शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

साथीच्या रोगांना आळा घाला

By admin | Updated: July 31, 2014 01:26 IST

वाळूज महानगर : चिकुन गुनिया, डेंग्यू, मलेरिया, कावीळ आदी साथीच्या रोगांमुळे वाळूज महानगरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

वाळूज महानगर : चिकुन गुनिया, डेंग्यू, मलेरिया, कावीळ आदी साथीच्या रोगांमुळे वाळूज महानगरातील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. डेंग्यूमुळे गेल्या आठवड्यात दोन जणांचा मृत्यू झाला. स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, येथे तात्काळ आरोग्य सुविधा सुरू कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाळूज महानगरातील स्वच्छतेकडे एमआयडीसी व स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी व डास वाढले आहेत. दूषित पाणी व परिसरातील दुर्गंधीमुळे डेंग्यू, चिकुन गुनिया, हिवताप, मलेरिया, कावीळ आदी साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. डेंग्यूमुळे बजाजनगरात २७ वर्षांचा तरुण व ६ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. बजाजनगरसह वडगाव कोल्हाटी येथेही साथीच्या रोगाचे लोण पसरत आहे. या भागातील साथीच्या रोगांचे अनेक रुग्ण शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. बजाजनगरसह वडगाव कोल्हाटी येथेही शासनाच्या वतीने तात्काळ औषधोपचाराचे वाटप करून वेगवेगळ्या भागांत आरोग्य शिबिरांद्वारे नागरिकांमध्ये आरोग्य जागृती करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा. या परिस्थितीला जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. निवेदनावर जिल्हा सरचिटणीस संजय तायडे, जिल्हा सचिव जनार्दन निकम पाटील, वाळूज महानगर अध्यक्ष शरद पाटील, राजू डोईफोडे, बंडू पुरी, काकासाहेब सुलताने, नामदेव मानकापे, प्रकाश निकम, महिला तालुकाध्यक्ष दुर्गा निंबोळकर यांची नावे आहेत. बंद पडलेले भूमिगत गटारीचे काम सुरू करावाळूज औद्योगिक निवासी क्षेत्र व बजाजनगरात एमआयडीसीच्या वतीने सुरू करण्यात आलेले भूमिगत गटार योजनेचे काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. हे काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी एमआयडीसी प्रशासनाकडे सामाजिक विचार मंचने केली आहे. बजाजनगर वसाहतीत गटारी उघड्या पडल्या आहेत, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचते, खदानीतील पाण्यामुळे दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया, चिकन गुनिया आदी साथरोगांना तोंड द्यावे लागत आहे. अस्वच्छता व दुर्गंधीमुळे बजाजनगरमध्ये दोन जणांचा बळी गेला आहे. एवढे सगळे घडूनही एमआयडीसी प्रशासन ठोस भूमिका घेत नसून, अनेक ठिकाणी सांडपाणी व कचऱ्याने गटारी भरल्या आहेत. याकडे सामाजिक विचार मंचचे अध्यक्ष गजानन नांदूरकर, सचिव केशव ढोले, विकास पाटील, प्रदीप वडतकर, विठ्ठल कांबळे, दिलीप दबडे, चिंतामणी शेटे, सतीश कोरडे, प्रल्हाद माने, नानेश्वर धुर्वे, व्यंकट टेकाडे, मधुकर नाटकर, सातप्पा जगताप, सुधाकर शेवाळे, ज्ञानेश्वर गवळी, गजानन तुपसुंदर, श्रीकृष्ण अंबडकर यांनी निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.