शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:32 IST

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला राममंदिराचा मुद्दा आठवला आहे. राजीनामा देऊ, आज देतो, उद्या देतो, असे फक्त म्हणण्यावरच त्यांचा भर आहे. मात्र राजीनामा काही दिला जात नाही. अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात, अशी अवस्था असल्याचे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांनी शिवसेनेवर टीका केली.

ठळक मुद्देमनसेची शिवसेनेवर टीका : शेतकरी आत्महत्या झालेल्या गावात ‘सीएम’ चषक, ‘दंडुका’ मोर्चा काढणार

औरंगाबाद : निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला राममंदिराचा मुद्दा आठवला आहे. राजीनामा देऊ, आज देतो, उद्या देतो, असे फक्त म्हणण्यावरच त्यांचा भर आहे. मात्र राजीनामा काही दिला जात नाही. अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात, अशी अवस्था असल्याचे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांनी शिवसेनेवर टीका केली.मनसेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी २७ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत पैठणगेटहून विभागीय आयुक्त कार्यालयावर दंडुका मोर्चा काढण्यात येणार आहे. याविषयी माहिती देण्यासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, विजय चव्हाण, शेख राज शेख, बालाजी मुंढे, सचिन पाटील, गजानन गिते, बळीराम खटके, बिपीन नाईक, वैभव मिटकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती.जावेद शेख म्हणाले, राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला, परंतु त्यासंदर्भात काहीही नियोजन केलेले नाही. दुष्काळावरून लक्ष हटविण्याचाच प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नांसाठी सरकारला जागे करण्यासाठी दंडुका मोर्चा काढण्यात येत आहे. सध्या फक्त इशारा देण्यासाठी दंडुका हातात घेतला जात आहे. त्यानंतरही दुर्लक्ष केले तर दंडुका वापरावा लागेल. मोर्चामध्ये मराठवाड्यातून शेतकºयांसह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील. मुंबईहूनदेखील मनसेचे नेते सहभागी होतील, असे ते म्हणाले. याप्रसंगी गौतम आमराव, आशिष सुरडकर, प्रवीण मोहिते, संकेत शेटे, किशोर पांडे, चेतन पाटील आदी उपस्थित होते.प्रत्येक निवडणुकीत मुद्दाएकीकडे गावांमध्ये शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत, तर त्याच गावात सीएम चषक खेळले जात आहे, असे सुमित खांबेकर म्हणाले. जावेद शेख म्हणाले, राममंदिर झाले पाहिजे, परंतु निवडणुकीनंतर. चार वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर फक्त निवडणुकीसाठी हा मुद्दा शिवसेनेला आठवला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हाच मुद्दा पुढे केला जातो.-----------

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण