शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:32 IST

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला राममंदिराचा मुद्दा आठवला आहे. राजीनामा देऊ, आज देतो, उद्या देतो, असे फक्त म्हणण्यावरच त्यांचा भर आहे. मात्र राजीनामा काही दिला जात नाही. अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात, अशी अवस्था असल्याचे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांनी शिवसेनेवर टीका केली.

ठळक मुद्देमनसेची शिवसेनेवर टीका : शेतकरी आत्महत्या झालेल्या गावात ‘सीएम’ चषक, ‘दंडुका’ मोर्चा काढणार

औरंगाबाद : निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला राममंदिराचा मुद्दा आठवला आहे. राजीनामा देऊ, आज देतो, उद्या देतो, असे फक्त म्हणण्यावरच त्यांचा भर आहे. मात्र राजीनामा काही दिला जात नाही. अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात, अशी अवस्था असल्याचे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांनी शिवसेनेवर टीका केली.मनसेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी २७ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत पैठणगेटहून विभागीय आयुक्त कार्यालयावर दंडुका मोर्चा काढण्यात येणार आहे. याविषयी माहिती देण्यासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, विजय चव्हाण, शेख राज शेख, बालाजी मुंढे, सचिन पाटील, गजानन गिते, बळीराम खटके, बिपीन नाईक, वैभव मिटकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती.जावेद शेख म्हणाले, राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला, परंतु त्यासंदर्भात काहीही नियोजन केलेले नाही. दुष्काळावरून लक्ष हटविण्याचाच प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नांसाठी सरकारला जागे करण्यासाठी दंडुका मोर्चा काढण्यात येत आहे. सध्या फक्त इशारा देण्यासाठी दंडुका हातात घेतला जात आहे. त्यानंतरही दुर्लक्ष केले तर दंडुका वापरावा लागेल. मोर्चामध्ये मराठवाड्यातून शेतकºयांसह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील. मुंबईहूनदेखील मनसेचे नेते सहभागी होतील, असे ते म्हणाले. याप्रसंगी गौतम आमराव, आशिष सुरडकर, प्रवीण मोहिते, संकेत शेटे, किशोर पांडे, चेतन पाटील आदी उपस्थित होते.प्रत्येक निवडणुकीत मुद्दाएकीकडे गावांमध्ये शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत, तर त्याच गावात सीएम चषक खेळले जात आहे, असे सुमित खांबेकर म्हणाले. जावेद शेख म्हणाले, राममंदिर झाले पाहिजे, परंतु निवडणुकीनंतर. चार वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर फक्त निवडणुकीसाठी हा मुद्दा शिवसेनेला आठवला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हाच मुद्दा पुढे केला जातो.-----------

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण