शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

‘मेक इन इंडिया’त औरंगाबादची झोळी रिकामीच

By admin | Updated: February 17, 2016 00:46 IST

संजय देशपांडे, औरंगाबाद ‘मेक इन इंडिया’ या प्रदर्शनात औरंगाबादची झोळी रिकामीच राहिली आहे. शेंद्रा- बिडकीन पार्कच्या ‘आॅरिक’सिटी या नामांतरावरच औरंगाबादची बोळवण करण्यात आली आहे.

संजय देशपांडे, औरंगाबाद‘मेक इन इंडिया’ या प्रदर्शनात औरंगाबादची झोळी रिकामीच राहिली आहे. शेंद्रा- बिडकीन पार्कच्या ‘आॅरिक’सिटी या नामांतरावरच औरंगाबादची बोळवण करण्यात आली आहे. स्टरलाईटचा प्रकल्प नागपूरला पळविण्यावर सामंजस्य कराराद्वारे शिक्कामोर्तब करण्यात आले, तर जागतिक दर्जाचा वाहन उद्योग औरंगाबादेत येणार असल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणाही फोल ठरली आहे.मुंबईत १३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ‘मेक इन इंडिया’ या प्रदर्शनाकडून औरंगाबादकरांना मोठ्या अपेक्षा होत्या. यानिमित्त राज्यात सहा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले. त्यातून २८ लाख नवा रोजगार निर्माण होईल, असे सांगितले जात आहे; परंतु गुंतवणुकीबाबत झालेले सर्व सामंजस्य करार विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रासाठीच झाल्याचे दिसून येते. दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या शेंद्रा- बिडकीन मेगा पार्कमध्ये एखादा मोठा उद्योग आणला जाईल, अशी ग्वाही स्वत: उद्योगमंत्र्यांनी दिली होती. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.‘आॅरिक’ ठरले स्वप्नरंजनऔरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (आॅरिक) स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली होती. ‘आॅरिक’म्हणजे काही तरी भव्यदिव्य असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न यानिमित्त करण्यात आला; परंतु शेंद्रा- बिडकीन मेगा पार्कचेच हे नामांतर असून, प्रत्यक्षात औरंगाबादकरांना नवीन काहीच मिळणार नाही. ‘आॅरिक’मध्ये उद्योगांना स्वस्त विजेचा २४ तास पुरवठा, माहिती तंत्रज्ञानाचे अद्ययावत जाळे, प्रशस्त रस्ते, पाण्याचा पुनर्वापर, जागतिक दर्जाची शिक्षण व्यवस्था, उद्याने, रुग्णालये उभारली जाणार आहेत; परंतु तेथे मोठा उद्योग आणण्यासाठी मात्र कसलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. मोठा उद्योग न आल्यास ‘आॅरिक’ हे स्वप्नरंजनच ठरेल, अशी भीती या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. ‘आॅरिक’ या नामांतराशिवाय ‘मेक इन इंडिया’त औरंगाबादच्या हाती काही लागले नाही.काय म्हणाले होते उद्योगमंत्री? ‘सीआयआय’च्या ‘इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र, इन्हेस्ट इन टू मराठवाडा’ या गुंतवणूक परिषदेचा समारोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत २९ जानेवारी रोजी झाला होता. ‘वाहननिर्मिती क्षेत्रात जागतिक पातळीवर नावलौकिक मिळविलेला मोठा उद्योग औरंगाबादेत आणण्याचे जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यात आम्हाला नक्कीच यश मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘मेक इन इंडिया’ प्रदर्शनात याबाबत अधिकृत घोषणा करतील,’ असे वक्तव्य देसाई यांनी केले होते. हा वाहन उद्योग कोणता असेल, याबाबत उद्योग जगतात चर्चितचर्वण सुरू होते. ह्युंदाई, मर्सिडीझ, महिंद्रा, अशी नावे घेतली जात होती; परंतु मर्सिडीझचा प्रकल्प चाकणला जाणार असल्याचे, तर महिंद्राची गुंतवणूक नाशिकमध्ये होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्योगमंत्र्यांची घोषणा तूर्त तरी फोल ठरली आहे.