शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात खरिपाची सरासरी १०९ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:02 IST

बीड : मागील चार दिवसात पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना बुस्टर डोस मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मागील चार दिवसात पावसाने चांगली हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना बुस्टर डोस मिळाला आहे. बीड जिल्ह्यात १९ जुलैपर्यंत १०९. ५४ टक्के पेरणी झाली आहे. बीड आणि गेवराई तालुक्यात कापसाची सर्वाधिक लागवड करण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली आहे. जिल्ह्यात बाजरी, तूर, उडीद, मुगाची सर्वाधिक पेरणी आष्टी तालुक्यात झाली आहे. बीड जिल्ह्याचे खरिपाचे सरासरी क्षेत्र ६ लाख ५८ हजार २४० इतके आहे. यंदा ७ लाख २१ हजार ३० हेक्टर क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला असून, कृषी विभागाच्या सूत्रांनुसार आतापर्यंत १०९.५४ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. बीड तालुक्यात ७० हजार ५७२ हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड झाली आहे. तर ११ हजार ४१५ हेक्टरात सोयाबीन व ११ हजार ६०८ हेक्टरात बाजरीचा पेरा झाला आहे. तर गेवराई तालुक्यात ६९ हजार ८५६ हेक्टरात कापसाची लागवड झाली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी सोयाबीन, बाजरीला पसंती दिली आहे. जिल्ह्यात उडीदाची सर्वाधिक पेरणी आष्टी तालुक्यात २३ हजार ४८४ हेक्टर क्षेत्रात झाली आहे. या शिवाय १५ हजार ५२० हेक्टर क्षेत्रात बाजरी, ७३६४ हेक्टर क्षेत्रात तुर तर ७ हजार ७२७ हेक्टरात मुगाची पेरणी केली आहे. आष्टी तालुक्यातील हे आकडे इतर तालुक्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. शिरूर कासार तालुक्यात २९ हजार १९२ हेक्टरमध्ये कापसाचा, २३४९ हेक्टरमध्ये सोयाबीन, २८८६ हेक्टरमध्ये तुरीचा तर ९१३१ हेक्टरात बाजरीचा पेरा झाला आहे. माजलगाव तालुक्यातही शेतकऱ्यांनी कापसालाच पसंती दिली असून, ३५ हजार ७४४ हेक्टरमध्ये पेरा झाला आहे. त्यापाठोपाठ २० हजार ४९६ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा आहे.गेवराई तालुक्यात कापसानंतर सोयाबीनचे क्षेत्र ६६५४ इतके आहे. धारुर तालुक्यातही २३ हजार ६५० हेक्टर कापसाचा पेरा झाला आहे. त्या पाठोपाठ ७ हजार ४६५ हेक्टरात सोयाबीनचा पेरा आहे. वडवणी तालुक्यात कापसाचा २२ हजार १०० हेक्टरात पेरा झाला असून, बाजरी, तूर, सोयाबीनचे पिकही शेतकऱ्यांनी घेतले आहे. अंबाजोगाई तालुक्यात सोयाबीनशिवाय शेतकऱ्यांनी कापूस, तूर, खरीप ज्वारीला प्राधान्य दिले आहे. केज तालुक्यात ३९ हजार हेक्टरवर कापूस, तर ३५ हजार ७५० हेक्टरात सोयाबीनचा पेरा आहे.परळी तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र २६ हजार ७७ हेक्टर असून, १९ हजार ४६८ हेक्टरात शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली आहे.