शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांतच बालोद्यानाची दुरवस्था

By admin | Updated: September 23, 2014 23:23 IST

हिंगोली : शहरातील रेल्वे वसाहतीत लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बालोद्यानाची अवघ्या आठ महिन्यांतच रया गेली.

हिंगोली : शहरातील रेल्वे वसाहतीत लाखो रुपये खर्चून उभारलेल्या बालोद्यानाची अवघ्या आठ महिन्यांतच रया गेली. लहान मुलांसाठी आणलेले साहित्य मोडकळीस आले असून उद्यानाचे प्रवेशद्वार सताड उघडे राहात असल्याने गुरे-ढोरे, कुत्री तेथे ठाण मांडून बसत आहेत. २८ जानेवारी २०१४ मध्ये महाप्रबंधक प्रदीपकुमार श्रीवास्तव, मंडळ प्रबधंक पी. सी. शर्मा, मुख्य कार्मिक अधिकारी संजय सुरी (सिकंदराबाद) यांच्या उपस्थितीत थाटामाटात उद्घाटन झाले. उद्यानात मुलांना खेळाचे साहित्यही उपलब्ध करुन देण्याची उपस्थितांनी मागणी केली. त्यानंतर घोडा गाडी, साखळी झोका, फिरता झोका तेथे आला. भव्य उद्यानात ही बाब किरकोळच होतीे. मात्र हिरवळ व इतर बाबी सुखावणाऱ्या होत्या. आल्हाद देणाऱ्या होत्या. अधिकारी कुसुवा यांच्या कारकिर्दित उद्यानाची सुस्थितीत होते. त्यांची बदली झाली अन् उद्यानाचे हाल सुरू झाले.सताड उघड्या प्रवेशद्वारामुळे गुरे तेथे चरायला येत आहेत. स्वच्छता नियमितपणे होत नाही. गाजर गवतही वाढले. लहान मुले तर सोडा मोठ्यांनाही तेथे जाणे सोयीचे वाटत नाही. काही दिवसांपूर्वी या उद्यानाच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात होते. गवत काढण्यासाठी दोन ते तीन महिला कार्यरत होत्या. आता कोणी तिकडे ढुंकूनही पाहत नाही. रेल्वे प्रशासनाने चांगल्या हेतूने उभारलेल्या या उद्यानाची वाताहात पाहून शहरवासी नाराज आहेत.(वार्ताहर)