शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

बाबासाहेब आमची प्रेरणा : बाबासाहेबांचा दरारा, पण आदरयुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 18:52 IST

बाबासाहेबांना आम्ही दुरूनच पाहायचो. जवळ जाण्याची कोणाचीच हिंमत नसायची.

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे हे देखील मिलिंदचेच विद्यार्थी. त्यांनी विद्यार्थीदशेतील काही आठवणी जाग्या के ल्या. ते म्हणतात, मी १९५५ मध्ये जिंतूर येथे दहावी पास झालो. आमचे हायस्कूल नवीनच होते. शाळेची आमची तिसरी बॅच होती. दहावीच्या बॅचमध्ये ३० विद्यार्थी होतो. त्यापैकी आम्ही ९ विद्यार्थीच पास झालो. पुढील शिक्षणासाठी कुठल्या कॉलेजला जायचे याबद्दल आमची चर्चा झाली. मात्र, पास झालेल्या ९ विद्यार्थ्यांपैकी मी एकटाच औरंगाबादला राहिलो व बाकीचे हैदराबादला गेले. १९४८ साली हैदराबाद राज्य विलीन झाल्यानंतर जिंतूर हायस्कूलमध्ये अनेक मराठी शिक्षक आले होते. त्यांच्याकडून बाबासाहेबांसारख्या विद्वान माणसाने सुरू केलेल्या कॉलेजबद्दल खूप ऐकले होते. या कॉलेजची गुणवत्ता, ग्रंथालय, खेळ आणि तज्ज्ञ प्राध्यापकांमुळे माहिती होती. या कॉलेजमध्ये सर्व जाती-धर्मांची मुले शिक्षण घेत होती. या महाविद्यालयातूनच साहित्य, संस्कृती, नाट्य चळवळी जन्माला आल्या.

१९५५ मध्ये इंटर आर्टला मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेव्हा नेमके नवीन इमारतीमध्ये वर्ग सुरू झाले. ओलसर भिंती होत्या. महाविद्यालयात शिकविण्यासाठी बाबासाहेबांनी वेगवेगळ्या प्रांतातून निवडक अनुभवी प्राध्यापक आणले होते. सुदैवाने त्याच वर्षी वसतिगृहात बोर्डिंगही सुरू झाली होती. बोर्डिंगमध्ये बाबासाहेबांची दोन-तीन भाषणे झाली. विद्यार्थ्यांचे राहणीमान कसे असावे, अभ्यास, वाचन, मनन, चिंतन करावे, तर्काने विचार करावा, असा उपदेश बाबासाहेब करायचे. त्यामुळेच या कॉलेजचा विद्यार्थी ‘मिलिंद’सारखा व प्राध्यापक ‘नागसेन’सारखे व्हावेत, अशी इच्छा बाबासाहेबांची होती. योगायोगाने मी प्रवेश घेतला त्याचवर्षी या महाविद्यालयाचे मिलिंद व परिसराला ‘नागसेनवन परिसर’ असे नाव दिले.

बाबासाहेब शिक्षक वर्गात कसा शिकवतो, याचे बारकाईने निरक्षण करीत. ते म्हणायचे, शिक्षक चांगला असेल, तर विद्यार्थ्यांची पिढी घडेल. शिक्षक चांगला नसेल, तर विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या बर्बाद होतील. बाबासाहेबांना आम्ही दुरूनच पाहायचो. जवळ जाण्याची कोणाचीच हिंमत नसायची. ज्ञानसूर्य बाबासाहेब हेच माझे प्रेरणास्थान असून, त्यांच्या प्रेरणेतूनच मी पुढे शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केले. बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळे मिलिंदमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांचे सोने झाले. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी देशभरात अनेक क्षेत्रामध्ये मोठमोठ्या पदांवर आहेत. मिलिंद महाविद्यालयाने मला सचोटी, निर्भीडपणा व प्रामाणिकपणाचे संस्कार दिले. हेच संस्कार घेऊन मी आयुष्यात वाटचाल केली.

( संकलन : विजय सरवदे ) 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNagsen vanनागसेन वन