ झाला.-बबनराव लोणीकर, पालकमंत्री