शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

साथीच्या रोगांना आळा घाला

By admin | Updated: July 31, 2014 01:26 IST

वाळूज महानगर : चिकुन गुनिया, डेंग्यू, मलेरिया, कावीळ आदी साथीच्या रोगांमुळे वाळूज महानगरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

वाळूज महानगर : चिकुन गुनिया, डेंग्यू, मलेरिया, कावीळ आदी साथीच्या रोगांमुळे वाळूज महानगरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. डेंग्यूमुळे गेल्या आठवड्यात दोन जणांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, येथे तात्काळ आरोग्य सुविधा सुरू कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाळूज महानगरातील स्वच्छतेकडे एमआयडीसी व स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी व डास वाढले आहेत. दूषित पाणी व परिसरातील दुर्गंधीमुळे डेंग्यू, चिकुन गुनिया, हिवताप, मलेरिया, कावीळ आदी साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. डेंग्यूमुळे बजाजनगरात २७ वर्षांचा तरुण व ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. बजाजनगरसह वडगाव कोल्हाटी येथेही साथीच्या रोगाचे लोण पसरत आहे. या भागातील साथीच्या रोगांचे अनेक रुग्ण शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. बजाजनगरसह वडगाव कोल्हाटी येथेही शासनाच्या वतीने तात्काळ औषधोपचाराचे वाटप करून वेगवेगळ्या भागांत आरोग्य शिबिरांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्य जागृती करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा. या परिस्थितीला जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस संजय तायडे, जिल्हा सचिव जनार्दन निकम पाटील, वाळूज महानगर अध्यक्ष शरद पाटील, राजू डोईफोडे, बंडू पुरी, काकासाहेब सुलताने, नामदेव मानकापे, प्रकाश निकम, महिला तालुकाध्यक्ष दुर्गा निंबोळकर यांची नावे आहेत. बंद पडलेले भूमिगत गटारीचे काम सुरू करावाळूज औद्योगिक निवासी क्षेत्र व बजाजनगरात एमआयडीसीच्या वतीने सुरू करण्यात आलेले भूमिगत गटार योजनेचे काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. हे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी एमआयडीसी प्रशासनाकडे सामाजिक विचार मंचने केली आहे. बजाजनगर वसाहतीत गटारी उघड्या पडल्या आहेत, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचते, खदानीतील पाण्यामुळे दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया आदी साथरोगांना तोंड द्यावे लागत आहे. अस्वच्छता व दुर्गंधीमुळे बजाजनगरमध्ये दोन जणांचा बळी गेला आहे. एवढे सगळे घडूनही एमआयडीसी प्रशासन ठोस भूमिका घेत नसून, अनेक ठिकाणी सांडपाणी व कचऱ्याने गटारी भरल्या आहेत. याकडे सामाजिक विचार मंचचे अध्यक्ष गजानन नांदूरकर, सचिव केशव ढोले, विकास पाटील, प्रदीप वडतकर, विठ्ठल कांबळे, दिलीप दबडे, चिंतामणी शेटे, सतीश कोरडे, प्रल्हाद माने, नानेश्वर धुर्वे, व्यंकट टेकाडे, मधुकर नाटकर, सातप्पा जगताप, सुधाकर शेवाळे, ज्ञानेश्वर गवळी, गजानन तुपसुंदर, श्रीकृष्ण अंबडकर यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.