शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धीच्या दिशेने औरंगाबादची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:06 IST

औरंगाबादेतून जाणाऱ्या मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग, सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्ग आणि औरंगाबाद - जळगाव या तिन्ही राष्ट्रीय ...

औरंगाबादेतून जाणाऱ्या मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग, सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्ग आणि औरंगाबाद - जळगाव या तिन्ही राष्ट्रीय महामार्गांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. या वर्षअखेरपर्यंत हे तिन्हीही महामार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून, या शहराच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत.

नवीन बीड बायपास

वीस वर्षांपूर्वी शहरातील जालना रस्ता हाच एकमेव दळणवळणासाठी मुख्य मार्ग होता. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली. अपघाताचे प्रमाण वाढले. त्यामुळे जालना रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून बीड बायपास रोड अस्तित्त्वात आला. परिणामी, जालना रस्त्यावरील वाहतुकीचा ताण काहीसा हलका झाला. मात्र, बीड बायपासलगत दोन्ही बाजूने शिवाजीनगर, देवळाई, सातारा परिसरात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहतीही उभ्या राहिल्या. त्यामुळे अलिकडे हा बायपासही जालना रस्त्यासारखाच अपघातांसाठी कुख्यात बनला. आता पुढील २५ वर्षांचे नियोजन करून सध्याच्या बीड बायपास रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून नवीन बीड बायपास रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

साधारणपणे दीड पावणे दोन वर्षांपूर्वी सोलापूर - धुळे या राष्ट्रीय महामार्गाचा ‘सोलापूर - येडशी’ हा पहिला टप्पा व दुसऱ्या टप्प्यात ‘येडशी ते औरंगाबाद’ या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. सध्याचा जुना बायपास हा रस्ता आता शहरातीलच रस्ता झाला असून, वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्यावरही अपघातांची संख्या वाढली. त्यामुळे सोलापूर - धुळे नवीन महामार्गासाठी नवीन बीड बायपास आकाराला आला. निपाणी, सातारा, वाल्मी, नक्षत्रवाडी आणि पुढे नगर - पुणे लिंक रोड मार्गे करोडी, माळीवाडा, कसाबखेड्याहून कन्नडकडे हा रस्ता जातो. या बायपासचे कामही अंतिम टप्प्यात आले असून, तो लवकरच वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे.

‘सुपर एक्स्प्रेस वे’ समृद्धी महामार्ग

समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून औरंगाबादच्या विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे. जिल्ह्यातून हा महामार्ग ११२ किलोमीटर लांबीचा गेला असून, तो औरंगाबाद, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील ७१ गावांमधून जात आहे. या महामार्गावर इस्पितळे, शीतगृहे, हॉटेल्स, नवीन शहरे, कौशल्य विकास शैक्षणिक केंद्रे या बाबी प्रस्तावित असून, लवकरच त्यासंबंधीची कामे सुरू होतील. या महामार्गामुळे औरंगाबादचा विकास अत्यंत गतीने होणार आहे. याचबरोबर येथील व्यापार, उद्योग, शेती क्षेत्राची भरभराट होण्याचा मार्गही या निमित्ताने मोकळा होणार आहे. या महामार्गामुळे औरंगाबादहून नागपूरला चार तासांत, तर मुंबईलाही तेवढ्याच वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी वरदान ठरणारा समृद्धी महामार्ग राज्यातील १२ जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जात आहे.

औरंगाबाद - जळगाव महामार्गाला गती

जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा लेण्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या १४७ किलोमीटर लांबीच्या औरंगाबाद - जळगाव राष्ट्रीय महामार्गाचे कामही आता ८० टक्के पूर्ण झाले आहे. भूसंपादनाच्या अडचणीमुळे या महामार्गाचे काम संथगतीने सुरू होते. आता तो अडथळाही काही दिवसांतच दूर होईल. देश-विदेशातील पर्यटकांसाठी हा चार पदरी महामार्ग सोयीचा ठरणार आहे. मोठ्या पुलांची कामे गतीने सुरू असून, चौका - अजिंठा घाटातील भूसंपादनाची अडचण दूर झाल्यास याही महामार्गाचे काम मार्गी लागणार आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मराठवाडा हा उत्तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाला जोडला जाणार आहे.