शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेब आमची प्रेरणा : बाबासाहेबांचा दरारा, पण आदरयुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 18:52 IST

बाबासाहेबांना आम्ही दुरूनच पाहायचो. जवळ जाण्याची कोणाचीच हिंमत नसायची.

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे हे देखील मिलिंदचेच विद्यार्थी. त्यांनी विद्यार्थीदशेतील काही आठवणी जाग्या के ल्या. ते म्हणतात, मी १९५५ मध्ये जिंतूर येथे दहावी पास झालो. आमचे हायस्कूल नवीनच होते. शाळेची आमची तिसरी बॅच होती. दहावीच्या बॅचमध्ये ३० विद्यार्थी होतो. त्यापैकी आम्ही ९ विद्यार्थीच पास झालो. पुढील शिक्षणासाठी कुठल्या कॉलेजला जायचे याबद्दल आमची चर्चा झाली. मात्र, पास झालेल्या ९ विद्यार्थ्यांपैकी मी एकटाच औरंगाबादला राहिलो व बाकीचे हैदराबादला गेले. १९४८ साली हैदराबाद राज्य विलीन झाल्यानंतर जिंतूर हायस्कूलमध्ये अनेक मराठी शिक्षक आले होते. त्यांच्याकडून बाबासाहेबांसारख्या विद्वान माणसाने सुरू केलेल्या कॉलेजबद्दल खूप ऐकले होते. या कॉलेजची गुणवत्ता, ग्रंथालय, खेळ आणि तज्ज्ञ प्राध्यापकांमुळे माहिती होती. या कॉलेजमध्ये सर्व जाती-धर्मांची मुले शिक्षण घेत होती. या महाविद्यालयातूनच साहित्य, संस्कृती, नाट्य चळवळी जन्माला आल्या.

१९५५ मध्ये इंटर आर्टला मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेव्हा नेमके नवीन इमारतीमध्ये वर्ग सुरू झाले. ओलसर भिंती होत्या. महाविद्यालयात शिकविण्यासाठी बाबासाहेबांनी वेगवेगळ्या प्रांतातून निवडक अनुभवी प्राध्यापक आणले होते. सुदैवाने त्याच वर्षी वसतिगृहात बोर्डिंगही सुरू झाली होती. बोर्डिंगमध्ये बाबासाहेबांची दोन-तीन भाषणे झाली. विद्यार्थ्यांचे राहणीमान कसे असावे, अभ्यास, वाचन, मनन, चिंतन करावे, तर्काने विचार करावा, असा उपदेश बाबासाहेब करायचे. त्यामुळेच या कॉलेजचा विद्यार्थी ‘मिलिंद’सारखा व प्राध्यापक ‘नागसेन’सारखे व्हावेत, अशी इच्छा बाबासाहेबांची होती. योगायोगाने मी प्रवेश घेतला त्याचवर्षी या महाविद्यालयाचे मिलिंद व परिसराला ‘नागसेनवन परिसर’ असे नाव दिले.

बाबासाहेब शिक्षक वर्गात कसा शिकवतो, याचे बारकाईने निरक्षण करीत. ते म्हणायचे, शिक्षक चांगला असेल, तर विद्यार्थ्यांची पिढी घडेल. शिक्षक चांगला नसेल, तर विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या बर्बाद होतील. बाबासाहेबांना आम्ही दुरूनच पाहायचो. जवळ जाण्याची कोणाचीच हिंमत नसायची. ज्ञानसूर्य बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान असून, त्यांच्या प्रेरणेतूनच मी पुढे शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे मिलिंदमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांचे सोने झाले. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी देशभरात अनेक क्षेत्रामध्ये मोठमोठ्या पदांवर आहेत. मिलिंद महाविद्यालयाने मला सचोटी, निर्भीडपणा व प्रामाणिकपणाचे संस्कार दिले. हेच संस्कार घेऊन मी आयुष्यात वाटचाल केली.

( संकलन : विजय सरवदे ) 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagsen vanनागसेन वन