शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

बाबासाहेब आमची प्रेरणा : ‘जुगाड’मुळे ‘युगयात्रा’ या नाटकाचा प्रवास यशस्वी झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 18:56 IST

शिक्षणाबाबत या ज्ञानी पुरुषाची दृृष्टी म्हणजे हत्तीवरून सुई दिसावी अशी होती

नागसेनवनात शिक्षण संस्था सुरू करून बाबासाहेबांनी मराठवाड्याला नवी शैक्षणिक दृष्टी दिली. मराठवाड्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना दिली. पालकांच्या मनात असलेला मुला-मुलींतील भेदभाव दूर केला. बाबासाहेबांनी खास मुलींसाठी बससेवा सुरू केली. मागास मराठवाड्यातील प्रत्येक घटकाला उच्चशिक्षित करण्यासाठी बाबासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर करून त्यांना एक नवा शैक्षणिक दृष्टिकोन दिला. शिक्षणाबाबत या ज्ञानी पुरुषाची दृृष्टी म्हणजे हत्तीवरून सुई दिसावी अशी होती, अशी आठवण ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. त्र्यंबक महाजन यांनी सांगितली.

मराठवाड्यातील मागासलेपण दूर करण्यासाठी या भागात त्यांनी उच्चशिक्षणाचा प्रसार केला. निजाम राजवटीत असलेल्या मराठवाडावर उर्दू भाषेचा प्रभाव होता. बाबासाहेबांनी कॉलेजच्या अगोदर मिलिंद हायस्कूल सुरू केले. हास्कूलमध्ये मी उर्दू शिकवत असे. विद्यार्थ्यांचे आकलन आणि प्राध्यापकांच्या शिकविण्याच्या हातोटीवर बाबासाहेबांचे विशेष लक्ष असायचे. एकदा वर्गात शिकवीत असताना बाबासाहेब अचानक वर्गात येऊन बसले. बाबासाहेब समोर असल्यामुळे माझ्यावर फार मोठे दडपण आले. त्यावेळी मी स्वत:ला सावरत विचार केला की, बाबासाहेब कोकणातील असल्यामुळे उर्दू भाषेबाबत त्यांना फारसे माहिती नसेल. मी विद्यार्थ्यांना उर्दू गजल शिकविण्यास सुरुवात केली. वर्ग संपताच बाबासाहेब मला म्हणाले, ‘तू उर्दू चांगले शिकवतोस; पण तुझा ‘ज’चा नुक्ता चुकला. उर्दू भाषेत ‘ज’चा उच्चार तू काढतो, तसा नसतो’, हे लक्षात ठेव.’ बाबासाहेबांच्या या सूक्ष्म निरीक्षणाने मी चकित झालो.

पुढे मी ‘बी.ए.’च्या अंतिम वर्षात असताना गॅदरिंगमध्ये हुंडा प्रतिबंधक चळवळीवर अधारित ‘जुगाड’ हे नाटक सादर केले. तेव्हा बाबासाहेब प्राचार्य म.भि. चिटणीस सरांना म्हणाले, ‘काय रे, हुंड्याचा आपला प्रश्न नाही.’ तेव्हा चिटणीस म्हणाले, ‘आपल्या दैनंदिन प्रश्नांवर (मागासवर्गीयांची अवस्था) नाटक नाहीत आपल्याकडे.’ हे ऐकून बाबासाहेब म्हणाले, ‘तू लिहितोस का.’ बाबासाहेबांसमोर नाही म्हणण्याची हिंमत नव्हती किंवा बाबासाहेबांना शब्द देणे सोपी गोष्ट नव्हती. तरीही मोठ्या हिमतीने चिटणीस म्हणाले, ‘मी लिहितो.’ त्यांनी मग ‘युगयात्रा’ हे नाटक लिहायला सुरुवात केली. चिटणीस सरांनी हे नाटक लिहिले व मी ते बसविले. मनुस्मृतीच्या काळापासून आंबेडकरांपर्यंतचा प्रवास त्या नाटकात होता. केवळ ‘जुगाड’मुळे ‘युगयात्रा’ या नाटकाचा प्रवास यशस्वी झाला. 

एकदा बाबासाहेब मिलिंदच्या व्हरांड्यात बसलेले असताना एक विद्यार्थी गाढवावर बसून त्याला पळवत होता. हे पाहून बाबासाहेबांनी त्याला आवाज देऊन थांबविले. त्याच्या हातावर जोरात चापट मारली व ते म्हणाले, ‘काय रे, मी हेच संस्कार दिलेत का तुम्हाला. वर्ग नसेल, तर लायब्ररीत जाऊन अभ्यास कर.’ या महाविद्यालयातून आदर्श विद्यार्थी घडावेत, अशी तळमळ बाबासाहेबांची होती.

म.भि. चिटणीस यांनी लिहिलेले ‘युगयात्रा’ हे जगातील एकमेव नाटक असेल, जे बाबासाहेबांसोबत नागपूर येथे दीक्षाभूमीवर १९५६ मध्ये लाखो लोकांनी एकाच वेळी पाहिले. 

(संकलन : विजय सरवदे )  

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagsen vanनागसेन वन