शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

बाबासाहेब आमची प्रेरणा : बाबासाहेबांचा दरारा, पण आदरयुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 18:52 IST

बाबासाहेबांना आम्ही दुरूनच पाहायचो. जवळ जाण्याची कोणाचीच हिंमत नसायची.

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे हे देखील मिलिंदचेच विद्यार्थी. त्यांनी विद्यार्थीदशेतील काही आठवणी जाग्या के ल्या. ते म्हणतात, मी १९५५ मध्ये जिंतूर येथे दहावी पास झालो. आमचे हायस्कूल नवीनच होते. शाळेची आमची तिसरी बॅच होती. दहावीच्या बॅचमध्ये ३० विद्यार्थी होतो. त्यापैकी आम्ही ९ विद्यार्थीच पास झालो. पुढील शिक्षणासाठी कुठल्या कॉलेजला जायचे याबद्दल आमची चर्चा झाली. मात्र, पास झालेल्या ९ विद्यार्थ्यांपैकी मी एकटाच औरंगाबादला राहिलो व बाकीचे हैदराबादला गेले. १९४८ साली हैदराबाद राज्य विलीन झाल्यानंतर जिंतूर हायस्कूलमध्ये अनेक मराठी शिक्षक आले होते. त्यांच्याकडून बाबासाहेबांसारख्या विद्वान माणसाने सुरू केलेल्या कॉलेजबद्दल खूप ऐकले होते. या कॉलेजची गुणवत्ता, ग्रंथालय, खेळ आणि तज्ज्ञ प्राध्यापकांमुळे माहिती होती. या कॉलेजमध्ये सर्व जाती-धर्मांची मुले शिक्षण घेत होती. या महाविद्यालयातूनच साहित्य, संस्कृती, नाट्य चळवळी जन्माला आल्या.

१९५५ मध्ये इंटर आर्टला मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेव्हा नेमके नवीन इमारतीमध्ये वर्ग सुरू झाले. ओलसर भिंती होत्या. महाविद्यालयात शिकविण्यासाठी बाबासाहेबांनी वेगवेगळ्या प्रांतातून निवडक अनुभवी प्राध्यापक आणले होते. सुदैवाने त्याच वर्षी वसतिगृहात बोर्डिंगही सुरू झाली होती. बोर्डिंगमध्ये बाबासाहेबांची दोन-तीन भाषणे झाली. विद्यार्थ्यांचे राहणीमान कसे असावे, अभ्यास, वाचन, मनन, चिंतन करावे, तर्काने विचार करावा, असा उपदेश बाबासाहेब करायचे. त्यामुळेच या कॉलेजचा विद्यार्थी ‘मिलिंद’सारखा व प्राध्यापक ‘नागसेन’सारखे व्हावेत, अशी इच्छा बाबासाहेबांची होती. योगायोगाने मी प्रवेश घेतला त्याचवर्षी या महाविद्यालयाचे मिलिंद व परिसराला ‘नागसेनवन परिसर’ असे नाव दिले.

बाबासाहेब शिक्षक वर्गात कसा शिकवतो, याचे बारकाईने निरक्षण करीत. ते म्हणायचे, शिक्षक चांगला असेल, तर विद्यार्थ्यांची पिढी घडेल. शिक्षक चांगला नसेल, तर विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या बर्बाद होतील. बाबासाहेबांना आम्ही दुरूनच पाहायचो. जवळ जाण्याची कोणाचीच हिंमत नसायची. ज्ञानसूर्य बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान असून, त्यांच्या प्रेरणेतूनच मी पुढे शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे मिलिंदमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांचे सोने झाले. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी देशभरात अनेक क्षेत्रामध्ये मोठमोठ्या पदांवर आहेत. मिलिंद महाविद्यालयाने मला सचोटी, निर्भीडपणा व प्रामाणिकपणाचे संस्कार दिले. हेच संस्कार घेऊन मी आयुष्यात वाटचाल केली.

( संकलन : विजय सरवदे ) 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagsen vanनागसेन वन