शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

औरंगाबादचे नाव विश्वपटलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:45 IST

क्रांतीचौकातील झांशी की राणी या पूर्वीच्या उद्यानाला औरंगाबाद मनपा स्वातंत्र्य संग्राम स्मारक असे नाव तेथे उभारण्यात आलेल्या २१० फूट राष्ट्रध्वज स्तंभामुळे शहराचे नाव विश्वपटलावर आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : क्रांतीचौकातील झांशी की राणी या पूर्वीच्या उद्यानाला औरंगाबाद मनपा स्वातंत्र्य संग्राम स्मारक असे नाव तेथे उभारण्यात आलेल्या २१० फूट राष्ट्रध्वज स्तंभामुळे शहराचे नाव विश्वपटलावर आले असून, या शहराच्या ऐतिहासिकतेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत त्या ध्वजस्तंभाचे लोकार्पण शनिवारी पार पडले. याप्रसंगी बोलताना राज्यपालांनी भाषणाच्या सुरुवातीलाच नमूद केले, औरंगाबाद शहर हे ऐतिहासिक शहरांपैकी एक आहे. १८५७ च्या राष्ट्रीय उठावाची साक्ष देणारे क्रांतीचौक हे स्थळ विश्वपातळीवरील मानचित्र म्हणून आपली वेगळी ओळख बनविण्यासाठी चालले आहे. राज्यपालांच्या या गौरवोद्गारामुळे औरंगाबाद शहराला पर्यटनाच्या दृष्टीने आणि ध्वजस्तंभामुळे आणखी महत्त्व येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि इंटरनेट सर्च इंजिनवरदेखील त्याचा गवगवा होण्यास सुरुवात झाली आहे.गुगल सर्च इंजिनवर क्रांतीचौक ध्वजस्तंभ असे सर्च केल्यास त्यासंबंधीची माहिती येण्यास सुरुवात झाली आहे. ५४ बाय ३६ चा हा स्तंभावरील ध्वज आहे. त्यावर सर्च लाईट लावण्यात आला आहे. हे अष्टकोनी स्मारक आहे. आठ छोटे स्तंभ असून, त्यावर राजचिन्ह आहे.राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या संकल्पनेतून हा ध्वजस्तंभ उभा राहिला आहे. मराठवाडा-हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील करीमनगर या जिल्ह्याचे राज्यपाल रहिवासी आहेत. या प्रांताच्या संवेदना त्यांना माहिती असल्यामुळे प्रेरणादायी ध्वजस्तंभ उभारण्याची संकल्पना त्यांनी मांडल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या उपस्थितीत या उपक्रमासाठी पहिली बैठक झाली होती.