लातूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर महिलांना सतरंजीवर व्यवस्था करण्यात येत आहे. खाटा नसल्याने बाळंतिणींची गैरसोय होत आहे. ‘सर्वोपचार’मध्ये बाह्य रुग्ण विभागात दररोज ८०० ते ९०० रुग्णांची तपासणी केली जाते. तर यातील गंभीर असणाऱ्या ५० ते १०० रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जाते. तसेच राज्य शासनाच्या जननी सुरक्षा योजनेंतर्गत गरोदर मातांची मोफत प्रसुती केली जाते. ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच शहरातील स्त्री रुग्णालयाकडून प्रसूतीसाठी सर्वोपचारकडे रेफर केले जाते. परिणामी, ‘सर्वोपचार’मध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या बाळंतिणींची संख्या वाढत आहे. त्यामुळे खाटा अपुऱ्या पडत आहेत. सुरुवातीला दोन वॉर्डमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. सद्यस्थितीत चार वॉर्ड असून, प्रत्येक वॉर्डमध्ये ३० बेडची सुविधा आहे. ३० खाटांव्यतिरिक्त नवा रुग्ण आला की त्याची सतरंजीवर व्यवस्था केली जाते. अशा एकूण १६० खाटा असूनही या खाटा अपुऱ्या पडत आहेत.
बाळंतिणींना मिळेना ‘सर्वोपचार’मध्ये खाटा
By admin | Updated: July 11, 2016 00:24 IST