शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

पाणीपुरवठा योजना खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 00:54 IST

औरंगाबाद : शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना अमलात आणण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेला खो दिला आहे.

औरंगाबाद : शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजना अमलात आणण्यासाठी अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेला खो दिला आहे. त्यामुळे जवळपास वर्षभरापासून पाणीपुरवठ्याच्या कामांना खीळ बसली असून, ग्रामीण भागात दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. जिल्ह्यात तांत्रिक मंजुरी आणि प्रशासकीय मान्यता मिळालेल्या तब्बल २६ पाणीपुरवठा योजनांची कामे खोळंबली आहेत, हे विशेष!ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी अस्तित्वात असलेली राष्ट्रीय पेयजल योजना शासनाने १३ जुलै २०१५ च्या पत्रानुसार गुंडाळण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले होते. पुढील आदेशापर्यंत तांत्रिक किंवा प्रशासकीय मान्यता दिलेली असली तरी त्या कामांच्या निविदा काढू नये किंवा ती कामे सुरू करू नयेत, अशा शासनाच्या सूचना होत्या. त्यानुसार जि. प. पाणीपुरवठा विभागाने तांत्रिक मंजुरी तसेच प्रशासकीय मान्यता मिळालेल्या २६ पाणीपुरवठा योजनेच्या कामांची निविदा प्रक्रिया स्थगित केली. जिल्हा परिषदेला २०१५-१६ च्या वार्षिक आराखड्याची प्रतीक्षा होती. तो आराखडाच मंजूर न झाल्यामुळे नवीन योजनांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करता आली नाही. हा आराखडा मंजूर झाला असता किंवा राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मान्यता मिळालेली कामे तीन टप्प्यामध्ये सुरू करता आली असती. याव्यतिरिक्त ९२ योजनांची कामे सध्या प्रगतिपथावर असली तरी तेथून पाण्याचा पुरवठा मात्र होऊ शकलेला नाही. ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे नागरिक व पशुधन त्रस्त आहे. तथापि, दरवर्षी पाणीपुरवठ्याच्या योजनांवर देखभाल, दुरुस्तीपोटी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही पाणीटंचाई कायम आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत राष्ट्रीय पेयजल योजना सुरू होती. ही योजनाही पुरेसा पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरल्यामुळे ती शासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी आता मुख्यमंत्री ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीसंबंधीचे आदेश निघालेले नाहीत. या योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी टंचाईग्रस्त गावांचा समावेश करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी जिल्ह्याचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केला आहे.