शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
2
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
3
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
4
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
5
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
7
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
8
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
9
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
10
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
11
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
12
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
13
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
14
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
15
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
16
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
17
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
19
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
20
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:32 IST

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला राममंदिराचा मुद्दा आठवला आहे. राजीनामा देऊ, आज देतो, उद्या देतो, असे फक्त म्हणण्यावरच त्यांचा भर आहे. मात्र राजीनामा काही दिला जात नाही. अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात, अशी अवस्था असल्याचे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांनी शिवसेनेवर टीका केली.

ठळक मुद्देमनसेची शिवसेनेवर टीका : शेतकरी आत्महत्या झालेल्या गावात ‘सीएम’ चषक, ‘दंडुका’ मोर्चा काढणार

औरंगाबाद : निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला राममंदिराचा मुद्दा आठवला आहे. राजीनामा देऊ, आज देतो, उद्या देतो, असे फक्त म्हणण्यावरच त्यांचा भर आहे. मात्र राजीनामा काही दिला जात नाही. अयोध्याला निघाले जोशात आणि राजीनामा खिशात, अशी अवस्था असल्याचे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जावेद शेख यांनी शिवसेनेवर टीका केली.मनसेतर्फे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी २७ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत पैठणगेटहून विभागीय आयुक्त कार्यालयावर दंडुका मोर्चा काढण्यात येणार आहे. याविषयी माहिती देण्यासाठी शनिवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, विजय चव्हाण, शेख राज शेख, बालाजी मुंढे, सचिन पाटील, गजानन गिते, बळीराम खटके, बिपीन नाईक, वैभव मिटकर, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, संदीप कुलकर्णी यांची उपस्थिती होती.जावेद शेख म्हणाले, राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला, परंतु त्यासंदर्भात काहीही नियोजन केलेले नाही. दुष्काळावरून लक्ष हटविण्याचाच प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शेतकºयांच्या प्रश्नांसाठी सरकारला जागे करण्यासाठी दंडुका मोर्चा काढण्यात येत आहे. सध्या फक्त इशारा देण्यासाठी दंडुका हातात घेतला जात आहे. त्यानंतरही दुर्लक्ष केले तर दंडुका वापरावा लागेल. मोर्चामध्ये मराठवाड्यातून शेतकºयांसह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील. मुंबईहूनदेखील मनसेचे नेते सहभागी होतील, असे ते म्हणाले. याप्रसंगी गौतम आमराव, आशिष सुरडकर, प्रवीण मोहिते, संकेत शेटे, किशोर पांडे, चेतन पाटील आदी उपस्थित होते.प्रत्येक निवडणुकीत मुद्दाएकीकडे गावांमध्ये शेतकºयांच्या आत्महत्या होत आहेत, तर त्याच गावात सीएम चषक खेळले जात आहे, असे सुमित खांबेकर म्हणाले. जावेद शेख म्हणाले, राममंदिर झाले पाहिजे, परंतु निवडणुकीनंतर. चार वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर फक्त निवडणुकीसाठी हा मुद्दा शिवसेनेला आठवला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हाच मुद्दा पुढे केला जातो.-----------

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण